Homeन्यूज अँड व्ह्यूजघोडबंदर रस्त्यावरील दुर्दैवाचे...

घोडबंदर रस्त्यावरील दुर्दैवाचे दशावतार संपणार तरी कधी?

ठाण्याच्या घोडबंदर रस्त्यावरील गायमुख घाटात आठवड्यातील सुमारे पाच दिवस वाहतूककोंडी-वाहतूककोंडी हा जीवघेणा खेळ सुरूच असतो. ना ठाणे महापालिकेला फिकीर, ना राज्य सरकारला… या दोघांमध्ये पीसला जातो तो नोकरदार, विद्यार्थीवर्ग, महिला, लहान मुले व लाखो कामगार… ज्यांचे हातावर पोट आहे अशी माणसे तर वाहतूककोंडीचा अंदाज घेऊन घराबाहेर न पडणेच पसंत करतात. अशा या वाहतूककोंडी हा ‘नीचे’चा ग्रह असलेल्या गायमुख घाटात परवा रात्रीपासून सुमारे पाच ब्रेकडाऊन पाहिले. हे कमी होते म्हणूनच की काय छायाचित्रात दिसणारा ‘बशा’ टँकरने संपूर्ण दिवसाचीच बरबादी कारून टाकली. या टँकरमध्ये २० टन कच्चे तेल होते. दुर्दैव इथेच संपलेले नव्हते. या टँकरचे सहाही पाईप्स जॅम झाले होते. त्यामुळे हा टँकर रिकामा करून बाजूला करण्याच्या प्रयत्नांवर पाणी पडले! पोलिसांच्या वाहतूक खात्याचे अधिकारी व हवालदारांचा या महाप्रचंड कोंडीने अक्षरशः घामटा काढला! काही अधिकारी तर घरच्या वेशात घटनास्थळी उपस्थित राहून मार्गदर्शन करत होते. रात्री उशिरा हा बशा टँकर क्रेनच्या सहाय्याने काहीसा बाजूला करून एक लेन वाहतुकीसाठी खुली करण्यात वाहतूक पोलिसांना यश आले.

गेल्या काही महिन्यांपासून गायमुख घाटातील वाहतूककोंडीची ठाणेकराना नको इतकी सवय झालेली आहे. (न होऊन कसे चालेल? पापी पेट का सवाल जो है..) या टँकरसारखीच अनेक भंगार अवजड वाहने या रस्त्यावरून जात असतात. ना त्यांची देखभाल केलेली असते, ना त्यांचा ड्रायव्हर धड बोलूही शकत असतो. सर्व रामभरोसे असतं ना सरकारची भीती, ना कायद्याची भीती.. फक्त वाटेल तशी गाडी हाकता येते इतकेच काय ते पाहिले जाते. खरंतर अशा भंगार वाहनांना शहरात प्रवेशच देऊ नये. शहराच्या आरोग्याची नासाडी करणारी वाहने इथे नकोतच! ठाण्याची ‘आपली’ माणसे म्हणवणारी राजकीय मंडळी काही ‘बाणा’ दाखवणार आहेत की नाही? की आपापसातच ‘हमरीतुमरी’वर संतुष्ट होणार आहेत.

छायाचित्र मांडणीः प्रवीण वराडकर

1 COMMENT

Comments are closed.

Continue reading

मदिरा व मदिराक्षी! पोलीस अधिकाऱ्यांचे डोंबिवलीच्या वेशीवर ‘मै टल्ली हो गयी..’

डोंबिवलीनजिकच्या शीळ फाट्यावरून डोंबिवलीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पडले नावाचे सुंदर गाव आहे. गावात अजून बऱ्यापैकी निसर्ग शाबूत आहे. उंच इमारती आहेत. पण उंची गगनाला वेसण घालण्याइतपत नाही, ही जमेची बाजू! हे पडले गाव सुरु होताच मुक्ता नामक विकासकाची ओळख व्हायला...

नव्या महापालिका आयुक्तांचे स्वागत करताना…

मुंबईच्या पहिल्या महिला महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांचे मुंबईकरांच्या वतीने स्वागत करताना त्यांना मुंबईतल्या गिरगावातल्या 'हौदा'कडे बोट दाखवण्याची इच्छा नव्हती. परंतु त्या मुंबईच्या मेट्रो प्रकल्पाच्या प्रमुख होत्या. आजही तो अतिरिक्त कार्यभार त्यांच्याकडेच आहे, त्यामुळे हीच संधी घेतली म्हणाना. मुंबई...

लांब जटा.. टिळा-टोपी-माळा, अशा प्रतिमेला छेद देणारा भोंदू!

कॅप्टन नसलेल्या आणि इयत्ता दहावी नापास असलेल्या अशोक खरात नामक भोंदूबाबाच्या विविध कथांनी राज्यातील वर्तमानपत्रांचे रकानेच्या रकाने सध्या भरून वाहत आहेत! तसे पाहिले तर आपल्या राज्यालाच नव्हे तर संपूर्ण देशाला बुवाबाजींनी ग्रासलेले आहे. कुठे आसाराम आहेत तर कुठे बाबा...
Skip to content