Homeचिट चॅटजान्हवी मोरे स्मृती...

जान्हवी मोरे स्मृती कॅरम स्पर्धेत स्वरा कदम, ओमकार वडर विजेते

डोंबिवली (पूर्व) येथील दत्तनगर उत्कर्ष मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय कॅरमपटू जान्हवी मोरे स्मृतिप्रीत्यर्थ १६ वर्षांखालील मुलां-मुलींच्या राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत अनुक्रमे कोल्हापूरच्या ओमकार वडर आणि रत्नागिरीच्या स्वरा कदमने विजेतेपदाचा मान मिळवला. शास्त्री हॉलमध्ये झालेल्या या स्पर्धेत ठाणे, मुंबई, मुंबई उपनगर, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, पुणे, कोल्हापूर येथील १००पेक्षा जास्त कॅरमपटू सहभागी झाले होते. दोन्ही गटात प्रथम ८ क्रमांक मिळविणाऱ्या खेळाडूंना रोख रकमेची पारितोषिके, चषक, पदके देण्यात आली. एकूण १८ हजार रुपये रोख रकमेची पारितोषिके देण्यात आली.

मुलांच्या अंतिम सामन्यात कोल्हापूरच्या सुसंस्कार हायस्कूलच्या ओमकार वडरने ठाण्याच्या आय.इ.एस. चंद्रकांत पाटकर विद्यालयाच्या प्रसाद मानेचा सरळ दोन सेटमध्ये पराभव केला. तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीत पुण्याच्या आर्यन वर्ल्ड स्कूलच्या आयुष गरुडने ठाण्याच्या आय. इ. एस. चंद्रकांत पाटकर विद्यालयाच्या नील म्हात्रेचा पराभव केला. मुलींच्या निर्णायक सामन्यात रत्नागिरीच्या आर. बी. शिर्के हायस्कूलघ्या स्वरा कदमने मुंबई उपनगरच्या कनोसा कॉन्व्हेंट हायस्कूलच्या वेदिका पोमेंडकरचा २ सेटमध्ये पराभव केला. तिसऱ्या क्रमांकाच्या सामन्यात मुंबई उपनगरच्या महात्मा गांधी विद्यामंदिराच्या तनया दळवीने सिंधुदूर्ग, सावंतवाडीच्या मुक्ताई अकॅडमीच्या साक्षी रामदूरकरचा पराभव केला.

विजेत्या ओमकार, स्वराला रोख रुपये ३ हजार आणि चषक देऊन गौरविण्यात आले. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार राजेश मोरे यांचे आयोजकांना मोलाचे सहकार्य मिळाले. आमदार राजेश मोरे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. माजी विश्वविजेते कॅरमपटू योगेश परदेशी, आंतरराष्ट्रीय कॅरमपटू संजय मांडे यांच्या हस्ते स्पर्धेचा बक्षिस समारंभ संपन्न झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

तृणमूलच्या विळख्यातून प. बंगाल बाहेर! आता कसोटी सुवेंधूंची!!

ममता बॅनर्जींचा पाठोपाठ दोन्ही विधानसभा निवडणुकीत सलग दोन वेळा पराभव करून देशात जायंट किलर ठरलेले सुवेंधू अधिकारी यांनी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून रविवारी शपथ घेतली आणि राज्यात नव्या पर्वाला सुरूवात झाली. ममता बॅनर्जीच्या पंधरा वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत सतत हिंसाचार,...

१४ व १५ मे रोजी मुंबईत रंगणार अ. भा. महापौर केसरी कुस्ती स्पर्धा

बृहन्मुंबई महानगरपालिका व मुंबई शहर तालीम संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ३२वी अखिल भारतीय मुंबई महापौर केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२६चे आयोजन करण्यात आले असून, देशभरातील नामांकित मल्ल या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. ही प्रतिष्ठेची स्पर्धा १४ व १५ मे २०२६...

देश चालवणे ही मोदींच्या आवाक्याबाहेरची गोष्ट!

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अलीकडील आवाहनांवर कडाडून टीका केली आहे. 'देश चालवणे मोदींच्या आवाक्यातली गोष्ट नाही' अशा शब्दांत हल्लाबोल केला आहे. पंतप्रधानांनी नागरिकांना सोने न खरेदी करण्याचे आणि परदेश दौरा टाळण्याचे जे आवाहन केले...
Skip to content