Homeन्यूज अँड व्ह्यूजठाणे पालिकेच्या बेसमेंटमध्ये...

ठाणे पालिकेच्या बेसमेंटमध्ये आहे ५० घमेली धूळ!

ठाणे शहरात संपूर्ण लोकमान्य नगर अगदी जुन्या बस डेपोपासून तो नव्या बस डेपोपर्यंत फेरफटका मारला असता रस्त्याच्या दुतर्फा पार्किंग केलेल्या दुचाक्या व रिक्षा यांना चकवत नागरिक कसे चालत असतील याचा विचारच न केलेला बरा. लोकमान्य नगरात तर एका ठिकाणी रिक्षा रांगेत उभ्या करून रस्ता अडवलेलाआहे. संतापाची बाब म्हणजे या बश्या रिक्षांपैकी अनेक रिक्षा एकतर कंडम झालेल्या तरी आहेत किंवा वर्षभरात त्यांना रस्ताच दाखवलेला नाही, अशा अवस्थेत आहेत. आपला परिसर कसा ठेवलेला आहे हे पाहण्यासाठी दिवंगत धर्मवीर आनंद दिघे रात्री-अपरात्री परिसराला भेट देत असत याची आठवण काही ज्येष्ठ नागरिकांनी यावेळी करून दिली. पोलीस हवालदार वा वाहतूक पोलीस काही शिस्त लावण्याचा प्रयत्न करतात तेव्हा परिसरातील स्वघोषित भाईमंडळी टारगट पोरांना हाताशी धरून ‘बवाल’ निर्माण करतात अशी तक्रारही काहींनी केली. महापौर शर्मिलाताईंनी या परिसराला भेट देऊन (न कळवता) परिस्थितीचा आढावा घेऊन प्रशासनाला कारवाई करण्यास भाग पाडावे, अशी नागरिकांची मागणी आहे.

अलीकडेच ठाणे महापालिका मुख्यालयातील पत्रकारांच्या एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथराव म्हणाले होते की, पत्रकारांनी थंड वातावरणातून आता बाहेर पडून थोडे ‘गरम’ झाले पाहिजे. म्हणजेच आता पालिका कारभारावर टीका करणारेही काहीतरी सडेतोड लिहा. उपमुख्यमंत्र्यांच्या या विधानाचा सरळ अर्थ कारभारावर टीका करा, असाच होतो. ठाणे महापालिकेच्या कारभारावर टीका करायलाही हजार गोष्टी सहजी सापडतील. त्याही अगदी मुख्यालयाच्या इमारतीपासूनच! इमारत परिसराचे सोडा. पण इमारतीच्या आतही सर्वत्र धूळच

दिसते. बेसमेंटमध्ये तर आरामात ५० घमेली धूळ केव्हाही मिळू शकते. पत्रकार कक्षाशेजारील प्रसाधनगृहातील नळच कुणीतरी काढून घेऊन गेलेले आहेत. इमारत परिसरातील रस्ते व पदपथही म्हणावे तसे नाहीत. समतल हा शब्द महापालिका अभियंत्यांना जणू माहीतच नसावा, इतके शहरातील रस्ते उंचसखल आहेत. उदाहरण म्हणून गावदेवी व गोखले रस्ता परिसरातील रस्त्याचे घेता येईल. मी पैज लावायला तयार आहे की, या दोन्हीपैकी किमान दोन फूट रस्ता खड्ड्याविना दाखवावा व माझ्याकडून २०० रुपये घेऊन जावेत. (गरीब श्रमिक पत्रकार इतकेच देऊ शकतो.) पदपथाची अवस्था तर शहरभर दुर्दशा या शब्दानेच व्यक्त करावी लागेल.

माजी मुख्यमंत्री व आजी उपमुख्यमंत्र्यांच्या वागळे इस्टेट, किसन नगर वा विस्तारित सावरकर नगरातील अवस्था तर अधिक बिकट आहे. विस्तारित सावरकर नागराच्या आधी असलेल्या लोकमान्य नगरात तर पार्किंग केलेल्या गाड्या व बाईक्स पायी नागरिकांचे चालणे मुश्किल झाले आहे. कंडम झालेल्या रिक्षाही अनेकांनी दुर्मिळ वस्तू सांभाळाव्या तशा बाळगल्या आहेत. वानगीदाखल वर उल्लेख केलेले दोनच भाग व त्यातील ही काही अंश दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. अन्यथा कोपरीपासून ते वाघबीळपर्यंत तसेच बाळकूमपासून वर्तकनगरपर्यंतचे अनेक भाग असे काढून दाखवता येतील की, जणू काही महापालिका प्रशासनाचे अस्तित्त्वच नाही. बाळकूममधील अशोकनगर भागात तर केव्हाही जा तुमचे स्वागत कचऱ्याच्या ढिगानेच होईल. घोडबंदर रोडवरील शेकडो इमारतीत नियमित पाणीपुरवठाच होत नसल्याच्या अनेक तक्रारी आहेत. तक्रारींचा पाढा तरी वाचू किती? घशाला कोरड पडेल…

(लेखक विजयकुमार काळे ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

Continue reading

.. आणि रेल्वे पोलीस आयुक्तांच्या बोटात सरकली सोन्याची अंगठी!

आता ऐका रेल्वे पोलिसांच्या भ्रष्टाचाराची आणखी एक 'सुरस' कथा! आयुक्तांच्या जन्मदिनी बोटात सरकवली गेली सोन्याची अंगठी तर हातात टेकवले गेले सोन्याचेच बिस्कूट... लगे रहो भाय.... "करा रे खुश्शाल करा हवा तो राडा। धम्माल करण्याचा जमाना आहे! बिन्धास करा बलात्कार-भ्रष्टाचार-अत्याचार भर सभेत, लोकसभेत... हवामान चांगले...

परदेशाप्रमाणे भांडुपमध्ये लवकरच दिसणार ‘कलते’ मनोरे?

मुंबईतला लालबहाद्दूर शास्त्री मार्ग, मेट्रो लाईनचे काम आणि भांडुप-मुलुंड परिसर यांचे काय नाते आहे हे एका परमेश्वरालाच माहित! कारण मेट्रोचे अपघात येथेच सुरू झाले आहेत. काही महिन्यांपूर्वी झालेल्या अपघातात मेट्रोची एक स्लॅब कोसळून रिक्षा चक्काचूर झाली होती व माणसे...

मुंबई महापालिकेचा ‘दिव्याखालीच अंधार’!

गेल्या दोन दिवसांपासून मुंबईला वरूणराजा झोडपून काढत आहे. मुसळधार पावसामुळे मुंबई महापालिकेच्या कारभाराची लत्करे वेशीवर टांगली जात आहे. मी-मी म्हणणारे कित्येक आले. गेले. राजकारणातून संपले. पण, मुंबई काही तुंबायची राहिली नाही. यंदा तब्बल महिन्याभराच्या प्रतीक्षेनंतर मुंबईत पावसाचे आगमन झाले....
Skip to content