Homeन्यूज अँड व्ह्यूज.. म्हणे एसटीच्या...

.. म्हणे एसटीच्या आगारे एअरपोर्टच्या लाऊंजसारखी करणार!

महाराष्ट्राच्या परिवहन मंत्रिपदाची धुरा हाती आल्यापासून प्रताप सरनाईक यांनी एसटी सेवा सुधारण्याबात अनेक घोषणा करण्याचा सपाटा लावलेला आहे. त्यांच्या ‘विमान’सेवेचे प्रेम लक्षात घेता अनेक एसटी बसेसची आगारे आम्ही विमानतळासारखी चकाचक करू अशीही त्यांनी घोषणा केली आहे. त्यांच्याच शब्द वापरायचा झाल्यास एसटी डेपो ‘लाऊंज’सारखी करण्याचा त्यांचा मानस आहे. त्यात चुकीचे काही आहे असे वाटतं नाही. परंतु एसटीची विविध ठिकाणी असलेली आगारे किंवा एसटीच्या कार्यशाळांची सध्याची परिस्थिती पाहता परिवहन मंत्र्यांच्या घोषणा व सद्यस्थिती यात जमीनअस्मानाचे अंतर आहे.

उदाहरणादाखल त्यांच्याच ठाणे शहरातील खोपट एसटी आगाराचे देता येईल. या एसटी आगाराच्या दरवाजातून आत जाण्यासाठी आटापिटा करावा लागतो. कारण, तेथे दिवसाचे चोवीस तास कुणाच्या ना कुणाच्यातरी खासगी मोटारगाडया पार्क केलेल्या असतातच. अधिकाऱ्यांच्या गाड्या कार्यालय आवारात सुलभरीतीने नेता याव्यात म्हूणन तेथे स्लोपही तयार केलेला आहे. ते

तर एक वेळ बाजूला ठेवू. या आगाराच्या पायऱ्यांवर नेहमीच कुणी भिकारी, कुणी गर्दुल्ला बसलेला दिसेलच. रात्री नऊ वाजल्यानंतर तर तेथे समाजकंटाकांचा अड्डाच असतो.. याच आगाराच्या मागील बाजूस नामदेव वाडीत एसटीची मोठी कार्यशाळाही आहे. तिची तर दुर्दशा पाहवत नाही. तेथे एसटीची एक ‘अश्वमेध’ गाडी चक्क दहा वर्षे ‘रुतून’ आहे. हे जणू सध्या एसटीचे प्रतीकच बनून राहिले आहे की काय असे वाटते!

‘गाळात रुतलेली’ एसटी.. कर्मचाऱ्यांच्या प्रसाधनगृहाचे तर दशावतार झाले आहेत. कामगारांना हातपाय धुवायलाही नीट जागा नाही तर नैसर्गिक विधींसाठीतरी योग्य जागा कशी मिळेल, असा प्रतिसवाल एका कामगारांने केला. उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि परिवहन मंत्री सरनाईक यांनी सरकारी लवाजमा न घेता खाजगी पाहणी दौरा करावा, असे आमचे आवाहन आहे. तशीच पाहणी ठाणे रेल्वेस्थानकाच्या परिसरात (प) असलेल्या एसटी आगाराचीही केली जावी. तेथील खंडहर बनलेल्या इमारतीकडे कुणाचेच लक्ष नाही. गरीब बिचाऱ्या प्रवाशांच्या डोक्यावरही कसलेच छपर नाही. हे आधी तयार करा आणि मग ‘लाऊंज’च्या गप्पा मारा!

छायाचित्र मांडणीः प्रवीण वराडकर

Continue reading

परदेशाप्रमाणे भांडुपमध्ये लवकरच दिसणार ‘कलते’ मनोरे?

मुंबईतला लालबहाद्दूर शास्त्री मार्ग, मेट्रो लाईनचे काम आणि भांडुप-मुलुंड परिसर यांचे काय नाते आहे हे एका परमेश्वरालाच माहित! कारण मेट्रोचे अपघात येथेच सुरू झाले आहेत. काही महिन्यांपूर्वी झालेल्या अपघातात मेट्रोची एक स्लॅब कोसळून रिक्षा चक्काचूर झाली होती व माणसे...

मुंबई महापालिकेचा ‘दिव्याखालीच अंधार’!

गेल्या दोन दिवसांपासून मुंबईला वरूणराजा झोडपून काढत आहे. मुसळधार पावसामुळे मुंबई महापालिकेच्या कारभाराची लत्करे वेशीवर टांगली जात आहे. मी-मी म्हणणारे कित्येक आले. गेले. राजकारणातून संपले. पण, मुंबई काही तुंबायची राहिली नाही. यंदा तब्बल महिन्याभराच्या प्रतीक्षेनंतर मुंबईत पावसाचे आगमन झाले....

माध्यमांना ठाकरेंच्या शिवसेनेचे का बरे वावडे?

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे सहा खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आज दाकल झाले. या प्रक्रियेत गेल्या चार दिवसांपासून विविध मराठी वृत्तवाहिन्यांवरील चर्चेत एक सवाल विचारला गेला- उबाठाचे प्रवक्ते पत्रकारांना वा वृत्तवाहिन्यांना उपलब्ध का नसतात? त्याबाबत निरीक्षणातून हाती आलेली...
Skip to content