Homeन्यूज अँड व्ह्यूजहा पाहा मालाड...

हा पाहा मालाड रेल्वेस्थानकाचा मेकओव्हर!

मुंबईत पश्चिम रेल्वेच्या मालाड स्थानकाची दुरुस्ती वा मेकओव्हर गेली तब्बल सात-आठ वर्षे सुरु आहे. (काहींनी तर हे काम सुरु होऊन दहा वर्षे तरी झाली असावीत असा अंदाज व्यक्त केला आहे.) मालाड, कांदिवली व बोरिवली ही वाढणारी रेल्वेस्थानके आहेत हे रेल्वेच्या नियोजन विभागास माहित नाही काय? शिवाय मालाडमधून दररोज लाखो रुपयांचा महसूल मिळत असूनही मलाडाची अशी हेळसांड का? असा प्रश्न साहजिकच उपस्थित होतो. तर त्याचे उत्तर आहे की गुळमुळीत व मुळमुळीत लोकप्रतिनिधी. राजकीय नेत्यांच्या कमरेला बांधलेला वा न बांधलेला ‘कटदोरा’ दिसणारी दिव्यदृष्टी असणाऱ्या राजकीय नेत्यांना पाच-दहा स्थानकापालिकडील स्थानक दिसू नये यावर ‘राजकारण’ असे उत्तर दिल्यास तोंडातून काय प्रतिउत्तर उमटेल? याचा ज्याचा त्याने विचार केलेला बरा! पण त्या राजकारणात बिचाऱ्या नागरिकांची आहुती कशाला?

पुन्हा सरकार व महापालिका जागोजागी स्वच्छ मुंबईचे कौतुक करण्यास सज्जही असते. या स्वच्छतेचे गोडवे गाणाऱ्यांनी जरा पश्चिमेकडील सरकत्या जिन्यावरून चढून दाखवावे. सरकत्या जिन्यावरील पहिल्या पायरीवर पाऊल ठेवताक्षणी हगीनदारीचा घाण वास तुमच्या नाकात जाऊन तुम्हाला कदाचित गुदमरायला होईल. हगीनदारी तसेच पानाच्या पिचकाऱ्यांनी आजूबाजूच्या भिंती रंगवून टाकलेल्या आहेत. त्या नियोजन समितीने एकदा कुणालाही न कळवता हा तथाकथित मेकओव्हर बघूनच घ्यावा. इतका भोंगळ कारभार पंतप्रधान नरेंद्र मोदी सहनच करणार नाहीत याची आम्हाला खात्रीच आहे. मुंबईतील जनता सहशील आहे म्हणूनच आजपर्यंत हे सहन केले आहे. बंगाल किंवा मद्रासमधील जनतेने तर याआधीच कायदा हातात घेऊन रेल्वे अधिकाऱ्यांना बडवून काढले असते. परप्रांतीयांना मुंबईकर सहन करतच आला आहे. आता त्यांची हगीनदारीही सहन करावी असे दोन्ही सरकारांना वाटते काय? यावर कुणा राजकीय नेत्याने सुंगंधी फवाराचा उपाय सांगू नये म्हणजे पुरवली!!

छायाचित्र मांडणीः प्रवीण वराडकर

Continue reading

‘एशियाटीक’ची निवडणूक जूनमध्ये तरी होणार? दोन्ही बाजूंच्या सदस्यांत घुसखोर!

मुंबईतल्या एशियाटीक लायब्ररी, या प्रतिष्ठित संस्थेची निवडणूक 'घुसखोर' सदस्यांशिवाय जून महिन्यात घेण्यात यावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला असला तरी ती जूनमध्येच होईल की नाही, याबाबत अनेकांच्या मनात शंका आहेत. कारण नव्याने निवडल्या जाणाऱ्या कार्यकारिणीची मुदत केवळ सप्टेंबर...

ठाणे पालिकेच्या बेसमेंटमध्ये आहे ५० घमेली धूळ!

ठाणे शहरात संपूर्ण लोकमान्य नगर अगदी जुन्या बस डेपोपासून तो नव्या बस डेपोपर्यंत फेरफटका मारला असता रस्त्याच्या दुतर्फा पार्किंग केलेल्या दुचाक्या व रिक्षा यांना चकवत नागरिक कसे चालत असतील याचा विचारच न केलेला बरा. लोकमान्य नगरात तर एका ठिकाणी...

एक संध्याकाळ ‘बर्वे संचित’च्या सानिध्यात!

ही संध्याकाळ कधीच विसरता येणारी नाही. (संध्याकाळ हा शब्द वाचला की काही रोमँटिक असं वाटेल, पण असं अजिबात नाही. पण, एका वेगळ्या अर्थाचा 'रोमान्स' जरूर आहे.) गर्दीच्या ठिकाणचे आपले रवींद्र नाट्यमंदिर संध्याकाळी फक्त गर्दीच नव्हे तर वाहतुकीच्या प्रचंड कोंडीसाठीही...
Skip to content