Homeन्यूज अँड व्ह्यूजहा पाहा मालाड...

हा पाहा मालाड रेल्वेस्थानकाचा मेकओव्हर!

मुंबईत पश्चिम रेल्वेच्या मालाड स्थानकाची दुरुस्ती वा मेकओव्हर गेली तब्बल सात-आठ वर्षे सुरु आहे. (काहींनी तर हे काम सुरु होऊन दहा वर्षे तरी झाली असावीत असा अंदाज व्यक्त केला आहे.) मालाड, कांदिवली व बोरिवली ही वाढणारी रेल्वेस्थानके आहेत हे रेल्वेच्या नियोजन विभागास माहित नाही काय? शिवाय मालाडमधून दररोज लाखो रुपयांचा महसूल मिळत असूनही मलाडाची अशी हेळसांड का? असा प्रश्न साहजिकच उपस्थित होतो. तर त्याचे उत्तर आहे की गुळमुळीत व मुळमुळीत लोकप्रतिनिधी. राजकीय नेत्यांच्या कमरेला बांधलेला वा न बांधलेला ‘कटदोरा’ दिसणारी दिव्यदृष्टी असणाऱ्या राजकीय नेत्यांना पाच-दहा स्थानकापालिकडील स्थानक दिसू नये यावर ‘राजकारण’ असे उत्तर दिल्यास तोंडातून काय प्रतिउत्तर उमटेल? याचा ज्याचा त्याने विचार केलेला बरा! पण त्या राजकारणात बिचाऱ्या नागरिकांची आहुती कशाला?

पुन्हा सरकार व महापालिका जागोजागी स्वच्छ मुंबईचे कौतुक करण्यास सज्जही असते. या स्वच्छतेचे गोडवे गाणाऱ्यांनी जरा पश्चिमेकडील सरकत्या जिन्यावरून चढून दाखवावे. सरकत्या जिन्यावरील पहिल्या पायरीवर पाऊल ठेवताक्षणी हगीनदारीचा घाण वास तुमच्या नाकात जाऊन तुम्हाला कदाचित गुदमरायला होईल. हगीनदारी तसेच पानाच्या पिचकाऱ्यांनी आजूबाजूच्या भिंती रंगवून टाकलेल्या आहेत. त्या नियोजन समितीने एकदा कुणालाही न कळवता हा तथाकथित मेकओव्हर बघूनच घ्यावा. इतका भोंगळ कारभार पंतप्रधान नरेंद्र मोदी सहनच करणार नाहीत याची आम्हाला खात्रीच आहे. मुंबईतील जनता सहशील आहे म्हणूनच आजपर्यंत हे सहन केले आहे. बंगाल किंवा मद्रासमधील जनतेने तर याआधीच कायदा हातात घेऊन रेल्वे अधिकाऱ्यांना बडवून काढले असते. परप्रांतीयांना मुंबईकर सहन करतच आला आहे. आता त्यांची हगीनदारीही सहन करावी असे दोन्ही सरकारांना वाटते काय? यावर कुणा राजकीय नेत्याने सुंगंधी फवाराचा उपाय सांगू नये म्हणजे पुरवली!!

छायाचित्र मांडणीः प्रवीण वराडकर

Continue reading

.. म्हणून तर उत्तर प्रदेशातल्या झुंडी धावतात इतर राज्यांमध्ये!

"निचली जात है ससूरे.. तुम्हारी हिमंत कैसे हुई, बारात निकालनेकी.. ** मस्ती आवे क्या? चलो सथी, ये बारातीयोंकी जमके मारो.." हा डायलॉग काही कुठल्या वेबसिरीजमधला नाही. परंतु असं घडलंय मात्र नक्की!! तेही उत्तर प्रदेशमधील मथुरा (तेच ते अब मथुरा...

यंदाच्या पावसातही ठाण्यातल्या आनंदाश्रम परिसराची रडगाथा सुरूच!

पावसाळा सुरु झाला की ठाणे शहर व आसपासच्या भागातील विविध रस्त्याच्या कहाण्यांनी वर्तमानपत्रे भरून जात असतात. (तसे पाहिले तर इतर शहरांमध्येही अशीच रडकथा असते.) ठाणे महापालिकेतील सत्ताकेंद्राचे महत्त्वाचा बिंदू असलेल्या 'आनंदाश्रम' परिसरातील रस्त्यांचीही अशीच रडकथा आहे. वरवर पाहता रस्ता...

खरंतर हिंदीभाषिकांनी इतर राज्यांच्या भाषा शिकाव्यात!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखालील नवे सरकार राज्यात आल्यापासून हिंदी भाषेच्या सक्तीचा विषय सुरु झाला आहे हे कुणीही अमान्य करणार नाही. राष्ट्रीय शिक्षण धोरणात मातृभाषा इंग्रजी व हिंदीचा समावेश असल्याचे सांगण्यात येते. काही प्रमाणात ते ठीकही आहे. परंतु हिंदी...
Skip to content