Homeडेली पल्ससौरभ विजय यांनी...

सौरभ विजय यांनी दिला डिजिटल नवोपक्रमावर भर

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत येणाऱ्या भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे (UIDAI) मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ विजय यांनी मुंबईतील युआयडीएआय प्रादेशिक कार्यालयाला नुकतीच भेट दिली. मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतरचा हा त्यांचा पहिलाच प्रादेशिक दौरा आहे. युआयडीएआय प्रादेशिक कार्यालय, मुंबईचे उपमहासंचालक कॅ. लवकेश ठाकूर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी कर्नल अक्षय यादव आणि लेफ्टनंट कर्नल ध्रुव यांनी त्यांचे स्वागत केले.

या भेटीत त्प्रयांनी विविध विषयांवर आपल्मुया सहकाऱ्यांशी चर्चा केली.

चर्चेतले ठळक मुद्दे आणि चर्चा:

कामगिरीचा आढावा: दौऱ्यादरम्यान विजय यांनी प्रादेशिक कार्यालयाच्या कामकाजाची सद्यस्थिती, कामगिरी आणि स्थानिक आव्हाने जाणून घेण्यासाठी येथील पथकाशी सविस्तर चर्चा केली.

भविष्यातील रोडमॅप: मुंबई कार्यालयाचे धोरणात्मक उपक्रम, क्षेत्रीय उपक्रम आणि भविष्यातील कृती आराखडा यावर आधारित एका सर्वसमावेशक सादरीकरणाद्वारे त्यांना माहिती देण्यात आली.

डिजिटल सेवांना गती: महाराष्ट्र, गुजरात, गोवा आणि दादरा व नगर हवेली आणि दमण व दीव या राज्यांमध्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये डिजिटल सेवांचा वापर वाढवणे आणि तंत्रज्ञानावर आधारित आधार सेवा वितरण अधिक बळकट करणे, हा या पुनरावलोकन बैठकीचा मुख्य उद्देश होता.

देशभरात सुरक्षित, विनाव्यत्यय आणि नागरिक-केंद्री ओळख सेवा प्रदान करण्यासाठी युआयडीएआय कटिबद्ध आहे. अधिकाऱ्यांनी डेटा सुरक्षितता आणि कार्यक्षमतेचा सर्वोच्च दर्जा राखत, नागरिकांचा अनुभव अधिक सुकर करण्यासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करावा, अशी सूचना सौरभ विजय यांनी यावेळी केली. विश्वासार्ह डिजिटल ओळखीच्या माध्यमातून नागरिकांना सक्षम बनवण्याच्या युआयडीएआयच्या मोहिमेसाठी मुंबई प्रादेशिक कार्यालय पूर्णपणे समर्पित आहे, असे मुंबई प्रादेशिक कार्यालयाचे उपमहासंचालक कॅ. ठाकूर यांनी सांगितले.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content