Homeमाय व्हॉईसमहाराष्ट्रगीत लिहिणाऱ्या भाषाप्रभुला...

महाराष्ट्रगीत लिहिणाऱ्या भाषाप्रभुला तरी सोडा हो!

अहो पालिका आयुक्त, महाराष्ट्रगीत लिहिणाऱ्या भाषाप्रभुला तरी सोडा हो… स्थळः ठाण्यातला तीन पेट्रोल पम्प परिसर. नेमकं ठिकाण विष्णुनगर पोलीस चौकीला लागूनच! अगदी पाच पावलावर! महाराष्ट्रगीत तसेच अनेक आजरामर नाट्यकृतींनी तमाम महाराष्ट्राला माहित असलेलं लाडकं नाव म्हणजे रामगणेश गडकरी!! ठाणे शहरात त्यांच्या गौरवार्थ गडकरी रंगायतन हे नाट्यगृहही आहे. अशी सर्व परिस्थिती असताना त्यांच्या नावाचा फलक पालिका कचरा कुंडीच्या जवळ असावा हे संतापजनकच नव्हे तर कविकुलाचा अपमान करणारेच कृत्य आहे. खरंतर या चुकीला माफी नाहीच!!

शहरातील कचराही हटवला गेला पाहिजे हे मान्य आहे. पण भाषाप्रभुच्या फलकाशेजारी कचऱ्याने बरबटलेली लक्तरे व कचरा आजबाजूला फेकलेला असणे कितपत योग्य आहे याचा विचार आजूबाजूला राहणाऱ्या आणि ‘आनंद’ नावाच्या मिजाशीत वावरणाऱ्या सर्वांनाच लाजेने माना खाली घालायला लावणारा आहे.

“मंगलदेशा पवित्र देशा! महाराष्ट्र देशा|

प्रणाम घ्यावा, माझा हा श्री महाराष्ट्र देशा||

असे अवीट गीत लिहिणाऱ्या कवीच्या वाटेला अशी अरसिक पालिका येऊ नये असे मनोमन वाटते. कवी पुढे म्हणतात…

“शहर पुण्याच्या, शिवनेरीच्या, पंढरीच्या देशा|

पुंडलिकाच्या, शिवरायांच्या, टिळकांच्याच्या देशा||”

अशा गोड शब्दांत राज्याचे वर्णन करणाऱ्या कवीच्या नशिबी हे काय वाढून ठेवलंय हे पाहिल्यावर डोक्याचा लोच्याच झाला नाही तरच नवल! ‘कल्पनेचे धाडस व चमत्कृती हा जर काव्याचा एक मुख्य गुण मानला तर त्याबाबतीत गडकऱ्यांची बरोबरी करणारे किती निघतील, असा प्रश्न टाकण्यात मुळीच हरकत नाही’ अशी प्रशंसा खुद्द तत्कालीन केसरी व मराठाचे संपादक, प्रख्यात साहित्यिक न. चिं. केळकर यांनी केली होती. हे गडकरींचे श्रेष्ठत्व सिद्ध करणारीच होती हे कोण अमान्य करेल?

Continue reading

हेतूपुरस्सर धूळ खात पडलेल्या मिडी बसेस आणा आधी मुंबईच्या रस्त्यांवर!

मुंबई महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर नुकताच 'लोकसवांद'मध्ये प्रथमच विस्तृत संवाद साधत पालिका प्रशासनासमोरील काही आव्हाने व भविष्यातील मोठ्या प्रकल्पांबाबत चर्चा केली. एखाद्या मोठ्या महानगरीचे व्यवस्थापन करणे तसे जिकरीचेच आणि आव्हानत्मक असते यात शंकाच नाही....

टेकाड्यावर झोपडपट्ट्या उभारणारे भूमाफिया मोकाटच!

"ऐशा झोपडपट्ट्या माजवाव्या गहिवर काढोनी गाजवाव्या निवडणूक येता खाजवाव्या, धूर्त हस्ते सर्व पक्षांसी वाटे हवी, कैसी वर्णील दुबळा कवी, पामर वाचा" (मंगेश पाडगावकर) कविवर्यांची ही सुमारे 30 वर्षांपूर्वीची कविता आठवण्याचं कारण ठरली मुंबईतल्या घाटकोपरच्या नारायण नगरातील दरड कोसळून झालेली भीषण दुर्घटना! कवितेत झोपड्यांऐवजी दरडी...

भाईंदरमध्ये पोलिसांच्या कार्यक्रमात ताकाचा ग्लास आणि …

वाचक हो, तुम्हाला आठवत असेलच की जुन्या हिंदी चित्रपटात अर्ध्या नोटेचं चिटोरं दाखवलं की खलनायकाच्या गुहेत विनासायास प्रवेश मिळत असे. (हल्ली काही वेबसिरीजमध्येही हा खेळ दाखवत असतात) तसेच लाचलूचपत प्रतिबंधक खात्यातर्फे धाड पडली की काहीजण नोटा खातात. काहीजण संडासाच्या...
Skip to content