Homeन्यूज अँड व्ह्यूजका झाली महाराष्ट्र...

का झाली महाराष्ट्र भाजपची बोलती बंद?

‘इंडिया टुडे’ या देशातील प्रख्यात साप्ताहिकाने औरंगजेब कबरीसंदर्भातील वादावर आधारित कव्हरस्टोरी केली आहे. समतोल आहे, सर्व संबंधितांच्या प्रतिक्रिया आहेत. कबर खणून काढणारेही आहेत तसेच कबरीच्या बाजूनेही बोलणारेही आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर आम्ही कबर हटवण्याबाजूचेच आहोत असे ठासून सांगितले आहे. असे सांगताना त्यांनी काँग्रेसच्या राजवटीत या कबरीला कायद्याने संरक्षण प्राप्त झाले आहे असे ओघात स्पष्ट केले आहे. पण अटल बिहारींवाजपेयी यांच्या नेतृत्त्वाखालील भाजप सरकारही केंद्रात सत्तास्थानी होते याचा त्यांना विसर पडलेला दिसतो. तसेच जनता राजवटीतही जनता दलात बहुसंख्येने जनसंघीय नेते मंत्रीमंडळात होते हेही मुख्यमंत्री विसरलेले दिसतात.

भाजप

‘इंडिया टुडे’ या साप्ताहिकाचा राजकीय दबदबा फार मोठा आहे. त्यांची वृत्तवाहिनी तर सरकारलाच वाहिली असल्याचा आरोप विरोधक सतत करत असतातच! अशा परिस्थितीत प्रभावशाली अशा साप्ताहिकाने या धगधगत्या विषयावर कव्हरस्टोरी केल्याने राजकीय वर्तुळात तर्ककुतर्क करण्यात येत आहेत. हे येथेच थांबत नाही. कारण, पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या कार्यालयात या साप्ताहिकाचे प्रतिनिधी व वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधींना सहजी प्रवेश मिळत असतो, असा दिल्लीतील अनुभव आहे. त्यातच ईदनिमित्त ‘सौगात’ जाहीर करून पंतप्रधानानी राजकीय ‘सिक्सर’ मारलेली असताना महाराष्ट्रातील भाजपमधील ‘अशान्त टापू’ने केंद्रीय नेतृत्त्वाचा रोषच ओढवून घेतल्याचे दबक्या आवाजात बोलले जात आहे. दरम्यान, महाराष्ट्र विधिमंडळात तसेच त्याआधीही कबरीचा विषय काढून ‘राजकीय दंगल’ करणाऱ्या भाजप नेत्यांच्या तोंडातून ‘कबरी’मधील ‘क’ हा शब्दही जनतेने न ऐकल्याने जनताही बेचैन झाल्याचे वृत्त आहे.

Continue reading

परदेशाप्रमाणे भांडुपमध्ये लवकरच दिसणार ‘कलते’ मनोरे?

मुंबईतला लालबहाद्दूर शास्त्री मार्ग, मेट्रो लाईनचे काम आणि भांडुप-मुलुंड परिसर यांचे काय नाते आहे हे एका परमेश्वरालाच माहित! कारण मेट्रोचे अपघात येथेच सुरू झाले आहेत. काही महिन्यांपूर्वी झालेल्या अपघातात मेट्रोची एक स्लॅब कोसळून रिक्षा चक्काचूर झाली होती व माणसे...

मुंबई महापालिकेचा ‘दिव्याखालीच अंधार’!

गेल्या दोन दिवसांपासून मुंबईला वरूणराजा झोडपून काढत आहे. मुसळधार पावसामुळे मुंबई महापालिकेच्या कारभाराची लत्करे वेशीवर टांगली जात आहे. मी-मी म्हणणारे कित्येक आले. गेले. राजकारणातून संपले. पण, मुंबई काही तुंबायची राहिली नाही. यंदा तब्बल महिन्याभराच्या प्रतीक्षेनंतर मुंबईत पावसाचे आगमन झाले....

माध्यमांना ठाकरेंच्या शिवसेनेचे का बरे वावडे?

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे सहा खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आज दाकल झाले. या प्रक्रियेत गेल्या चार दिवसांपासून विविध मराठी वृत्तवाहिन्यांवरील चर्चेत एक सवाल विचारला गेला- उबाठाचे प्रवक्ते पत्रकारांना वा वृत्तवाहिन्यांना उपलब्ध का नसतात? त्याबाबत निरीक्षणातून हाती आलेली...
Skip to content