Homeन्यूज अँड व्ह्यूजका झाली महाराष्ट्र...

का झाली महाराष्ट्र भाजपची बोलती बंद?

‘इंडिया टुडे’ या देशातील प्रख्यात साप्ताहिकाने औरंगजेब कबरीसंदर्भातील वादावर आधारित कव्हरस्टोरी केली आहे. समतोल आहे, सर्व संबंधितांच्या प्रतिक्रिया आहेत. कबर खणून काढणारेही आहेत तसेच कबरीच्या बाजूनेही बोलणारेही आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर आम्ही कबर हटवण्याबाजूचेच आहोत असे ठासून सांगितले आहे. असे सांगताना त्यांनी काँग्रेसच्या राजवटीत या कबरीला कायद्याने संरक्षण प्राप्त झाले आहे असे ओघात स्पष्ट केले आहे. पण अटल बिहारींवाजपेयी यांच्या नेतृत्त्वाखालील भाजप सरकारही केंद्रात सत्तास्थानी होते याचा त्यांना विसर पडलेला दिसतो. तसेच जनता राजवटीतही जनता दलात बहुसंख्येने जनसंघीय नेते मंत्रीमंडळात होते हेही मुख्यमंत्री विसरलेले दिसतात.

भाजप

‘इंडिया टुडे’ या साप्ताहिकाचा राजकीय दबदबा फार मोठा आहे. त्यांची वृत्तवाहिनी तर सरकारलाच वाहिली असल्याचा आरोप विरोधक सतत करत असतातच! अशा परिस्थितीत प्रभावशाली अशा साप्ताहिकाने या धगधगत्या विषयावर कव्हरस्टोरी केल्याने राजकीय वर्तुळात तर्ककुतर्क करण्यात येत आहेत. हे येथेच थांबत नाही. कारण, पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या कार्यालयात या साप्ताहिकाचे प्रतिनिधी व वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधींना सहजी प्रवेश मिळत असतो, असा दिल्लीतील अनुभव आहे. त्यातच ईदनिमित्त ‘सौगात’ जाहीर करून पंतप्रधानानी राजकीय ‘सिक्सर’ मारलेली असताना महाराष्ट्रातील भाजपमधील ‘अशान्त टापू’ने केंद्रीय नेतृत्त्वाचा रोषच ओढवून घेतल्याचे दबक्या आवाजात बोलले जात आहे. दरम्यान, महाराष्ट्र विधिमंडळात तसेच त्याआधीही कबरीचा विषय काढून ‘राजकीय दंगल’ करणाऱ्या भाजप नेत्यांच्या तोंडातून ‘कबरी’मधील ‘क’ हा शब्दही जनतेने न ऐकल्याने जनताही बेचैन झाल्याचे वृत्त आहे.

Continue reading

न्यायमूर्तींचे निरीक्षण मोदी सरकारच्या अंगाशी!

अखेर अडीच-तीन महिन्यांच्या घोळानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलाच! त्यासाठी विद्यार्थ्यांना जंतरमंतरवर चार दिवस आंदोलन करावे लागले, लाठीमर खावा लागला. अनेक विद्यार्थ्यांना तर दिल्ली पोलिसांनी बदडून काढलेले जनतेने पाहिले. (विद्यार्थ्यांनीही पोलिसांना मारले...

‘य. दि.’ स्मरणाच्या निमित्ताने दिसली मुणगेकरांची वैचारिक दिवाळखोरी!

यशवंत दिनकर फडके उर्फ य. दि. यांचा पहिला एन्काऊंटर सुमारे 50 वर्षांपूर्वी चर्चगेटजवळील केसी महाविद्यालयात 'बॉम्बे कॉलेज ऑफ जर्नालीझम'च्या वर्गात झाला. त्यांचा विषय अर्थातच राजकारण, खास करून महाराष्ट्रातील राजकारण असा होता. काही काळानेच पत्रकारितेत रीतसर प्रवेश झाल्यावर मात्र विविध...

घाटकोपर पूर्व चकचकित तर, पश्चिम ओंगळवाणे!

मुंबई महापालिका असो, मध्य रेल्वे असो, मेट्रो असो वा अगदी मुंबई प्राधिकरण असो. या सर्व सरकारी यंत्रणानी घाटकोपर स्थानकाच्या पश्चिम परिसरावर धडधडीत अन्याय केल्याचे दोन दिवसांच्या पाहणीत आढळून आले. पूर्वी पूर्व भाग अगदी चिंचोळा होता. तेव्हापासून त्या भागात जाणे...
Skip to content