Homeमाय व्हॉईसरत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून कुठल्या...

रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून कुठल्या गायत्री मंत्राचे पठण?

रत्नागिरी जिल्ह्याच्या कारभाराबाबत गेल्या अनेक महिन्यांपासून गंभीर तक्रारी माझ्याकडे येत होत्या. काहींनी तर, चेक नाक्यावर वा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या सीसीटीव्हीचे क्लिप तपासले तर काही विशिष्ट गाड्या ठराविक वेळेला बंदी असूनही कशा ये-जा करत होत्या ते वरिष्ठ अधिकाऱ्यांना समजून येईल, असा दावा केला आहे. रात्री नऊ वाजल्यानंतर जिल्हाधिकारी कुठल्या गायत्री मंत्रांचे पठण करतात आणि कसली आचमने घेतात हे कळले तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांना क्षणभरही तेथे ठेवणार नाहीत, याची खात्री वाटते.

मुख्यमंत्र्यांचे उजवे हात समजले जाणारे मंत्रीमहोदयही या जिल्हाधिकाऱ्यांपुढे हतबल असल्याचे समजते. काहींनी तर हेच मंत्रीमहोदय त्यांना पाठीशी घालत असल्याची कुजबुज आहे. या मंत्री महाशयाचें जवळचे नातेवाईक नेहमीच सरकारी कामात हस्तक्षेप करत असल्याची कुजबुज संपूर्ण जिल्ह्यात आहे. म्हणूनच सोबत जोडलेली तक्रार येथे देत आहे-

जिल्ह्याधिकाऱ्यांना नोटीस आणि नोटिशीत त्यांच्या भेसूर कारभाराबाबतचा पंचनामा!

येथील वकिल एड. सूरज मोरे यांनी थेट जिल्हाधिकारी आणि जिल्ह्याचे आपत्ती निवारण समितीप्रमुख लक्ष्मी नारायण मिश्रा यांनी कोरोनाच्या आपत्ती काळात गेल्या वर्षभर जो धिंगाणा या जिल्ह्यात घातला होता त्याला जबाबदार ठरवून जनतेचे जे हाल झाले याबाबत खरपूस समाचार घेणारी नोटीस पाठवल्याने जनतेत आनंदाचे चित्र आहे.

कोरोना काळात अनेकांच्या जवळचे नातेवाईक गेले. अनेकांना आपले रोजगार आणि नोकऱ्या गमवाव्या लागल्या. खाण्यापिण्याचे हाल झाले. वारंवार होणाऱ्या लॉकडाऊनमुळे लोकं सैरभैर झाली. अशा या आपत्ती काळात शासकीय यंत्रणांना घटनेने दिलेल्या विशेष अधिकारात शासनातले लोक माणसासारखं वागण्याऐवजी सैतानासारखं वागत असल्याचे अनुभव जनतेने घेतले. तरीही शांतपणे आणि संयमी लोकांवर शासकीय यंत्रणांनी आपली मुजोरी दाखवली. या सर्व संतापला एड. सूरज मोरे यांनी वाचा फोडली म्हणून त्यांना धन्यवाद!

रत्नागिरी

रत्नागिरी जिल्हा कोरोनाग्रस्त होण्यास ना. उदय सामंत आणि जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांच्याकडे मोठया प्रमाणावर दोष जात असून, आपत्ती काळात हे दोघे जण आणि सोबत आमदार राजन साळवी असे तिघे शासकीय रुग्णालयातील सिव्हिल सर्जनला नामोहरम करणारे राजकारण खेळत होते. त्यांना लोकांच्या जीवाची अजिबात पर्वा नव्हती. भूतपूर्व सिव्हिल सर्जन डॉ. अशोक बोल्डे यांच्या कारभारात नको तितका हस्तक्षेप करत ही मंडळी शासकीय रुग्णालयात मोठया प्रमाणावर होणाऱ्या भ्रष्टाचाराबाबत दोषी असलेल्या लोकांना पाठीशी घालायचे राजकारण करत होते.

जिल्हाधिकारी केबिनमध्ये वरील तिघांकडून तत्कालीन सिव्हिल सर्जन डॉ. अशोक बोल्डे यांना दमबाजीही करण्यात आली होती. एका प्रामाणिक आणि हुशार सिव्हिल सर्जनच्या कामात हस्तक्षेप करणाऱ्या, त्यांना वारंवार अपमानित करणाऱ्या या तिघांनी रत्नागिरी शासकीय रुग्णालयात अशाप्रकारे धुमाकूळ घालून जो खेळखंडोबा केला आणि जिल्ह्याच्या आरोग्यसेवेचे जे तीनतेरा वाजवले अशा या तिघांना जबाबदार अधिकारी आणि नेते कसं म्हणू शकता?

हे तर अत्यंत बेजबाबदार आणि विक्षिप्त लोक असून, रत्नागिरीतील जनता यांच्या विचित्र कारभाराखाली अजिबात सुरक्षित नाही. आपत्ती काळात लोकांशी कसं वागायचं याचं भानही नसलेले हे बेभान लोक आहेत. आपत्ती निवारण समितीचा प्रमुख जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा हे रात्री 9नंतर कोणाचा फोनही उचलत नाहीत, अशा त्यांच्याबदल तक्रारी असून सूरज मोरे यांनी पाठवलेल्या खलित्याबाबत त्यांचे सर्वत्र स्वागतच होईल!

रत्नागिरीतील एवढ्या मोठ्या वकील वर्गापैकी एकट्या सूरज मोरे यांनी बेभान यंत्रणेविरोधात आवाज उठवला म्हणून ते विशेष अभिनंदनास पात्र आहेत, असे शेखरकुमार भुते, संपादक: अनियतकालीक रंगयात्री, यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हस्तक्षेप केला तरच या परिस्थितीत सुधारणा होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

1 COMMENT

Comments are closed.

Continue reading

भाईंदरमध्ये पोलिसांच्या कार्यक्रमात ताकाचा ग्लास आणि …

वाचक हो, तुम्हाला आठवत असेलच की जुन्या हिंदी चित्रपटात अर्ध्या नोटेचं चिटोरं दाखवलं की खलनायकाच्या गुहेत विनासायास प्रवेश मिळत असे. (हल्ली काही वेबसिरीजमध्येही हा खेळ दाखवत असतात) तसेच लाचलूचपत प्रतिबंधक खात्यातर्फे धाड पडली की काहीजण नोटा खातात. काहीजण संडासाच्या...

न्यायालयात शब्दांना धार, बोरूही चालतो.. पण हातचं राखून!

ठाणे शहरात नुकतेच शहरातील 'वाहतूक लोककेंद्री कशी असावी' यावर एक चर्चासत्र होते. या सत्रात दिगज्ज वक्ते होते. सर्वोच्च न्यायालयातले निवृत्त न्या. अभय ओक, ज्येष्ठ शास्त्रज्ञ अनिल काकोडकर, अ. पा. देशपांडे व नगर रचनाकार सुलक्षणा महाजन आदी तगडे वक्ते होते....

न्यायमूर्तींचे निरीक्षण मोदी सरकारच्या अंगाशी!

अखेर अडीच-तीन महिन्यांच्या घोळानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलाच! त्यासाठी विद्यार्थ्यांना जंतरमंतरवर चार दिवस आंदोलन करावे लागले, लाठीमर खावा लागला. अनेक विद्यार्थ्यांना तर दिल्ली पोलिसांनी बदडून काढलेले जनतेने पाहिले. (विद्यार्थ्यांनीही पोलिसांना मारले...
Skip to content