Homeहेल्थ इज वेल्थमुंबईतला पहिला जीबीएस...

मुंबईतला पहिला जीबीएस रुग्ण अंधेरीत!

मुंबईत पहिला गुइलेन-बॅरे सिंड्रोम (जीबीएस) रुग्ण आढळला आहे. अंधेरीतील एका 64 वर्षीय महिलेला या दुर्मिळ मज्जातंतू विकाराचे निदान झाल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अंधेरीतील या जीबीएस संशयित महिलेवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या महिलेला ताप आणि अतिसाराचा इतिहास असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर तिला पक्षाघातही झाला होता.

दरम्यान, महाराष्ट्रात गुरुवारपर्यंत एकूण 173 संशयित जीबीएस रुग्ण होते. शुक्रवारी ही संख्या 180 वर पोहोचली, ज्यामध्ये चार नवीन संशयित रुग्ण आढळले. उर्वरित तीन रुग्ण मागील दिवसातील होते. यापैकी 146 रुग्णांना जीबीएसची पुष्टी झाली आहे. यातील सहा मृत्यूंपैकी एकाचा जीबीएसमुळे मृत्यूची पुष्टी झाली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या एकात्मिक रोग देखरेख कार्यक्रमानुसार, 180 रुग्णांपैकी 35 रुग्ण पुणे महानगरपालिकेतील आहेत. 88 रुग्ण पीएमसी क्षेत्रातील नव्याने समाविष्ट झालेल्या गावांतील आहेत. 25 रुग्ण पिंपरी-चिंचवड महापालिकेतील आहेत. 24 रुग्ण पुणे ग्रामीणमधील आहेत आणि आठ रुग्ण इतर जिल्ह्यांतील आहेत.

राज्यभरात सुमारे 58 जीबीएस रुग्ण आयसीयूमध्ये आहेत. त्यातील 22 व्हेंटिलेटरवर आहेत तर 79 रुग्णांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. 9 जानेवारीपासून मुंबईतील विविध भागातून 4,282 पाण्याचे नमुने गोळा करण्यात आले आहेत आणि ते रासायनिक आणि जैविक विश्लेषणासाठी सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. शुक्रवारी सोळा नवीन जलस्रोत दूषित आढळले. यासह, एकूण 53 जलस्रोत दूषित असल्याचे आढळून आले आहे.

Continue reading

अखिलेश यादवचे बंधू प्रतिक यांचा संशयास्पद मृत्यू!

समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंग यादव यांचे लहान पुत्र तसेच समाजवादी पार्टीचे सध्याचे प्रमुख अखिलेश यादव यांचे लहान सावत्र बंधू प्रतिक यादव यांचे आज पहाटे वयाच्या ३८व्या वर्षी आकस्मिक निधन झाले. भारतीय जनता पार्टीच्या नेत्या...

जान्हवी मोरे स्मृती कॅरम स्पर्धेत स्वरा कदम, ओमकार वडर विजेते

डोंबिवली (पूर्व) येथील दत्तनगर उत्कर्ष मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय कॅरमपटू जान्हवी मोरे स्मृतिप्रीत्यर्थ १६ वर्षांखालील मुलां-मुलींच्या राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत अनुक्रमे कोल्हापूरच्या ओमकार वडर आणि रत्नागिरीच्या स्वरा कदमने विजेतेपदाचा मान मिळवला. शास्त्री हॉलमध्ये झालेल्या या स्पर्धेत ठाणे, मुंबई, मुंबई...

तृणमूलच्या विळख्यातून प. बंगाल बाहेर! आता कसोटी सुवेंधूंची!!

ममता बॅनर्जींचा पाठोपाठ दोन्ही विधानसभा निवडणुकीत सलग दोन वेळा पराभव करून देशात जायंट किलर ठरलेले सुवेंधू अधिकारी यांनी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून रविवारी शपथ घेतली आणि राज्यात नव्या पर्वाला सुरूवात झाली. ममता बॅनर्जीच्या पंधरा वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत सतत हिंसाचार,...
Skip to content