Homeन्यूज अँड व्ह्यूजठाणे शाहरातल्या व्यापाऱ्यांचा...

ठाणे शाहरातल्या व्यापाऱ्यांचा देवपिता आहे तरी कोण?

ठाणे शहरातील सर्व सरकारी व नीमसरकारी यंत्रणानी राममारुती रोडवरील व्यापारी संघ तसेच ठाण्याच्या समस्त व्यापाऱ्यांना राममारुती रोडवरील पदपथ ‘आंदण’ दिलेले आहेत काय? हे जाहीरच करून टाकले तर बरे होईल. कारण, उठसुठ काही नियम आले की बंडाचा झेंडा हातात घेणारे व्यापारी बंधू (?) जनतेच्या हक्काचे असलेले पदपथही मोकळे सोडायला तयार होत नाहीत. देशात वा राज्यात कुठेही रस्त्याच्या दोन्ही बाजूस पार्किंग असतानाही गेले तीन दिवस काही कारणाने राममारुती रोडवर कामानिमित्त येणेजाणे झाले तेव्हा पदपथ गायबच असलेले दिसले. शिवाय कुणीतरी बड्या आसामीने आपल्या पित्याच्या आठवणीसाठी बांधलेल्या इमारतीने तर पदपथ गिळंकृत केलेला दिसला. तेथेच त्यांनी आपल्या गाडीसाठी उतरण्ड तयार केलेले दिसले.

त्याच्यापुढे तर एका दुकानदाराने आपल्या दुकानाची पायरीच पदपथावर आणली आहे. याचा अर्थच या व्यापारी मंडळीचा ‘देवपिता’ कुणी सॉलिड माणूस असणार हे उघडच आहे. कारण महापालिका प्रशासन वा पोलीस / वाहतूक प्रशासनाला न जुमानण्याची हिंमत ‘देवपित्या’शिवाय होणारच नाही.. म्हणजे आता येत्या नववर्षापर्यन्त गोखले रोड, राममारुती रोडवरील वाहतूककोंडीबाबत बोलायलाच नको. आता ठाणे जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनीच याकडे लक्ष दयावे, असे वाटायला लागले आहे.

Continue reading

एक संध्याकाळ ‘बर्वे संचित’च्या सानिध्यात!

ही संध्याकाळ कधीच विसरता येणारी नाही. (संध्याकाळ हा शब्द वाचला की काही रोमँटिक असं वाटेल, पण असं अजिबात नाही. पण, एका वेगळ्या अर्थाचा 'रोमान्स' जरूर आहे.) गर्दीच्या ठिकाणचे आपले रवींद्र नाट्यमंदिर संध्याकाळी फक्त गर्दीच नव्हे तर वाहतुकीच्या प्रचंड कोंडीसाठीही...

ठाणे शहरातल्या वाहतूककोंडीचे बिल पोलिसांच्या वाहतूक शाखेवर!

ठाणे शहराच्या कोपरी उड्डाणपुलावर क्रेन कोसळणे, माजिवडा चौकात रस्ता खचणे, घोडबंदर रोडवरील खोळम्बलेली सेवारस्त्यांची कामे, तसेच शहरभर या ना त्या कारणाने खोदून ठेवलेल्या अनेक रस्त्यांमुळे प्रचंड वाहतूककोंडी होत असताना त्याचे बिल पोलिसांच्या वाहतूक शाखेवर फाडले जात असल्याने वाहतूक पोलिसात...

मदिरा व मदिराक्षी! पोलीस अधिकाऱ्यांचे डोंबिवलीच्या वेशीवर ‘मै टल्ली हो गयी..’

डोंबिवलीनजिकच्या शीळ फाट्यावरून डोंबिवलीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पडले नावाचे सुंदर गाव आहे. गावात अजून बऱ्यापैकी निसर्ग शाबूत आहे. उंच इमारती आहेत. पण उंची गगनाला वेसण घालण्याइतपत नाही, ही जमेची बाजू! हे पडले गाव सुरु होताच मुक्ता नामक विकासकाची ओळख व्हायला...
Skip to content