Homeन्यूज अँड व्ह्यूजठाणे शाहरातल्या व्यापाऱ्यांचा...

ठाणे शाहरातल्या व्यापाऱ्यांचा देवपिता आहे तरी कोण?

ठाणे शहरातील सर्व सरकारी व नीमसरकारी यंत्रणानी राममारुती रोडवरील व्यापारी संघ तसेच ठाण्याच्या समस्त व्यापाऱ्यांना राममारुती रोडवरील पदपथ ‘आंदण’ दिलेले आहेत काय? हे जाहीरच करून टाकले तर बरे होईल. कारण, उठसुठ काही नियम आले की बंडाचा झेंडा हातात घेणारे व्यापारी बंधू (?) जनतेच्या हक्काचे असलेले पदपथही मोकळे सोडायला तयार होत नाहीत. देशात वा राज्यात कुठेही रस्त्याच्या दोन्ही बाजूस पार्किंग असतानाही गेले तीन दिवस काही कारणाने राममारुती रोडवर कामानिमित्त येणेजाणे झाले तेव्हा पदपथ गायबच असलेले दिसले. शिवाय कुणीतरी बड्या आसामीने आपल्या पित्याच्या आठवणीसाठी बांधलेल्या इमारतीने तर पदपथ गिळंकृत केलेला दिसला. तेथेच त्यांनी आपल्या गाडीसाठी उतरण्ड तयार केलेले दिसले.

त्याच्यापुढे तर एका दुकानदाराने आपल्या दुकानाची पायरीच पदपथावर आणली आहे. याचा अर्थच या व्यापारी मंडळीचा ‘देवपिता’ कुणी सॉलिड माणूस असणार हे उघडच आहे. कारण महापालिका प्रशासन वा पोलीस / वाहतूक प्रशासनाला न जुमानण्याची हिंमत ‘देवपित्या’शिवाय होणारच नाही.. म्हणजे आता येत्या नववर्षापर्यन्त गोखले रोड, राममारुती रोडवरील वाहतूककोंडीबाबत बोलायलाच नको. आता ठाणे जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनीच याकडे लक्ष दयावे, असे वाटायला लागले आहे.

Continue reading

मदिरा व मदिराक्षी! पोलीस अधिकाऱ्यांचे डोंबिवलीच्या वेशीवर ‘मै टल्ली हो गयी..’

डोंबिवलीनजिकच्या शीळ फाट्यावरून डोंबिवलीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पडले नावाचे सुंदर गाव आहे. गावात अजून बऱ्यापैकी निसर्ग शाबूत आहे. उंच इमारती आहेत. पण उंची गगनाला वेसण घालण्याइतपत नाही, ही जमेची बाजू! हे पडले गाव सुरु होताच मुक्ता नामक विकासकाची ओळख व्हायला...

नव्या महापालिका आयुक्तांचे स्वागत करताना…

मुंबईच्या पहिल्या महिला महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांचे मुंबईकरांच्या वतीने स्वागत करताना त्यांना मुंबईतल्या गिरगावातल्या 'हौदा'कडे बोट दाखवण्याची इच्छा नव्हती. परंतु त्या मुंबईच्या मेट्रो प्रकल्पाच्या प्रमुख होत्या. आजही तो अतिरिक्त कार्यभार त्यांच्याकडेच आहे, त्यामुळे हीच संधी घेतली म्हणाना. मुंबई...

लांब जटा.. टिळा-टोपी-माळा, अशा प्रतिमेला छेद देणारा भोंदू!

कॅप्टन नसलेल्या आणि इयत्ता दहावी नापास असलेल्या अशोक खरात नामक भोंदूबाबाच्या विविध कथांनी राज्यातील वर्तमानपत्रांचे रकानेच्या रकाने सध्या भरून वाहत आहेत! तसे पाहिले तर आपल्या राज्यालाच नव्हे तर संपूर्ण देशाला बुवाबाजींनी ग्रासलेले आहे. कुठे आसाराम आहेत तर कुठे बाबा...
Skip to content