Homeटॉप स्टोरी20 नोव्हेंबरला महाराष्ट्रात...

20 नोव्हेंबरला महाराष्ट्रात मतदान! 23ला निकाल!!

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका एकाच टप्प्यात होणार असून त्याचकरीता येत्या 20 नोव्हेंबरला मतदान होईल. मतमोजणी 23 नोव्हेंबरला होणार असून त्याचदिवशी निकाल जाहीर केले जातील.

देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज नवी दिल्लीत एका पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. या घोषणानंतर लगेचच महाराष्ट्रात निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या विधानसभा निवडणुकीसाठी 22 ऑक्टोबरला अधिसूचना जारी केली जाईल. उमेदवारीअर्ज भरण्याची शेवटची तारीख 29 ऑक्टोबर असेल. 30 ऑक्टोबरला उमेदवारीअर्जांची छाननी केली जाईल. 4 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारांना आपले अर्ज मागे घेता येतील, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.

मत

महाराष्ट्रात 36 जिल्ह्यांत असलेल्या 288 मतदारसंघात याकरीता मतदान घेतले जाईल. यापैकी 234 मतदारसंघ सामान्य असतील तर 25 मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी आणि 26 मतदारसंघ अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी आरक्षित असतील, असेही ते म्हणाले.

महाराष्ट्रातल्या सध्याच्या विधानसभेचा कार्यकाल 27 नोव्हेंबर 2024पर्यंत आहे. त्यापूर्वी मतदानाची आणि नव्या विधानसभा अस्तित्त्वाची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करणे निवडणूक आयोगाला बंधनकारक होते. त्यानुसार या सर्व मतदानाची आणि मतमोजणीची आखणी करण्यात आली आहे. महाराष्ट्रात एकूण नऊ कोटी 59 लाख मतदार आहेत. त्यात पुरुष मतदारांची संख्या चार कोटी 59 लाख असून महिला मतदारांची संख्या चार कोटी 64 लाख आहे. तृतीयपंथीय मतदारांची संख्या 56 हजार आहे. सहा लाख 32 हजार दिव्यांग मतदार आहेत. 12 लाख 48 हजार मतदार 85 वर्षांवरील आहेत तर शंभरी ओलांडलेले 49 हजार मतदार या निवडणुकीत आपले कर्तव्य बजावू शकतात. एक कोटी 85 लाख तरुण मतदार यावेळी मतदानाचा हक्क बजावू शकतील.

Continue reading

बाळासाहेबांच्या रस्त्यात तुडवण्याच्या विचाराची सावंतांनी करून दिली आठवण

जो पक्ष तुम्हाला उमेदवारी देऊन निवडून आणतो, त्या पक्षाशी एकनिष्ठ राहण्याऐवजी पक्षाशी गद्दारी करता? अरे अशी गद्दारी करणाऱ्याला रस्त्यात तुडवा, असे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांचा हाही विचार लक्षात ठेवणे आवश्यक आहे, अशी...

नामांकने पाठवा प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी

राष्ट्रीय पातळीवर अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या, प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी, नामांकने पाठवावीत, असे आवाहन केंद्र सरकारने केले आहे. देशभरातल्या मुलांना, त्यांच्या अद्वितीय कामगिरीसाठी हे पुरस्कार दरवर्षी प्रदान केले जातात. शौर्य, क्रीडा, सामाजिक शास्त्रे, विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण आणि...

मुंबई-अहमदाबाद ‘वंदे भारत’ला आजपासून कायमस्वरूपी 20 बोगी

रेल्वेने मुंबई सेंट्रल-अहमदाबाद ‘वंदे भारत एक्सप्रेस’च्या (गाडी क्रमांक 22961/22962) बोगींची संख्या 16वरून 20पर्यंत कायमस्वरूपी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. बोगी वाढविण्‍याचा हा बदल आजपासून म्हणजेच 28 एप्रिलपासून अंमलात आणण्‍यात येईल. या गाडीच्या  वाढवण्यात आलेल्या या चार डब्यांमध्ये तीन 'एसी चेअर...
Skip to content