Homeमुंबई स्पेशलकाळा घोडा महोत्सवातल्या...

काळा घोडा महोत्सवातल्या पर्यटकांना पालिका बचतगटांच्या उत्पादनांची भुरळ

मुंबईतल्या फोर्ट परिसरात सध्या काळा घोडा कलामहोत्सव सुरू आहे. या महोत्सवाचा आनंद घेण्यासाठी मुंबईसह देशभरातील पर्यटक येत आहेत. यामध्ये मुंबई महापालिकेने अर्थसहाय्य केलेल्या बचतगटांनीदेखील या महोत्सवात दालन प्रदर्शित केले आहेत. महिलांनी कलाकुसरीने आणि मोठ्या कौशल्याने तयार केलेली विविध आभूषणे, संसारोपयोगी वस्तू, खाद्यपदार्थ, सौंदर्यप्रसाधने पर्यटकांच्या पसंतीला उतरत आहेत.

कलाकारांमधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी मुंबईतल्या काळा घोडा महोत्सवाला विशेषत्वाने ओळखले जाते. या महोत्सवाच्या माध्यमातून नवकलाकारांना सतत उर्जा मिळत असते. यंदा शनिवारी २५ जानेवारीपासून या उत्सवाला सुरुवात झाली आहे. रविवार, २ फेब्रुवारीपर्यंत हा महोत्सव सुरू राहणार आहे. या महोत्सवात मुंबईसह देशभरातल्या कलाकारांनी आपली कलादालने प्रदर्शित केली आहेत.

गरजू महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी मुंबई महापालिका सातत्याने विविध योजना राबवित असते. पालिकेच्या नियोजन विभागामार्फत महिला बचतगटांना अर्थसहाय्य केले जाते. या महिलांच्या बचतगटांनी तयार केलेल्या उत्पदनांना आंतरराष्ट्रीय ओळख मिळावी, प्रसिद्धी मिळावी तसेच त्यातून महिलांना आर्थिक उत्पन्न मिळावे, यासाठीदेखील पालिका विविध प्रकारचे व्यासपीठ उपलब्ध करून देत असते. याचाच एक भाग म्हणून काळा घोडा महोत्सवातही पालिकेने या बचतगटांसाठी दालने उपलब्ध करून दिली आहेत. या महोत्सवात १८ बचतगट सहभागी झाले आहेत. त्यामध्ये बी, ई, एफ दक्षिण, एफ उत्तर, जी दक्षिण, एच पूर्व, एल, एम पश्चिम, एन, एस, पी उत्तर, आर दक्षिण या प्रशासकीय विभागातील बचतगटांचा समावेश आहे. कापडव्यवसाय, आभूषणे, कापडी पिशव्या, खाद्यपदार्थ, गोधडी, शिल्पकला, महिलांसाठीच्या-कार्यालयीन कामकाजाच्या पर्स, बॅग अशी निरनिराळी उत्पादने त्यांनी तयार केली आहेत. काळा घोडा महोत्सवात सहभागी झालेल्या १८ बचतगटांनी फॅन्सी चप्पल, बॅग, गोधडी, लाकूड फेब्रिक ज्वेलरी, सजावटीच्या वस्तू, मुखवास, साबण, तेल, बिस्कीट, आभूषण या प्रकारच्या वस्तूंची विक्री करणारी दालने उभारली आहेत.

Continue reading

१४ व १५ मे रोजी मुंबईत रंगणार अ. भा. महापौर केसरी कुस्ती स्पर्धा

बृहन्मुंबई महानगरपालिका व मुंबई शहर तालीम संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ३२वी अखिल भारतीय मुंबई महापौर केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२६चे आयोजन करण्यात आले असून, देशभरातील नामांकित मल्ल या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. ही प्रतिष्ठेची स्पर्धा १४ व १५ मे २०२६...

देश चालवणे ही मोदींच्या आवाक्याबाहेरची गोष्ट!

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अलीकडील आवाहनांवर कडाडून टीका केली आहे. 'देश चालवणे मोदींच्या आवाक्यातली गोष्ट नाही' अशा शब्दांत हल्लाबोल केला आहे. पंतप्रधानांनी नागरिकांना सोने न खरेदी करण्याचे आणि परदेश दौरा टाळण्याचे जे आवाहन केले...

पेट्रोल-डिझेलची दरवाढ अटळ?

जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली मोठी वाढ आणि मध्य-पूर्वेतील तणावामुळे भारतातील सरकारी तेल मार्केटिंग कंपन्यांच्या तोट्यात मोठी वाढ झाली आहे. इंडियन ऑईल, बीपीसीएल आणि एचपीसीएल यांसारख्या कंपन्यांना सध्या दरमहा सुमारे ३०,००० कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे....
Skip to content