Homeमुंबई स्पेशलकाळा घोडा महोत्सवातल्या...

काळा घोडा महोत्सवातल्या पर्यटकांना पालिका बचतगटांच्या उत्पादनांची भुरळ

मुंबईतल्या फोर्ट परिसरात सध्या काळा घोडा कलामहोत्सव सुरू आहे. या महोत्सवाचा आनंद घेण्यासाठी मुंबईसह देशभरातील पर्यटक येत आहेत. यामध्ये मुंबई महापालिकेने अर्थसहाय्य केलेल्या बचतगटांनीदेखील या महोत्सवात दालन प्रदर्शित केले आहेत. महिलांनी कलाकुसरीने आणि मोठ्या कौशल्याने तयार केलेली विविध आभूषणे, संसारोपयोगी वस्तू, खाद्यपदार्थ, सौंदर्यप्रसाधने पर्यटकांच्या पसंतीला उतरत आहेत.

कलाकारांमधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी मुंबईतल्या काळा घोडा महोत्सवाला विशेषत्वाने ओळखले जाते. या महोत्सवाच्या माध्यमातून नवकलाकारांना सतत उर्जा मिळत असते. यंदा शनिवारी २५ जानेवारीपासून या उत्सवाला सुरुवात झाली आहे. रविवार, २ फेब्रुवारीपर्यंत हा महोत्सव सुरू राहणार आहे. या महोत्सवात मुंबईसह देशभरातल्या कलाकारांनी आपली कलादालने प्रदर्शित केली आहेत.

गरजू महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी मुंबई महापालिका सातत्याने विविध योजना राबवित असते. पालिकेच्या नियोजन विभागामार्फत महिला बचतगटांना अर्थसहाय्य केले जाते. या महिलांच्या बचतगटांनी तयार केलेल्या उत्पदनांना आंतरराष्ट्रीय ओळख मिळावी, प्रसिद्धी मिळावी तसेच त्यातून महिलांना आर्थिक उत्पन्न मिळावे, यासाठीदेखील पालिका विविध प्रकारचे व्यासपीठ उपलब्ध करून देत असते. याचाच एक भाग म्हणून काळा घोडा महोत्सवातही पालिकेने या बचतगटांसाठी दालने उपलब्ध करून दिली आहेत. या महोत्सवात १८ बचतगट सहभागी झाले आहेत. त्यामध्ये बी, ई, एफ दक्षिण, एफ उत्तर, जी दक्षिण, एच पूर्व, एल, एम पश्चिम, एन, एस, पी उत्तर, आर दक्षिण या प्रशासकीय विभागातील बचतगटांचा समावेश आहे. कापडव्यवसाय, आभूषणे, कापडी पिशव्या, खाद्यपदार्थ, गोधडी, शिल्पकला, महिलांसाठीच्या-कार्यालयीन कामकाजाच्या पर्स, बॅग अशी निरनिराळी उत्पादने त्यांनी तयार केली आहेत. काळा घोडा महोत्सवात सहभागी झालेल्या १८ बचतगटांनी फॅन्सी चप्पल, बॅग, गोधडी, लाकूड फेब्रिक ज्वेलरी, सजावटीच्या वस्तू, मुखवास, साबण, तेल, बिस्कीट, आभूषण या प्रकारच्या वस्तूंची विक्री करणारी दालने उभारली आहेत.

Continue reading

एलिमेंट्स आर्ट क्लासेसचे अप्रतिम प्रदर्शन

एलिमेंट्स आर्ट क्लासेस च्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही पुण्याच्या कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण आर्ट गॅलरी येथे पंचतत्व या तीन दिवसांचे वार्षिक कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सहा ते १८ वर्षे वयोगटातल्या जवळजवळ ४५ विद्यार्थ्यांच्या सुमारे ९० कलाकृती या प्रदर्शनात...

अकरावी प्रवेशासाठी नंतर सादर करा गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला

राज्यातल्या इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेत सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या निर्देशानंतर राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने अकरावी प्रवेशासाठी गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्याची अट शिथिल केली आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर...

सौरभ विजय यांनी दिला डिजिटल नवोपक्रमावर भर

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत येणाऱ्या भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे (UIDAI) मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ विजय यांनी मुंबईतील युआयडीएआय प्रादेशिक कार्यालयाला नुकतीच भेट दिली. मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतरचा हा त्यांचा पहिलाच प्रादेशिक दौरा आहे. युआयडीएआय प्रादेशिक कार्यालय,...
Skip to content