Homeपब्लिक फिगरदेशावरचे संकट आजही...

देशावरचे संकट आजही कायम!

देशावरचे संकट अद्याप गेलेले नाही. लोकशाहीला अजूनही धोका कायम आहे. राज्याचे चित्र बदलायचे असेल तर सध्याचे सरकार बदलल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे ही लढाई एकजुटीने लढूया, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी आज मुंबईतल्या महाविकास आघाडीच्या मेळाव्यात केले.

काल आपण स्वातंत्र्यदिवस साजरा केला. उद्याची महाराष्ट्राची दिशा काय राहणार आहे? महाराष्ट्रावर जे काही संकट आहे त्यातून राज्याची सुटका कशी करता येईल हे या सभेच्या  माध्यमातून पोहोचले पाहिजे. लोकसभेला आपण संविधान बदलण्याबाबतची भूमिका मांडली होती. संविधानावरील संकट अजूनही गेलेले नाही. कारण आताच्या सरकारच्या विचारधारेला संविधानाची अडचण आहे, असे ते म्हणाले.

संकट

संसदेच्या नुकत्याच झालेल्या अधिवेशनात पंतप्रधान एक दिवसही सभागृहात आले नाहीत. कालच्या १५ ऑगस्टच्या कार्यक्रमात लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना मागे  बसवले होते. मी विरोधी पक्षनेता होतो त्यावेळी माझी आसनव्यवस्था कॅबिनेट मंत्र्यांच्या ओळीत होती. आज राहुल गांधी यांची प्रतिष्ठा गेली. डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना सुषमा स्वराज यांना पहिल्या रांगेत बसवले होते. विरोधी पक्षनेता ही संस्था असते. तिचा मान ठेवायचा असतो, असेही पवार म्हणाले. रस्त्यावर आंदोलन करणाऱ्याबाबत एक कायदा आणायचा सरकारचा प्रयत्न आपण हाणून पाडला आहे. या कायद्यामुळे रस्त्यावर आंदोलन करणाऱ्या व्यक्तीला 5 ते 7 वर्षे तुरुंगात टाकण्याचे प्रयोजन होते. आम्ही तिघेही सन्मानाने सर्वांना सामावून घेऊन एक चांगले सरकार आणू. ही लढाई एकजुटीने लढू, असेही त्यांनी सांगितले.

Continue reading

अकरावी प्रवेशासाठी नंतर सादर करा गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला

राज्यातल्या इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेत सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या निर्देशानंतर राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने अकरावी प्रवेशासाठी गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्याची अट शिथिल केली आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर...

सौरभ विजय यांनी दिला डिजिटल नवोपक्रमावर भर

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत येणाऱ्या भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे (UIDAI) मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ विजय यांनी मुंबईतील युआयडीएआय प्रादेशिक कार्यालयाला नुकतीच भेट दिली. मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतरचा हा त्यांचा पहिलाच प्रादेशिक दौरा आहे. युआयडीएआय प्रादेशिक कार्यालय,...

झाडाला पिकलाय आंबा.. गाण्याची दुबईत क्रेझ!

दुबईस्थित मराठमोळा संगीतकार आणि सांस्कृतिक उद्योजक सागर पाटील यांनी त्यांचे नवीन गाणे “झाडाला पिकलाय आंबा – द मॅंगो अँथम” नुकतेच दुबईत प्रदर्शित केले आहे. भारतीय संस्कृती आणि संगीताचा उत्साहपूर्ण संगम असलेले हे गाणे सोशल मीडियावर प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून...
Skip to content