Homeपब्लिक फिगरदेशावरचे संकट आजही...

देशावरचे संकट आजही कायम!

देशावरचे संकट अद्याप गेलेले नाही. लोकशाहीला अजूनही धोका कायम आहे. राज्याचे चित्र बदलायचे असेल तर सध्याचे सरकार बदलल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे ही लढाई एकजुटीने लढूया, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी आज मुंबईतल्या महाविकास आघाडीच्या मेळाव्यात केले.

काल आपण स्वातंत्र्यदिवस साजरा केला. उद्याची महाराष्ट्राची दिशा काय राहणार आहे? महाराष्ट्रावर जे काही संकट आहे त्यातून राज्याची सुटका कशी करता येईल हे या सभेच्या  माध्यमातून पोहोचले पाहिजे. लोकसभेला आपण संविधान बदलण्याबाबतची भूमिका मांडली होती. संविधानावरील संकट अजूनही गेलेले नाही. कारण आताच्या सरकारच्या विचारधारेला संविधानाची अडचण आहे, असे ते म्हणाले.

संकट

संसदेच्या नुकत्याच झालेल्या अधिवेशनात पंतप्रधान एक दिवसही सभागृहात आले नाहीत. कालच्या १५ ऑगस्टच्या कार्यक्रमात लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना मागे  बसवले होते. मी विरोधी पक्षनेता होतो त्यावेळी माझी आसनव्यवस्था कॅबिनेट मंत्र्यांच्या ओळीत होती. आज राहुल गांधी यांची प्रतिष्ठा गेली. डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना सुषमा स्वराज यांना पहिल्या रांगेत बसवले होते. विरोधी पक्षनेता ही संस्था असते. तिचा मान ठेवायचा असतो, असेही पवार म्हणाले. रस्त्यावर आंदोलन करणाऱ्याबाबत एक कायदा आणायचा सरकारचा प्रयत्न आपण हाणून पाडला आहे. या कायद्यामुळे रस्त्यावर आंदोलन करणाऱ्या व्यक्तीला 5 ते 7 वर्षे तुरुंगात टाकण्याचे प्रयोजन होते. आम्ही तिघेही सन्मानाने सर्वांना सामावून घेऊन एक चांगले सरकार आणू. ही लढाई एकजुटीने लढू, असेही त्यांनी सांगितले.

Continue reading

रविवारी आनंद घ्या राधिका जोशी यांच्या गायनाचा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, १५ फेब्रुवारीला सायंकाळी पाच वाजता राधिका जोशी यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. उस्ताद खादिम हुसैन खाँ यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा कार्यक्रम होईल. यावेळी तबल्यावर प्रणव गुरव तर संवादिनीवर सौमित्र क्षीरसागर...

‘रानसावल्या’चे शनिवारी प्रकाशन

निसर्गप्रेमी आणि अभ्यासक श्रीरंग फडके यांनी लिहिलेल्या ‘रानसावल्या’, या पुस्तकाचे प्रकाशन येत्या शनिवारी, १४ फेब्रुवारीला गोरेगाव पूर्व येथील नंदादीप विद्यालयातील डॉ. भानुबेन नानावटी कलाघर येथे होत आहे. संध्याकाळी पाच वाजता होणाऱ्या या कार्यक्रमासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या सहाय्यक आयुक्त...

भायखळ्याच्या भोसले उद्यानात आजपासून ‘मुंबई पुष्पोत्सव’!

मुंबई महापालिका आणि वृक्ष प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने भायखळ्याच्या येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयात आजपासून रविवार, ८ फेब्रुवारीपर्यंत उद्यानविद्या प्रदर्शन अर्थात ‘मुंबई पुष्पोत्सव’ आयोजित करण्यात येणार आहे. उद्घाटनानंतर आज रात्री ८ वाजेपर्यंत पुष्पोत्सव सर्वांसाठी खुला राहील....
Skip to content