Homeमुंबई स्पेशल'ऑपरेशन सिंदूर'च्या वर्षपूर्तीला...

‘ऑपरेशन सिंदूर’च्या वर्षपूर्तीला मुंबईत दहशतवादी हल्ल्याची धमकी

काश्मीर खोऱ्यातल्या पहलगाममध्ये पाक अतिरेक्यांनी तेथली पर्यटकांवर धर्म विचारून गोळ्या घातल्याच्या घटनेचा बदला घेण्यासाठी भारतीय लष्कराने पाकिस्तानवर केलेल्या ऑपरेशन सिंदूरला उद्या एक वर्ष पूर्ण होत आहे. या वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील अतिशय प्रतिष्ठित आणि संवेदनशील मानल्या जाणाऱ्या कुलाबा येथील ‘ताज महाल पॅलेस’ आणि नरिमन पॉईंट येथील ‘ट्रायडंट’ या पंचतारांकित हॉटेल्सना दहशतवादी हल्ल्याची धमकी मिळाल्याने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.

अज्ञात व्यक्तीने हॉटेलच्या प्रशासनाला फोन करून हल्ल्याची धमकी दिल्याची माहिती समोर येताच मुंबई पोलिसांनी तातडीने हालचाली करत दोन्ही हॉटेल परिसरात कडक सुरक्षाव्यवस्था तैनात केली आहे. बॉम्बशोधक आणि नाशक पथकाकडून हॉटेलच्या इमारतींची आणि परिसराची कसून तपासणी करण्यात आली असून, हॉटेलमध्ये येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची आणि वाहनांची सखोल तपासणी केली जात आहे. खबरदारीचा उपाय म्हणून गेटवे ऑफ इंडिया, मरीन ड्राईव्ह आणि दक्षिण मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणी पोलिसांची गस्त वाढवण्यात आली आहे.

हा धमकीचा फोन एका परदेशी क्रमांकावरून आल्याचा संशय आहे. संभाव्यतः हा पाकिस्तानमधील ‘+९२’ कोड असलेला क्रमांक मानला जात आहे. २६/११च्या दहशतवादी हल्ल्यात या दोन्ही वास्तूंचे झालेले नुकसान लक्षात घेता, पोलीस प्रशासनाने ही धमकी अत्यंत गांभीर्याने घेतली आहे. मात्र, ताज्या माहितीनुसार प्राथमिक तपासणीत अद्याप कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा हालचाल आढळलेली नाही. त्यामुळे हा अफवा पसरवण्यासाठी केलेला बनावट फोन (‘होक्स कॉल’) असण्याची शक्यता अधिक आहे. याप्रकरणी कुलाबा आणि मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, मुंबई गुन्हे शाखेचे सायबर सेल पथक तांत्रिक विश्लेषणाद्वारे या कॉलचे मूळ शोधण्याचा प्रयत्न करत आहे. नागरिकांनी आणि पर्यटकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे, असे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे.

Continue reading

हा तर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाच्या विश्वासार्हतेवरच आघात!

शिवसेनेतल्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांचे आज उफाळून आलेले कथित बंड हे केवळ खासदारांचे बंड नाही, तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाच्या विश्वासार्हतेवर झालेला दुसरा मोठा आघात आहे. २०२२मध्ये आमदारांनी दिलेला धक्का आणि आता २०२६मध्ये पुन्हा एकदा खासदारांनी फिरवलेली पाठ, या...

८ जूनपासून पाऊस कोकणातच!

देशातील मान्सूनची सध्याची परिस्थिती अत्यंत चिंताजनक बनली असल्याचे, खासगी हवामान एजन्सी स्कायमेटचे संचालक जी. पी. शर्मा यांनी म्हटले आहे. मुळातच यंदा मान्सूनचे आगमन उशिराने झाले असून, सुरुवातीचे काही दिवस प्रगती केल्यानंतर गेल्या एका आठवड्यापासून तो पूर्णपणे थबकला आहे. ८...

आता फक्त २०० रुपयात करा कुटुंबातच होणाऱ्या वाटणीची मोजणी!

राज्यशासनाने सर्वसामान्यांना मोठा दिलासा देत जमीन मोजणीच्या शुल्क आणि प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केलेल्या नव्या निर्णयानुसार, आता कुटुंबातच होणाऱ्या संमतीच्या किंवा कोर्टाच्या वाटणीची मोजणी अवघ्या २०० रुपये प्रति पोटहिस्सा या नाममात्र शुल्कात केली...
Skip to content