Homeचिट चॅटजिल्हा युवा महोत्सवातल्या...

जिल्हा युवा महोत्सवातल्या सहभागासाठी ४ नोव्हेंबरपर्यंत करा नोदणी

युवकांचा सर्वांगीण विकास, भारतीय संस्कृती व परंपरेचे जतन, सुप्त गुणांना प्रोत्साहन तसेच राष्ट्रीय एकात्मता वृद्धींगत करण्याच्या हेतूने दरवर्षी आयोजित केला जाणारा जिल्हास्तरीय युवा महोत्सव या वर्षी  ७ नोव्हेंबरला आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये सहभागी होण्याकरीता इच्छुकांनी आपली नोंदणी येत्या ४ नोव्हेंबरपर्यंत  https://forms.gle/Kmof5utKSuEqL3P69 या गुगल फॉर्मद्वारे करावी, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी  प्रा. मार्क धरमाई यांनी केले आहे.

राष्ट्रीय युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाच्या “विकसित भारत चॅलेंज ट्रॅक” या कार्यक्रमाअंतर्गत या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सन २०२५-२६मधील राष्ट्रीय युवा महोत्सवाचे राष्ट्रीय आयोजन १० ते १२ जानेवारी २०२६ यादरम्यान होणार असून त्यासाठी जिल्हास्तरीय निवड करण्याकरीता या स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. याअंतर्गत वक्तृत्व, कथालेखन, चित्रकला, लोकनृत्य, लोकगीत, कवितालेखन, नवोपक्रम (विज्ञान प्रदर्शन) या स्पर्धा घेण्यात येणार आहेत. या स्पर्धेत १५ ते २९ वर्षे वयोगटातील स्पर्धक सहभागी होऊ शकतात. या स्पर्धांबाबतची सविस्तर माहिती www.dsomumbaicity.blogspot.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Continue reading

‘अच्चप्पास् अल्बम’ येत्या 24 एप्रिलला होणार प्रदर्शित

केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ म्हणजेच एनएफडीसी आपला मल्याळम चित्रपट ‘अच्चप्पास् अल्बम’ (आजीचा अल्बम) येत्या 24 एप्रिलला देशभर प्रदर्शित करण्यासाठी सज्ज आहे. या चित्रपटात कौटुंबिक कल्पनारम्य कथा, विनोद आणि भावनांच्या कल्लोळाचा एक अनोखा मेळ...

‘एआय’च्या नादात ‘कोअर’ विषयांकडे नका करू दुर्लक्ष!

सध्या सगळीकडे 'एआय'(आर्टिफिशियल इंटेलिजन्स) म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता आणि 'डेटा सायन्स'ची हवा आहे. पण, तुम्ही जर याच वर्षी इंजिनीअरिंगला ॲडमिशन घेण्याचा विचार करत असाल, तर हा रिपोर्ट तुमच्यासाठी 'गेम चेंजर' ठरू शकतो. प्रसिद्ध करिअर सल्लागार जयप्रकाश गांधी यांनी विद्यार्थ्यांना एक...

‘महिला आरक्षण’ हे जातीनिहाय जनगणनेला बगल देण्याचे षडयंत्र!

पंतप्रधान नरेंद्र मोदी महिला आरक्षणाचा वापर केवळ जातीनिहाय जनगणना लांबणीवर टाकण्यासाठी करत असल्याचा आरोप काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी केला आहे. आरक्षणाच्या नावाखाली सरकार मुख्य मुद्द्यांपासून जनतेचे लक्ष भरकटवत असल्याची टीका त्यांनी केली. सोनिया गांधी यांच्या मते, सरकारला देशातील...
Skip to content