Homeन्यूज ॲट अ ग्लांसपंतप्रधान नरेंद्र मोदी...

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी वायनाडच्या दौऱ्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या शनिवारी, 10 ऑगस्टला केरळच्या वायनाड भागातल्या आपदाग्रस्त भागाची हवाई पाहणी करणार आहेत. मुसळधार पावसानंतर झालेल्या भूस्खलनामुळे वायनाडमध्ये तीन गावं गाडली गेली होती. त्यामध्ये साधारणतः ४०० जणांचा मृत्यू झाला तर १५२हून जास्त लोक आजही बेपत्ता आहेत.

वायसेनेचे तसेच लष्कराचे जवान, राष्ट्रीय आपदा बचाव दलाचे (एनडीआरएफ), एसडीआरएफ तसेच इतर बचावयंत्रणांकडून आजही तेथे बचावकार्य सुरूच आहे. केरळ सरकारने आता या जवानांबरोबरच बेपत्ता असलेल्या लोकांचे नातेवाईक तसेच इतर लोकांचीही मदत याकामी घेतली आहे. अतिमुशळधार पावसामुळे वायनाड परिसारत ३१० हेक्टवरील फळबागा जवळजवळ नष्ट झाल्या आहेत. पंतप्रधान मोदी आपल्या या दौऱ्यात या साऱ्या नुकसानीबरोबरच तेथील बचावकार्याचा आढावाही घेणार असल्याचे कळते.

दोनच दिवसांपूर्वी वायनाडचे खासदार व लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसेच त्यांच्या भगिनी व काँग्रेसच्या सरचिटणिस प्रियंका गांधी यांनी वायनाडला भेट देऊन तिथल्या आपदग्रस्त भागातल्या लोकांशी बातचीत केली होती.

Continue reading

आयडियल मोफत कबड्डी स्पर्धात्मक शिबिरात ४० खेळाडू

मुंबईच्या आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे यंग स्पोर्ट्स क्लब-घाटकोपर यांच्या सहकार्याने शालेय मुलांसाठी मोफत कबड्डी स्पर्धात्मक मार्गदर्शन शिबीर येत्या २७ एप्रिलपासून माणिकलाल मैदान, घाटकोपर येथे सुरु होत असून त्यात शालेय ४० खेळाडू सहभागी झाले आहेत. नवोदित खेळाडूंना तंत्रशुद्ध कबड्डी खेळाची प्राथमिक...

उत्तर प्रदेशातले शेखा झील पक्षी अभयारण्य झाले ‘रामसर स्थळ’!

केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी मंगळवारी उत्तर प्रदेशातल्या अलिगढमधल्या शेखा झील पक्षी अभयारण्याला ‘रामसर स्थळ’ म्हणून मान्यता मिळाल्याचे घोषित केले. यामुळे भारतातल्या रामसर स्थळांची एकूण संख्या 99 झाली आहे. उत्तर प्रदेशात ही संख्या 12पर्यंत पोहोचली आहे. “उत्तर प्रदेशने हा...

‘वंदे मातरम’वर आधारित चित्रपट निर्मिती स्पर्धेचे आयोजन

वंदे मातरम, या राष्ट्रीय गीताला 150 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांचा एक भाग म्हणून, केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने "व्हीएम फ्रेम्स" या राष्ट्रीय चित्रपट निर्मिती स्पर्धेची घोषणा केली आहे. या स्पर्धेद्वारे नागरिकांना दृश्यात्मक कथाकथनाच्या माध्यमातून राष्ट्रगीताचा भाव सर्जनशीलतेने...
Skip to content