Homeन्यूज अँड व्ह्यूजआता कळेलच धडधाकट...

आता कळेलच धडधाकट कोण आणि कुबड्यांची गरज कुणाला?

आजच्या दैनिक लोकसत्तेच्या अग्रलेखाचा मथळा इतका बोलका आहे की, त्यावर काही लिहिणे अन्यायकारक ठरेल! आपल्या देशात हे नेहमीच घडत आलेले आहे व पुढेही घडणार आहे. राष्ट्रीय पक्ष मग तो भारतीय जनता पक्ष (भाजप) असो वा काँग्रेस, त्यांनी नेहमीच असे केलेले आहे. पूर्वी काँग्रेसला तशी गरज हॊती म्हणून तामिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळ, प. बंगाल, आसाम, झारखंड आदी राज्यांत प्रादेशिक राजकीय पक्षांरोबर जमवून घेतले. याचाच अर्थ प्रत्येक राष्ट्रीय राजकीय पक्षाला प्रादेशिक पक्षाच्या कुबड्या घ्याव्याच लागतात.

भाजपनेही महाराष्ट्रात अभेद्य शिवसेनेबरोबर युतीच केली होती. मुंबई महापालिकेत तर ही युती तब्बल २५ वर्षे जाहीरपणे होती व त्याआधी बरेच वर्षे ‘हातामिळवणी’ होती. आता शिवसेना अभेद्य नाही. त्यातील एकनाथ शिंदेंची शिवसेना भाजपबरोबर आहे. तसेच अजित पवार यांचीही राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्याबरोबर आहे. म्हणजे सध्या शिंदे व अजितदादांचे पक्ष भाजपच्या अधिकृत कुबड्या आहेत. खरंतर भाजपकडे पुरेसे बहुमत असूनही त्यांना या दोन्ही पक्षांची मदत घ्यावी लागत आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की, एकट्या भाजपकडे ‘भेदक’ शक्ती कमी असल्यामुळेच त्यांना यांची मदत घ्यावी लागत आहे. परंतु ‘कुबड्या’ या शब्दामुळे फट म्हणता ब्राह्महत्त्या होऊ नये म्हणून राज्यातील भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांना सारवासारव करण्यासाठी धावपळ करावी लागली! खरंतर इतकी धावपळ करण्याची गरजच नव्हती. कारण, घोडामैदान अगदी जवळ आहे. जिल्हा परिषद, नगर पंचायत, नगरपालिका तसेच महापालिका निवडणुका झाल्या की धडधाकट कोण आणि कुबड्यांची गरज कुणाला, हे जनतेसमोर येणारच आहे!

Continue reading

मदिरा व मदिराक्षी! पोलीस अधिकाऱ्यांचे डोंबिवलीच्या वेशीवर ‘मै टल्ली हो गयी..’

डोंबिवलीनजिकच्या शीळ फाट्यावरून डोंबिवलीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पडले नावाचे सुंदर गाव आहे. गावात अजून बऱ्यापैकी निसर्ग शाबूत आहे. उंच इमारती आहेत. पण उंची गगनाला वेसण घालण्याइतपत नाही, ही जमेची बाजू! हे पडले गाव सुरु होताच मुक्ता नामक विकासकाची ओळख व्हायला...

नव्या महापालिका आयुक्तांचे स्वागत करताना…

मुंबईच्या पहिल्या महिला महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांचे मुंबईकरांच्या वतीने स्वागत करताना त्यांना मुंबईतल्या गिरगावातल्या 'हौदा'कडे बोट दाखवण्याची इच्छा नव्हती. परंतु त्या मुंबईच्या मेट्रो प्रकल्पाच्या प्रमुख होत्या. आजही तो अतिरिक्त कार्यभार त्यांच्याकडेच आहे, त्यामुळे हीच संधी घेतली म्हणाना. मुंबई...

लांब जटा.. टिळा-टोपी-माळा, अशा प्रतिमेला छेद देणारा भोंदू!

कॅप्टन नसलेल्या आणि इयत्ता दहावी नापास असलेल्या अशोक खरात नामक भोंदूबाबाच्या विविध कथांनी राज्यातील वर्तमानपत्रांचे रकानेच्या रकाने सध्या भरून वाहत आहेत! तसे पाहिले तर आपल्या राज्यालाच नव्हे तर संपूर्ण देशाला बुवाबाजींनी ग्रासलेले आहे. कुठे आसाराम आहेत तर कुठे बाबा...
Skip to content