Homeन्यूज अँड व्ह्यूजआता कळेलच धडधाकट...

आता कळेलच धडधाकट कोण आणि कुबड्यांची गरज कुणाला?

आजच्या दैनिक लोकसत्तेच्या अग्रलेखाचा मथळा इतका बोलका आहे की, त्यावर काही लिहिणे अन्यायकारक ठरेल! आपल्या देशात हे नेहमीच घडत आलेले आहे व पुढेही घडणार आहे. राष्ट्रीय पक्ष मग तो भारतीय जनता पक्ष (भाजप) असो वा काँग्रेस, त्यांनी नेहमीच असे केलेले आहे. पूर्वी काँग्रेसला तशी गरज हॊती म्हणून तामिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळ, प. बंगाल, आसाम, झारखंड आदी राज्यांत प्रादेशिक राजकीय पक्षांरोबर जमवून घेतले. याचाच अर्थ प्रत्येक राष्ट्रीय राजकीय पक्षाला प्रादेशिक पक्षाच्या कुबड्या घ्याव्याच लागतात.

भाजपनेही महाराष्ट्रात अभेद्य शिवसेनेबरोबर युतीच केली होती. मुंबई महापालिकेत तर ही युती तब्बल २५ वर्षे जाहीरपणे होती व त्याआधी बरेच वर्षे ‘हातामिळवणी’ होती. आता शिवसेना अभेद्य नाही. त्यातील एकनाथ शिंदेंची शिवसेना भाजपबरोबर आहे. तसेच अजित पवार यांचीही राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्याबरोबर आहे. म्हणजे सध्या शिंदे व अजितदादांचे पक्ष भाजपच्या अधिकृत कुबड्या आहेत. खरंतर भाजपकडे पुरेसे बहुमत असूनही त्यांना या दोन्ही पक्षांची मदत घ्यावी लागत आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की, एकट्या भाजपकडे ‘भेदक’ शक्ती कमी असल्यामुळेच त्यांना यांची मदत घ्यावी लागत आहे. परंतु ‘कुबड्या’ या शब्दामुळे फट म्हणता ब्राह्महत्त्या होऊ नये म्हणून राज्यातील भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांना सारवासारव करण्यासाठी धावपळ करावी लागली! खरंतर इतकी धावपळ करण्याची गरजच नव्हती. कारण, घोडामैदान अगदी जवळ आहे. जिल्हा परिषद, नगर पंचायत, नगरपालिका तसेच महापालिका निवडणुका झाल्या की धडधाकट कोण आणि कुबड्यांची गरज कुणाला, हे जनतेसमोर येणारच आहे!

Continue reading

परदेशाप्रमाणे भांडुपमध्ये लवकरच दिसणार ‘कलते’ मनोरे?

मुंबईतला लालबहाद्दूर शास्त्री मार्ग, मेट्रो लाईनचे काम आणि भांडुप-मुलुंड परिसर यांचे काय नाते आहे हे एका परमेश्वरालाच माहित! कारण मेट्रोचे अपघात येथेच सुरू झाले आहेत. काही महिन्यांपूर्वी झालेल्या अपघातात मेट्रोची एक स्लॅब कोसळून रिक्षा चक्काचूर झाली होती व माणसे...

मुंबई महापालिकेचा ‘दिव्याखालीच अंधार’!

गेल्या दोन दिवसांपासून मुंबईला वरूणराजा झोडपून काढत आहे. मुसळधार पावसामुळे मुंबई महापालिकेच्या कारभाराची लत्करे वेशीवर टांगली जात आहे. मी-मी म्हणणारे कित्येक आले. गेले. राजकारणातून संपले. पण, मुंबई काही तुंबायची राहिली नाही. यंदा तब्बल महिन्याभराच्या प्रतीक्षेनंतर मुंबईत पावसाचे आगमन झाले....

माध्यमांना ठाकरेंच्या शिवसेनेचे का बरे वावडे?

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे सहा खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आज दाकल झाले. या प्रक्रियेत गेल्या चार दिवसांपासून विविध मराठी वृत्तवाहिन्यांवरील चर्चेत एक सवाल विचारला गेला- उबाठाचे प्रवक्ते पत्रकारांना वा वृत्तवाहिन्यांना उपलब्ध का नसतात? त्याबाबत निरीक्षणातून हाती आलेली...
Skip to content