Homeटॉप स्टोरीविधिमंडळात आजही गदारोळ?

विधिमंडळात आजही गदारोळ?

विधानसभेत अध्यक्षांसमोरील राजदंडाला स्पर्श करत निदर्शने केल्यामुळे काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांना विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मंगळवारच्या संपूर्ण दिवसभराच्या कामकाजासाठी सभागृहातून निलंबित केले. विधिमंडळात आजही काँग्रेससह विरोधी पक्षांच्या सदस्यांकडून कृषीमंत्र्यांच्या कथित वादग्रस्त विधानांविरूद्ध आक्रमक भूमिका घेतली जाण्याची शक्यता असून यामुळे पुन्हा सभागृहात गदारोळ पाहयला मिळू शकतो, असे जाणकारांचे मत आहे.

मंगळवारी सकाळी विधानसभेमध्ये प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर नाना पटोले बोलण्यासाठी उभे राहिले. या सरकारमधील कृषीमंत्री तसेच इतर नेत्यांनी वारंवार शेतकऱ्यांचा अपमान करणारी विधाने केली आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी राज्यातील शेतकऱ्यांची माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली. सभागृह नियमानुसार चालवले जाईल, असे स्पष्ट करत अध्यक्ष नार्वेकर यांनी पटोले यांना जागेवर बसण्यास सांगितले. पण, पटोले यांनी प्रक्षुब्ध होत जागेकडे न जाता अध्यक्षांच्या दिशेने सभागृहातील हौद्यात जात विरोधी पक्षांतील सदस्यांना हौद्यात या, असे खुणावले. विरोधी पक्षांचे विशेषतः काँग्रेसचे अनेक आमदार सभागृहातील हौद्यात जमून निदर्शने करू लागले, घोषणा देऊ लागले. त्यावेळी पटोले यांनी राजदंडाला हात घालताच अध्यक्ष नार्वेकर यांनी सभागृहाचे कामकाज पाच मिनिटांसाठी स्थगित करत असल्याची घोषणा १२ वाजून तीन मिनिटांनी केली.

विधिमंडळ

त्यानंतर १२ वाजून आठ मिनिटांनी कामकाज सुरू होताच सर्व विरोधी सदस्यांनी शेतकऱ्यांची माफी मागा, अशा घोषणा सुरू केल्या. त्यावर नाना तुमच्याकडून या वर्तनाची अपेक्षा नाही कारण तुम्ही सभागृहाचे अध्यक्ष राहिलेले आहात. त्यामुळे तुम्ही राजदंडाला स्पर्श केल्याबद्दल तुमच्यावर कारवाई करण्यासाठी मला भाग पाडू नका, जागेवर बसा, असे अध्यक्ष नार्वेकर यांनी सुनावले. त्यानंतरही विरोधक घोषणा देत राहिले. दरम्यान, मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी पटोले यांच्यावर कारवाईची मागणी केली. फडणवीस म्हणाले की, वास्तविक पटोले विधानसभेचे अध्यक्ष म्हणून काम केलेले सदस्य आहेत आणि त्यांनी अध्यक्षांच्या दिशेने त्यांच्या अंगावर धावून जाणे, राजदंडाला स्पर्श करणे आणि जणू काही अध्यक्षच दोषी आहेत, या पद्धतीने वागणे चुकीचे आहे. त्यामुळे पटोले यांच्यावर कडक कारवाई करावी. त्यानंतर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांना दिवसभरासाठी निलंबित केले. त्यानंतर विरोधकांनी दिवसभरासाठी सभात्याग केला आणि सरकारकडून कृषिमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

नाना पटोले यांच्या निलंबनावर सत्ताधारी आणि विरोधक यांची भिन्न भूमिका आहे. सत्ताधारी भाजपा आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी पटोले यांचे वर्तन चुकीचे ठरवत माफीची मागणी केली, तर विरोधकांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर पटोले यांचे समर्थन करत निलंबनाचा निषेध केला. असंसदीय भाषा वापरल्यामुळे पटोले यांना निलंबित केले गेल्याचा दावा सत्ताधारी करत आहेत. दुसरीकडे पटोले यांनीही आपली भूमिका ठाम ठेवत, शेतकऱ्यांचा अपमान झाला तर मी शांत बसणार नाही असं स्पष्ट केलं आहे. मुख्यमंत्र्यांनी याबाबत माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

विधिमंडळ

सत्ताधारी-विरोधक संघर्षातील ठळक मुद्दे:

1. कृषिमंत्री कोकाटे यांनी शेतकऱ्यांबद्दल केलेल्या ‘अपमानास्पद’ विधानाचा विरोधकांनी निषेध केला.

2. नाना पटोले यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी, अशी मागणी केली.

3. गोंधळानंतर नाना पटोले यांना एका दिवसासाठी निलंबित करण्यात आले.

4. विरोधकांनी सभागृहातून वॉकआउट केले.

5. काँग्रेसने कृषिमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content