Homeहेल्थ इज वेल्थमुंबई महापालिका दवाखान्यांत...

मुंबई महापालिका दवाखान्यांत उद्यापासून डिजिटल आरोग्यसेवा

महाराष्ट्रदिनाचे औचित्‍य साधून मुंबईकरांना आधुनिक पद्धतीने आरोग्‍यसुविधा पुरविण्‍यासाठी बृहन्‍मुंबई महानगरपालिका उद्यापासून सर्व दवाखान्यांमध्ये हॉस्पिटल मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम (एचएमआयएस – २) ही डिजिटल प्रणाली कार्यान्वित करणार आहे. सार्वजनिक आरोग्यसेवांमध्ये आधुनिकता, कार्यक्षमतेची वृद्धी आणि सेवा वितरणामध्ये गती साधण्यासाठी ही कार्यप्रणाली उपयुक्‍त ठरणार आहे.

एचएमआयएस – २ प्रणालीची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी सर्व दवाखान्यांना आवश्यक संगणक, इंटरनेट सुविधा व संबधित यंत्रासमुग्री देण्यात आली आहे तसेच सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना सविस्तर प्रशिक्षण देण्यात आले आहे. याअगोदर रुग्णांच्या नोंदी कागदावर (पेपर) केल्या जात होत्या. मागील सहा महिने एचएमआयएस – २ प्रणाली प्रायोगिक स्वरूपात राबविण्यात आली. उद्या, २ मेपासून ही प्रणाली १७७ दवाखान्यांत कार्यान्वित केली जात आहे. तसेच, २१७ हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यांमध्‍येदेखील ३० मेपर्यंत ही प्रणाली कार्यान्वित केली जाणार आहे.

एचएमआयएस – २ प्रणाली ही आयुष्मान भारत डिजीटल मिशनला अनुरूप आहे. यामध्ये रुग्णाला एक विशिष्‍ट ओळखपत्र क्रमांक (आयडी) दिला जाईल. या ओळखपत्राच्‍या आधारे रुग्णांना दवाखान्यातून रुग्णालयात तसेच रुग्णालयातून दवाखान्यात संदर्भित केले जाऊ शकते. त्यांच्या उपचारपद्धतीचा आढावा (ट्रॅक) घेतला जाऊ शकतो. यामुळे रुग्णांना त्यांच्या मोबाईलवर त्यांच्या उपचारांच्या सर्व नोंदी एकाच ठिकाणी मिळू शकतील. एचएमआयएस – २ प्रणालीच्या माध्यमातून रुग्णांची नोंदणी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी आणि औषधवितरण इत्यादी नोंदी डिजीटल स्वरूपात उपलब्ध होणार आहेत. तसेच औषधसाठा व्यवस्थापन, रुग्णसेवा अहवाल, सांख्यिकीय विश्लेषण आणि धोरणात्मक निर्णयप्रक्रियेसाठीही ही प्रणाली उपयुक्त ठरणार आहे. पुढील टप्प्यात एचएमआयएस – २ ही प्रणाली प्रसुतीगृहे, उपनगरीय रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये यांच्यातदेखील राबविण्यात येणार आहे.

Continue reading

‘एआय’च्या नादात ‘कोअर’ विषयांकडे नका करू दुर्लक्ष!

सध्या सगळीकडे 'एआय'(आर्टिफिशियल इंटेलिजन्स) म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता आणि 'डेटा सायन्स'ची हवा आहे. पण, तुम्ही जर याच वर्षी इंजिनीअरिंगला ॲडमिशन घेण्याचा विचार करत असाल, तर हा रिपोर्ट तुमच्यासाठी 'गेम चेंजर' ठरू शकतो. प्रसिद्ध करिअर सल्लागार जयप्रकाश गांधी यांनी विद्यार्थ्यांना एक...

‘महिला आरक्षण’ हे जातीनिहाय जनगणनेला बगल देण्याचे षडयंत्र!

पंतप्रधान नरेंद्र मोदी महिला आरक्षणाचा वापर केवळ जातीनिहाय जनगणना लांबणीवर टाकण्यासाठी करत असल्याचा आरोप काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी केला आहे. आरक्षणाच्या नावाखाली सरकार मुख्य मुद्द्यांपासून जनतेचे लक्ष भरकटवत असल्याची टीका त्यांनी केली. सोनिया गांधी यांच्या मते, सरकारला देशातील...

जगातल्या १० सर्वात उष्ण शहरांत अकोला दुसऱ्या क्रमांकावर

महाराष्ट्र सध्या उन्हाच्या भीषण तडाख्याने होरपळून निघत असून, विदर्भातील तापमानाने जागतिक विक्रम मोडायला सुरुवात केली आहे. 'एल डोराडो वेदर' आणि हवामान विभागाच्या ताज्या आकडेवारीनुसार, जगातील १० सर्वात उष्ण शहरांच्या यादीत विदर्भातील तब्बल ४ शहरांचा समावेश झाला आहे. यात अकोला...
Skip to content