Homeन्यूज ॲट अ ग्लांसविधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात...

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात यंदा फुलांऐवजी कापडी बुके

हातमागावर कापडांच्या निर्मितीचे प्रमुख केंद्र म्हणून नागपूरची ओळख आहे. स्थानिक कलावंत या कापडाची निर्मिती करतात. राज्य विधिमंडळाच्या नागपूरमध्ये होत असलेल्या हिवाळी अधिवेशनानिमित्त हातमाग महामंडळाने आकर्षक व पर्यावरणपूरक कापडाचे बुके तयार केले आहेत. एरव्ही विविध समारंभामध्ये फुलांचा बुके देण्याची परंपरा आहे. त्याऐवजी कायम लक्षात राहील आणि बुकेतील साहित्य दैनंदिन वापरासाठी उपयुक्त ठरेल, अशा हातमागावरील विविध कापडांचा समावेश असलेले कापडी आकर्षक बुके हातमाग महामंडळाने तयार केले आहेत. अधिवेशनासाठी येणाऱ्या अभ्यागतांच्या स्वागतासाठी हे बुके देण्यात येणार आहेत.

हातमागावरील विविध तयार कपड्यांना संपूर्ण देशात मागणी आहे. रेशीम साडयांपासून टॉवेल, चादर, रुमाल, सूती साडया आदी कापड स्वदेशी डिझाईनचा वापर करुन हातमागावर तयार करण्यात येते. यासाठी प्रादेशिक वैशिष्ट्यानुसार फॅशनचा अभ्यास करुन कलात्मक व कौशल्याचा वापर करुन पर्यावरणपूरक वस्त्रांची निर्मिती केली जाते. शासनाने हातमाग उद्योगाचा विकास करण्यासाठी राष्ट्रीय हातमाग विकास कार्यक्रमाची आखणी केली आहे. बाजारपेठेसोबतच स्पर्धा करण्यासाठी नवतंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. कापडी बुके ही संकल्पना उमरेड रोडवरील हातमाग महामंडळाच्या केंद्रात सुरु करण्यात आली असल्याचे सहव्यवस्थापकीय संचालक गंगाधर गजभिये यांनी सांगितले.

नागपुरी साडी, कोसा, सिल्क आदी दर्जेदार कापड हातमागावर तयार करण्यात आलेल्या बुकेसोबत आकर्षक कापडी बॅग तयार करण्यात आली आहे. कापडी बुकेमध्ये नॅपकीन, रुमाल, टॉवेल आदींचा समावेश करण्यात आला आहे. त्यासोबतच हस्तकलेद्वारे निर्मित केलेल्या बकेटमध्ये विविध प्रकारच्या हातमाग कापडांचा समावेश असलेले व तेवढयाच आकर्षक वेष्टनात कापडी बुके उपलब्ध आहेत. यासाठी हातमाग महामंडळाच्या अधिकृत केंद्रावरुन विक्रीची व्यवस्था करण्यात आली आहे.

Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content