Homeन्यूज ॲट अ ग्लांसविधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात...

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात यंदा फुलांऐवजी कापडी बुके

हातमागावर कापडांच्या निर्मितीचे प्रमुख केंद्र म्हणून नागपूरची ओळख आहे. स्थानिक कलावंत या कापडाची निर्मिती करतात. राज्य विधिमंडळाच्या नागपूरमध्ये होत असलेल्या हिवाळी अधिवेशनानिमित्त हातमाग महामंडळाने आकर्षक व पर्यावरणपूरक कापडाचे बुके तयार केले आहेत. एरव्ही विविध समारंभामध्ये फुलांचा बुके देण्याची परंपरा आहे. त्याऐवजी कायम लक्षात राहील आणि बुकेतील साहित्य दैनंदिन वापरासाठी उपयुक्त ठरेल, अशा हातमागावरील विविध कापडांचा समावेश असलेले कापडी आकर्षक बुके हातमाग महामंडळाने तयार केले आहेत. अधिवेशनासाठी येणाऱ्या अभ्यागतांच्या स्वागतासाठी हे बुके देण्यात येणार आहेत.

हातमागावरील विविध तयार कपड्यांना संपूर्ण देशात मागणी आहे. रेशीम साडयांपासून टॉवेल, चादर, रुमाल, सूती साडया आदी कापड स्वदेशी डिझाईनचा वापर करुन हातमागावर तयार करण्यात येते. यासाठी प्रादेशिक वैशिष्ट्यानुसार फॅशनचा अभ्यास करुन कलात्मक व कौशल्याचा वापर करुन पर्यावरणपूरक वस्त्रांची निर्मिती केली जाते. शासनाने हातमाग उद्योगाचा विकास करण्यासाठी राष्ट्रीय हातमाग विकास कार्यक्रमाची आखणी केली आहे. बाजारपेठेसोबतच स्पर्धा करण्यासाठी नवतंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. कापडी बुके ही संकल्पना उमरेड रोडवरील हातमाग महामंडळाच्या केंद्रात सुरु करण्यात आली असल्याचे सहव्यवस्थापकीय संचालक गंगाधर गजभिये यांनी सांगितले.

नागपुरी साडी, कोसा, सिल्क आदी दर्जेदार कापड हातमागावर तयार करण्यात आलेल्या बुकेसोबत आकर्षक कापडी बॅग तयार करण्यात आली आहे. कापडी बुकेमध्ये नॅपकीन, रुमाल, टॉवेल आदींचा समावेश करण्यात आला आहे. त्यासोबतच हस्तकलेद्वारे निर्मित केलेल्या बकेटमध्ये विविध प्रकारच्या हातमाग कापडांचा समावेश असलेले व तेवढयाच आकर्षक वेष्टनात कापडी बुके उपलब्ध आहेत. यासाठी हातमाग महामंडळाच्या अधिकृत केंद्रावरुन विक्रीची व्यवस्था करण्यात आली आहे.

Continue reading

एलिमेंट्स आर्ट क्लासेसचे अप्रतिम प्रदर्शन

एलिमेंट्स आर्ट क्लासेस च्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही पुण्याच्या कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण आर्ट गॅलरी येथे पंचतत्व या तीन दिवसांचे वार्षिक कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सहा ते १८ वर्षे वयोगटातल्या जवळजवळ ४५ विद्यार्थ्यांच्या सुमारे ९० कलाकृती या प्रदर्शनात...

अकरावी प्रवेशासाठी नंतर सादर करा गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला

राज्यातल्या इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेत सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या निर्देशानंतर राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने अकरावी प्रवेशासाठी गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्याची अट शिथिल केली आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर...

सौरभ विजय यांनी दिला डिजिटल नवोपक्रमावर भर

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत येणाऱ्या भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे (UIDAI) मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ विजय यांनी मुंबईतील युआयडीएआय प्रादेशिक कार्यालयाला नुकतीच भेट दिली. मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतरचा हा त्यांचा पहिलाच प्रादेशिक दौरा आहे. युआयडीएआय प्रादेशिक कार्यालय,...
Skip to content