रेल्वेने मुंबई सेंट्रल-अहमदाबाद ‘वंदे भारत एक्सप्रेस’च्या (गाडी क्रमांक 22961/22962) बोगींची संख्या 16वरून 20पर्यंत कायमस्वरूपी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. बोगी वाढविण्याचा हा बदल आजपासून म्हणजेच 28 एप्रिलपासून अंमलात आणण्यात येईल. या गाडीच्या वाढवण्यात आलेल्या या चार डब्यांमध्ये तीन ‘एसी चेअर कार’ (एसी-सीसी) आणि एका ‘एक्झिक्युटिव्ह क्लास कोच’ (ईसीसी) डब्याचा समावेश आहे. यामुळे भारतातल्या सर्वात गर्दीच्या आणि सर्वाधिक मागणी असलेल्या आंतर-शहरी रेल्वे मार्गांपैकी एक असलेल्या या गाडीच्या प्रवाशांकरीता आसनांची उपलब्धता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.
मुंबई-अहमदाबाद ‘वंदे भारत’ गाडी सेवा सुरू झाल्यापासून तिला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे या गाडीला बोगी वाढविण्याचा हा निर्णय घेतला आहे. प्रवासाच्या गर्दीच्या काळात वाढणारी मागणी पूर्ण करण्यासाठी केलेली जी तात्पुरती वाढ होती, तिला आता कायमस्वरूप स्वरूप देण्यात आले आहे. मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद हा 491 किलोमीटरचा मार्ग आहे. वंदे भारत गाडी हा प्रवास 5 तास 30 मिनिटांत पूर्ण करते. वंदे भारत रेल गाडी बोरीवली, वापी, सूरत आणि वडोदरा येथे थांबते. हा मार्ग पश्चिम भारतातला मुंबई आणि अहमदाबाद या आर्थिकदृष्ट्या प्रमुख दोन शहरांना ही वेगवान रेल्वे जोडली गेली आहे.
मुंबई सेंट्रल-अहमदाबाद सेवेव्यतिरिक्त, गाडी क्रमांक 20901/20902 गांधीनगर राजधानी ते मुंबई सेंट्रल वंदे भारत एक्सप्रेस धावते. ही रेल्वेगाडीही गुजरात आणि महाराष्ट्र यांच्यातील आणखी एक महत्त्वाचा वेगवान दुवा आहे. गांधीनगरला मुंबईशी जोडणारा हा मार्ग, अहमदाबाद-गांधीनगरच्या विस्तृत क्षेत्रालाही सेवा पुरवतो. यामुळे व्यावसायिक, प्रशासकीय आणि दैनंदिन प्रवाशांना अधिक वेगवान आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळतो., तसेच या दोन राज्यांमधील आर्थिक संबंध अधिक दृढ होतात.
देशभरामध्ये आतापर्यंत, 162 वंदे भारत सेवा कार्यान्वित करण्यात आल्या आहेत.

