Homeटॉप स्टोरीनाशिकच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीतील...

नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीतील तिढा कायम!

नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीतील तीनही घटक पक्षांनी आपापली ताठर भूमिका कायम ठेवल्याने हा तिढा अजूनही सुटण्याची चिन्हे दिसत नाहीत. नाशिक हा उत्तर महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या सर्वात महत्त्वाचा जिल्हा असल्यानेच नव्हे तर 2027मध्ये नाशिकमध्ये कुंभमेळा भरणार असल्यानेही नाशिकचे पालकमंत्रीपद महत्त्वाचे आहे. कुंभमेळ्यासाठी 7,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या पायाभूत सुविधांशी संबंधित प्रकल्पांच्या नियोजन आणि अंमलबजावणीमध्ये पालकमंत्री महत्त्वाची भूमिका बजावतील. सध्या या प्रकरणावरील गतिरोध संपवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात अनौपचारिक चर्चा सुरू आहे. तथापि, आतापर्यंत झालेल्या चर्चेतून कोणताही सकारात्मक निकाल लागलेला नाही, कारण तिघांनाही वाटते की हे पद त्यांच्या संबंधित पक्षांकडे गेले पाहिजे. जितक्या लवकर हा तिढा सुटेल, तितके ते नाशिकसाठी फायदेशीर ठरेल, अशी जनभावना आहे.

पालकमंत्री

गेल्या महिन्यात, राज्य सरकारने भाजपचे कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांना नाशिकचे पालकमंत्री म्हणून घोषित केले. परंतु नंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधामुळे त्यांनी हा निर्णय मागे घेतला. शिंदे यांचा युक्तिवाद असा आहे की, मागील महायुती सरकारच्या काळात नाशिकचे पालकमंत्री म्हणून शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री दादा भुसे यांची कामगिरी ‘विश्वसनीय’ होती. आताही ते मंत्रिमंडळात आहेत. त्यामुळे त्यांचीच पालकमंत्री म्हणून नेमणूक व्हावी, असा आग्रह शिवसेनेकडून होत असल्याचे कळते. मागील महायुती सरकारच्या काळात राष्ट्रवादीने भुसे यांच्या जागी छगन भुजबळ यांना घेण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्यावेळी मुख्यमंत्री असलेल्या शिंदे यांनी ते मान्य करण्यास नकार दिला होता.

पालकमंत्री

महायुतीच्या अंतर्गत सूत्रांनी सांगितले की, नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक आमदार असल्याने नाशिकचे पालकमंत्रीपद मिळावे यासाठी अजित पवार उत्सुक आहेत. नाशिकमधील 15 विधानसभा जागांपैकी राष्ट्रवादीने सात, त्यानंतर भाजपने 5 आणि शिवसेनेने 2 जागा जिंकल्या आहेत. उर्वरित जागा एआयएमआयएमने जिंकली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कॅबिनेट मंत्री नरहरी झिरवाळ म्हणाले की, रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्र्यांच्या प्रश्नांवर महायुतीच्या नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे. रायगड पालकत्वाचा प्रश्न प्रथम सोडवला जाईल आणि नंतर नाशिक पालकमंत्र्यांच्या प्रश्नावर निर्णय घेतला जाईल.

पालकमंत्री

भाजपमधील मंडळींना खात्री आहे की, महाजन यांचीच पुन्हा नाशिकचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यास फडणवीस दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना राजी करू शकतील. महाजन हे फडणवीस यांचे विश्वासू सहकारी आहेत. फडणवीस यांना नाशिकचे पालकमंत्री बनवायचे आहे, कारण महाजन यांना 2015मधील कुंभमेळ्याच्या आयोजनाचा अनुभव आहे. भाजपने या महायुती सरकारमध्ये नाशिकमधील पाच आमदारांपैकी एकाही आमदाराला मंत्रिपद दिलेले नाही. जिल्ह्यात राष्ट्रवादीकडे दोन आणि शिवसेनेकडे एक मंत्रीपद आहे. त्यामुळे नाशिकमध्ये भाजपला पालकमंत्रीपद मिळू द्यावे, अशी आग्रही मागणी आहे.

Continue reading

‘एआय’च्या नादात ‘कोअर’ विषयांकडे नका करू दुर्लक्ष!

सध्या सगळीकडे 'एआय'(आर्टिफिशियल इंटेलिजन्स) म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता आणि 'डेटा सायन्स'ची हवा आहे. पण, तुम्ही जर याच वर्षी इंजिनीअरिंगला ॲडमिशन घेण्याचा विचार करत असाल, तर हा रिपोर्ट तुमच्यासाठी 'गेम चेंजर' ठरू शकतो. प्रसिद्ध करिअर सल्लागार जयप्रकाश गांधी यांनी विद्यार्थ्यांना एक...

‘महिला आरक्षण’ हे जातीनिहाय जनगणनेला बगल देण्याचे षडयंत्र!

पंतप्रधान नरेंद्र मोदी महिला आरक्षणाचा वापर केवळ जातीनिहाय जनगणना लांबणीवर टाकण्यासाठी करत असल्याचा आरोप काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी केला आहे. आरक्षणाच्या नावाखाली सरकार मुख्य मुद्द्यांपासून जनतेचे लक्ष भरकटवत असल्याची टीका त्यांनी केली. सोनिया गांधी यांच्या मते, सरकारला देशातील...

जगातल्या १० सर्वात उष्ण शहरांत अकोला दुसऱ्या क्रमांकावर

महाराष्ट्र सध्या उन्हाच्या भीषण तडाख्याने होरपळून निघत असून, विदर्भातील तापमानाने जागतिक विक्रम मोडायला सुरुवात केली आहे. 'एल डोराडो वेदर' आणि हवामान विभागाच्या ताज्या आकडेवारीनुसार, जगातील १० सर्वात उष्ण शहरांच्या यादीत विदर्भातील तब्बल ४ शहरांचा समावेश झाला आहे. यात अकोला...
Skip to content