Homeचिट चॅटसूर्यवंशी क्षत्रिय समाज...

सूर्यवंशी क्षत्रिय समाज क्रिकेट स्पर्धा 18 नोव्हेंबरपासून

मुंबईच्या सूर्यवंशी क्षत्रिय ज्ञाती समाजाच्यावतीने सीझन क्रिकेटची एस के सी एल टी-२० स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या लीगमध्ये सहा संघ भाग घेत आहेत. 18 नोव्हेंबरला या स्पर्धेची सुरुवात होणार असून अंतिम सामना 28 नोव्हेंबर रोजी खेळवला जाईल. 196 खेळाडूंनी या स्पर्धेसाठी नोंदणी केली होती. दोन नोव्हेंबर रोजी दादरच्या सूर्यवंशी क्षत्रिय सभागृहात, एका दिमागदार सोहळ्यात लिलाव पद्धतीने सहा संघमालकांनी नव्वद खेळाडूंची निवड केली. सूर्यवंशी वॉरियर, सिंबा सिक्सर, इन्स्पायर रॉयल, स्वराज इलेव्हन, आरडी ब्लास्टर आणि प्राइड ऑफ पालघर या संघांनी प्रत्येकी 15 खेळाडूंचा संघ तयार केला.

दीपक पाटील हे या स्पर्धेचे संचालक आहेत. सूर्यवंशी क्षत्रिय ज्ञाती समाजाचे अध्यक्ष प्रवीण महाले आणि चिटणीस जयंत पाटील यांचा यात मोलाचा वाटा आहे. या स्पर्धा पोलीस जिमखाना, मरीन लाइन्स येथे खेळवल्या जातील. अंतिम सामना रात्री प्रकाशझोतात खेळवला जाईल. विजेत्या संघास करंडक व एक लाख रुपयाचे बक्षीस तसेच उपविजेत्याला करंडक आणि पन्नास हजारांचे पारितोषिक असेल. इतर अनेक बक्षिसेही यावेळी दिली जाणार आहेत. याचे नियोजन जीआर स्पोर्ट्स यांनी केले आहे. सूर्यवंशी क्षत्रिय समाजातर्फे या क्रिकेट उत्सवाची सांगता 28 नोव्हेंबरला रात्री जल्लोषात केली जाईल, असे संघाचे चिटणीस जयंत पाटील यांनी कळवले आहे.

Continue reading

तासाभरातच तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री! ९ आमदारही घेणार शपथ!!

तमिळनाडूच्या राजकारणात एक ऐतिहासिक क्रांती घडत आहे. अभिनेता विजय यांच्या नेतृत्त्वाखालील 'तमिझगा वेत्री कळघम' (टीव्हीके) पक्षाने सत्तेसाठी आवश्यक असलेले पाठबळ मिळवले आहे. बहुमताचा ११८ हा जादुई आकडा गाठण्यासाठी आवश्यक असलेले समर्थन मित्रपक्षांकडून मिळाल्याने, आता थोड्याच वेळेत म्हणजे सकाळी १०...

11वी ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेच्या नियमित कॅप फेरी-1चे वेळापत्रक घोषित

महाराष्ट्रातल्या इयत्ता 11वीच्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेअंतर्गत शैक्षणिक वर्ष 2026-27साठी नियमित कॅप फेरी-1चे वेळापत्रक जाहीर झाले आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने हे जाहीर केले आहे. आज, 8 मे रोजी इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेशअर्जाचा भाग-1 आणि...

मतदारांना भुरळ घालण्यासाठी बाळगली 1,400 कोटींची अवैध सामग्री

भारतात 2024 साली लोकसभेसाठी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांपासून, नुकत्याच झालेल्या आसाम, केरळम्, पुदुच्चेरी, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या राज्यांच्या विधानसभा निवडणुका तसेच 5 राज्यांमधल्या 7 विधानसभेच्या पोटनिवडणुकांदरम्यान मतदारांना भुरळ घालण्यासाठी तब्बल 1,400 कोटी रुपयांहून अधिक किमतीची बेकायदेशीर सामग्री बाळगली होती....
Skip to content