Homeडेली पल्सराज्य सरकारी अधिकाऱ्यांचे...

राज्य सरकारी अधिकाऱ्यांचे नेते ग. दि. कुलथे यांचे निधन

महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे संस्थापक व मुख्य सल्लागार ग. दि. कुलथे यांचे काल, सोमवारी रात्री नऊ वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने नवी मुंबईच्या नेरूळ येथील राहत्या घरी निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. राज्य सरकारी अधिकाऱ्यांच्या संघटनेचे मार्गदर्शक म्हणून ते शेवटपर्यंत कार्यरत राहिले. मात्र, राज्य सरकारी कर्माचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय ५८ वर्षांवरून ६० करण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न त्यांच्या हयातीत फलद्रूप होऊ शकले नाहीत.

गेल्या ५० वर्षाँच्या संघटनात्मक वाटचालीत त्यांनी विक्रीकर कर्मचारी-अधिकारी संघटना, राज्य शासकीय कर्मचारी मध्यवर्ती संघटनांचे  नेतृत्व करताना विविध पदांची जबाबदारी सक्षमपणे पार पाडली आहे. राज्य शासनाच्या सेवेतील तब्बल ७२ खात्यातील राजपत्रित अधिकाऱ्यांच्या संघटनांची शिखर संघटना असलेल्या महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे संस्थापक व मुख्य सल्लागार म्हणून ते तहहयात कार्यरत होते. १९७० च्या दशकात त्यांनी विक्रीकर कर्मचारी संघटनेतून सुरू केलेली प्रवासगाथा पुढे विविध मध्यवर्ती कर्मचारी संघटनांमध्ये नेतृत्त्व करत अखेर “महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ” या शिखर संघटनेच्या स्थापनेपर्यंत पोहोचली. कोणत्याही प्रश्नात दोन्ही बाजू समजून घेऊन तोडगा काढणे, हे त्यांचे वैशिष्ट्यं होते. त्यांनी २०पेक्षा अधिक कर्मचारी संघटनांना एकत्र आणले. राज्यस्तरीय चर्चासत्र, प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करून अनेक नेतृत्त्वांना संधी दिली. प्रशासन आणि कर्मचाऱ्यांतला संवाद सतत चालू राहवा यासाठी सांघिक बैठका व तंत्रशुद्ध सादरीकरणाचा आग्रह त्यांनी धरला.

कुलथे यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी बुनियाद को-ऑप. हाऊसिंग सोसायटी, दुसरा मजला, सेक्टर १५ , नेरूळ (पूर्व), नवी मुंबई येथे सकाळी ९ ते १२.३० दरम्यान ठेवण्यात येणार आहे. पार्थिवावर दुपारी १.०० वाजता नेरूळ स्मशानभूमी, सेक्टर-४, नेरुळ (पश्चिम), नवी मुंबई येथे अंत्यसंस्कार होतील. ग. दि. कुलथे यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी दुःख व्यक्त केले आहे.

Continue reading

इराणवर हल्ला करण्यास अमेरिकी सेनेटची मनाई!

गेल्या जवळपास चार महिन्यांपासून पश्चिम आशियाला अशांतेच्या गर्तेत लोटणाऱ्या अमेरिका-इराण संघर्षात एक मोठी घडामोडी समोर आली आहे. १७ जून रोजी स्वाक्षरी झालेल्या सामंजस्य करारानंतर या दोन्ही देशांमध्ये युद्ध थांबले असले, तरी आता दोन्ही देशांमध्ये अटी आणि नियमांवरून पुन्हा एकदा...

६ महिन्यांत जाणार नवी मुंबईतली रेल्वेस्थानके रेल्वेच्या ताब्यात!

नवी मुंबईतील रेल्वे प्रवाशांसाठी एक अत्यंत मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला आणि प्रवाशांच्या गैरसोयीला कारणीभूत ठरणारा स्थानकांच्या देखभालीचा प्रश्न अखेर कायमचा सुटणार आहे. येत्या सहा महिन्यांत नवी मुंबईतील सर्व रेल्वेस्थानके सिडकोकडून मध्य रेल्वेकडे पूर्णपणे हस्तांतरित...

पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीच्या रासायनिक लेपनास स्थगिती!

कोट्यवधी हिंदूंचे आराध्यदैवत असलेल्या पंढरपूरच्या ‘स्वयंभू’ श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीवर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती आणि पुरातत्त्व विभागाकडून २३ आणि २४ जून रोजी प्रस्तावित असलेल्या रासायनिक वज्रलेपनास पंढरपूरच्या दिवाणी न्यायालयाने (कनिष्ठ स्तर) तत्काळ स्थगिती दिली आहे. वारकरी संप्रदाय आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाने...
Skip to content