Homeबॅक पेजकारगिल विजय दिनानिमित्त...

कारगिल विजय दिनानिमित्त टपाल तिकीट जारी

कारगिल विजय दिवसाच्या 25व्या वर्धापनदिनानिमित्त गोवा टपाल विभागाने शुक्रवारी पणजी येथील मुख्य टपाल कार्यालयात आयोजित एका कार्यक्रमात भारतीय नौदलाचे कमांडर जीपीएस बाजवा (सेवानिवृत्त) आणि टपाल सेवा (गोवा प्रदेश), पणजीचे संचालक रमेश पी. पाटील यांच्या हस्ते विशेष तिकीट जारी केले.

कमांडर जीपीएस बाजवा (सेवानिवृत्त) यांनी आपल्या भाषणात कारगिल युद्धात भारतीय नौदलाने बजावलेली महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित केली. तसेच त्यांनी युद्धादरम्यानचे आपले विचार आणि अनुभवही सामायिक केले. गोवा विभाग, पणजी येथील टपाल कार्यालयाचे वरिष्ठ अधीक्षक एस. व्ही. एल.

एन. राव, टपाल सेवा-l, गोवा प्रदेश, पणजीचे सहाय्यक संचालक संजय देसाई, गोवास्थित राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेचे सेवानिवृत्त वैज्ञानिक डॉ. एम. आर. रमेश कुमार आणि टपाल विभागाचे कर्मचारी या प्रकाशन समारंभाला उपस्थित होते.

डॉ. एम. आर. रमेश कुमार हे एक टपाल तिकीट संग्राहकदेखील आहेत. त्यांनी कारगिल विजय दिवसाच्या 25व्या वर्धापनदिनानिमित्त पणजी टपाल मुख्यालयाच्या समोर फिलाटली ब्युरो येथे टपाल तिकिटांचे वन-फ्रेम प्रदर्शन आणि ‘ऑलिम्पिक विश्वातील एक फिलाटेलिक प्रवास’ या संकल्पनेवर चार फ्रेमचे प्रदर्शन आयोजित केले आहे. हे प्रदर्शन 11 ऑगस्ट 2024पर्यंत लोकांसाठी खुले राहील.

Continue reading

६ महिन्यांत जाणार नवी मुंबईतली रेल्वेस्थानके रेल्वेच्या ताब्यात!

नवी मुंबईतील रेल्वे प्रवाशांसाठी एक अत्यंत मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला आणि प्रवाशांच्या गैरसोयीला कारणीभूत ठरणारा स्थानकांच्या देखभालीचा प्रश्न अखेर कायमचा सुटणार आहे. येत्या सहा महिन्यांत नवी मुंबईतील सर्व रेल्वेस्थानके सिडकोकडून मध्य रेल्वेकडे पूर्णपणे हस्तांतरित...

पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीच्या रासायनिक लेपनास स्थगिती!

कोट्यवधी हिंदूंचे आराध्यदैवत असलेल्या पंढरपूरच्या ‘स्वयंभू’ श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीवर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती आणि पुरातत्त्व विभागाकडून २३ आणि २४ जून रोजी प्रस्तावित असलेल्या रासायनिक वज्रलेपनास पंढरपूरच्या दिवाणी न्यायालयाने (कनिष्ठ स्तर) तत्काळ स्थगिती दिली आहे. वारकरी संप्रदाय आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाने...

हा तर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाच्या विश्वासार्हतेवरच आघात!

शिवसेनेतल्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांचे आज उफाळून आलेले कथित बंड हे केवळ खासदारांचे बंड नाही, तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाच्या विश्वासार्हतेवर झालेला दुसरा मोठा आघात आहे. २०२२मध्ये आमदारांनी दिलेला धक्का आणि आता २०२६मध्ये पुन्हा एकदा खासदारांनी फिरवलेली पाठ, या...
Skip to content