Homeकल्चर +संगीत-नाट्य क्षेत्रातल्या रसिकांनी...

संगीत-नाट्य क्षेत्रातल्या रसिकांनी अनुभवले भावूक क्षण!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात झालेल्या वार्षिक पुरस्कार वितरण सोहळ्याने उत्साहाचे आणि कलेच्या गौरवाचे वातावरण निर्माण झाले. संगीत, नाटक, साहित्य आणि अभिनय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कलाकारांना यंदा मानांकित करण्यात आले, ज्यामुळे उपस्थित रसिकांनी दाद देत टाळ्यांचा कडकडाट केला.

सोहळ्याची सुरुवात पारंपरिक पद्धतीने झाली. केंद्राच्या वतीने जाहीर केलेल्या पुरस्कारांची घोषणा आधीच झाली होती. पण प्रत्यक्ष वितरणाच्या वेळी मानकऱ्यांना सन्मानित करताना भावूक क्षण अनुभवायला मिळाले. संगीत शिक्षक जीवन गौरव पुरस्कार के. सीता राममोहन राव यांना त्यांच्या दीर्घकालीन संगीत शिक्षणातील योगदानाबद्दल हा सन्मान मिळाला. त्यांनी त्यांचा गौरव

करताना भावूक होऊन काही आठवणी सांगितल्या. संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ कलावंत पुरस्कार जयश्री पाटणेकर यांना देण्यात आला. त्यांच्या मनोगताने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. उत्कृष्ट नाट्यदिग्दर्शक कुमार सोहोनी यांचे नाट्य दिग्दर्शनातील कौशल्य ओळखून त्यांना सन्मानित करण्यात आले. ज्येष्ठ रंगकर्मी अजित भुरे यांना त्यांच्या रंगभूमीवरील दीर्घ प्रवासासाठी पुरस्कार मिळाला.

उत्कृष्ट विनोदी अभिनेत्री ईशा डे यांच्या विनोदी अभिनयाने प्रेक्षक मनमुराद हसले आणि त्यांना हा पुरस्कार मिळताना आनंद व्यक्त केला. याशिवाय, डॉ. नीती बडवे यांच्या ‘मुशाफिरी’ या पुस्तकाला उत्कृष्ट प्रवासवर्णनासाठी पुरस्कार देण्यात आला. संगीतक्षेत्रातील उदयोन्मुख अभिनेत्री तन्वी गोरे यांचाही सन्मान झाला. संगीत विशारद परीक्षेत मुंबई विभागातून प्रथम आलेल्या सौम्या क्षीरसागर आणि रोहन देशमुख यांना ताराबाई दीक्षित पुरस्काराने गौरवण्यात आले. कार्यक्रमात मानकऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. अनेकांनी आपल्या गुरूंचे, सहकाऱ्यांचे आणि कुटुंबियांचे आभार मानले. केंद्राच्या वतीने अधिकाधिक रसिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले होते, त्यानुसार सभागृह रसिकांनी खचाखच भरले होते.

Continue reading

मी हरलेच नाही, मग राजीनामा का देऊ? ममतांचा सवाल!

मी हरलेच नाही तर मग राजीनामा कशासाठी देणार, असा सवाल करत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास स्पष्ट नकार दिला. मी हरलेच नाही. मला हरवले गेले आहे. त्यामुळे लोकभवन म्हणजेच राजभवनावर जाऊन मी राजीनामा देणार...

दुसऱ्यांच्या घरी धुणी-भांडी करणारी महिला झाली आमदार!

जिद्द, चिकाटी आणि लोकशाहीवरचा विश्वास असेल, तर एखादी सामान्य व्यक्ती किती मोठी झेप घेऊ शकते, याचे जिवंत उदाहरण म्हणजे कलिता माजी. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात अनेक दिग्गजांचा पराभव झाला असला, तरी औसग्राम विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आलेल्या...

इराणने युद्धविराम तोडला!

गेल्या काही दिवसांपासून इराण आणि अमेरिकेत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला युद्धविराम आज अखेर इराणने तोडला. इराणने आज होर्मूझच्या सामुद्रधुनीत नाकेबंदीला असलेल्या अमेरिकेच्या युद्धनौकेवरच हल्ला केल्याचे वृत्त आहे. अमेरिकेची ही युद्धनौका इराणच्या हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला असता इराणने या...
Skip to content