Homeपब्लिक फिगरनिसर्ग वाचवण्यासाठी अनेक...

निसर्ग वाचवण्यासाठी अनेक हातांची गरज!

देवराई म्हणजे देवाच्या नावाने राखून ठेवलेल्या जंगलाचाही विपर्यास होत आहे. झाडे, नद्या आणि निसर्ग वाचवण्यासाठी अनेक हातांची गरज आहे, असे मत प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी निसर्ग अभ्यासक श्रीरंग फडके लिखित ‘रानसावल्या’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात व्यक्त केले. निसर्ग आणि पर्यावरणाचा समतोल राखणं कसं आवश्यक आहे हे सांगताना त्यांनी सह्याद्री देवराई, या त्यांच्या संस्थेमार्फत होत असलेल्या वृक्षारोपणाच्या कार्याची माहिती दिली.

निसर्ग

श्रीरंग फडके लिखित ‘रानसावल्या’ या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ मुंबईतल्या गोरेगाव येथील नंदादीप शाळेच्या कलाघर येथे नुकताच संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानच्या सहाय्यक आयुक्त डॉ. विनया जंगले उपस्थित होत्या. प्रमुख वक्ते म्हणून पर्यावरणप्रेमी प्रा. राजेंद्र केरकरही यावेळी उपस्थित होते.

डॉ. विनया जंगले यांनी वन्यजीवांच्या विश्वातील अनुभव कथन करताना पुस्तकातील संवेदनशीलतेचे कौतुक केले. विशेष म्हणजे यात लेखकाने निसर्ग आणि व्यक्ती यांचा सुरेख संगम साधला आहे, असे त्यांनी नमूद केले. शब्दांच्या रानसावल्या, केवळ कागदावरील नोंदी नसून तो निसर्गाशी साधलेला एक जिवंत संवाद आहे, अशा शब्दांत प्रा. राजेंद्र केरकर यांनी लेखकाचा गौरव केला. मराठी भाषेतल्या निसर्ग साहित्यात आजवर अनेक मातब्बर लेखकांनी आपापले अनुभव मांडले आहेत. त्यांचा वारसा लिखित स्वरुपात पुढे चालू राहवा. यात आपलंही छोटे योगदान असावं म्हणून हे निसर्ग अनुभवांचे लिखाण वाचकांसमोर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे, असे मनोगत लेखकाने व्यक्त केले. हे पुस्तक ब्रॉडवे बुक पब्लिशिंग हाऊस, गोवा यांनी छापून प्रसिद्ध केले असून त्याची किंमत ४०० रूपये आहे.

Continue reading

बाळासाहेबांच्या रस्त्यात तुडवण्याच्या विचाराची सावंतांनी करून दिली आठवण

जो पक्ष तुम्हाला उमेदवारी देऊन निवडून आणतो, त्या पक्षाशी एकनिष्ठ राहण्याऐवजी पक्षाशी गद्दारी करता? अरे अशी गद्दारी करणाऱ्याला रस्त्यात तुडवा, असे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांचा हाही विचार लक्षात ठेवणे आवश्यक आहे, अशी...

नामांकने पाठवा प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी

राष्ट्रीय पातळीवर अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या, प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी, नामांकने पाठवावीत, असे आवाहन केंद्र सरकारने केले आहे. देशभरातल्या मुलांना, त्यांच्या अद्वितीय कामगिरीसाठी हे पुरस्कार दरवर्षी प्रदान केले जातात. शौर्य, क्रीडा, सामाजिक शास्त्रे, विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण आणि...

मुंबई-अहमदाबाद ‘वंदे भारत’ला आजपासून कायमस्वरूपी 20 बोगी

रेल्वेने मुंबई सेंट्रल-अहमदाबाद ‘वंदे भारत एक्सप्रेस’च्या (गाडी क्रमांक 22961/22962) बोगींची संख्या 16वरून 20पर्यंत कायमस्वरूपी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. बोगी वाढविण्‍याचा हा बदल आजपासून म्हणजेच 28 एप्रिलपासून अंमलात आणण्‍यात येईल. या गाडीच्या  वाढवण्यात आलेल्या या चार डब्यांमध्ये तीन 'एसी चेअर...
Skip to content