Homeपब्लिक फिगरनिसर्ग वाचवण्यासाठी अनेक...

निसर्ग वाचवण्यासाठी अनेक हातांची गरज!

देवराई म्हणजे देवाच्या नावाने राखून ठेवलेल्या जंगलाचाही विपर्यास होत आहे. झाडे, नद्या आणि निसर्ग वाचवण्यासाठी अनेक हातांची गरज आहे, असे मत प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी निसर्ग अभ्यासक श्रीरंग फडके लिखित ‘रानसावल्या’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात व्यक्त केले. निसर्ग आणि पर्यावरणाचा समतोल राखणं कसं आवश्यक आहे हे सांगताना त्यांनी सह्याद्री देवराई, या त्यांच्या संस्थेमार्फत होत असलेल्या वृक्षारोपणाच्या कार्याची माहिती दिली.

निसर्ग

श्रीरंग फडके लिखित ‘रानसावल्या’ या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ मुंबईतल्या गोरेगाव येथील नंदादीप शाळेच्या कलाघर येथे नुकताच संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानच्या सहाय्यक आयुक्त डॉ. विनया जंगले उपस्थित होत्या. प्रमुख वक्ते म्हणून पर्यावरणप्रेमी प्रा. राजेंद्र केरकरही यावेळी उपस्थित होते.

डॉ. विनया जंगले यांनी वन्यजीवांच्या विश्वातील अनुभव कथन करताना पुस्तकातील संवेदनशीलतेचे कौतुक केले. विशेष म्हणजे यात लेखकाने निसर्ग आणि व्यक्ती यांचा सुरेख संगम साधला आहे, असे त्यांनी नमूद केले. शब्दांच्या रानसावल्या, केवळ कागदावरील नोंदी नसून तो निसर्गाशी साधलेला एक जिवंत संवाद आहे, अशा शब्दांत प्रा. राजेंद्र केरकर यांनी लेखकाचा गौरव केला. मराठी भाषेतल्या निसर्ग साहित्यात आजवर अनेक मातब्बर लेखकांनी आपापले अनुभव मांडले आहेत. त्यांचा वारसा लिखित स्वरुपात पुढे चालू राहवा. यात आपलंही छोटे योगदान असावं म्हणून हे निसर्ग अनुभवांचे लिखाण वाचकांसमोर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे, असे मनोगत लेखकाने व्यक्त केले. हे पुस्तक ब्रॉडवे बुक पब्लिशिंग हाऊस, गोवा यांनी छापून प्रसिद्ध केले असून त्याची किंमत ४०० रूपये आहे.

Continue reading

४ दिवसांत आज पुन्हा पेट्रोल व डिझेल महागले!

देशात गेल्या चार दिवसांत आज पुन्हा पेट्रोल आणि डिझेल महागले. पेट्रोलच्या किंमतीत ८७ पैसे प्रति लीटर तर डिझेसच्या किंमतीत ९१ पैसे प्रति लीटर वाढ करण्यात आली आहे. आज, मंगळवारी मध्यरात्रीपासून ही दरवाढ अंमलात आली आहे. तीन दिवसांपूर्वी १६ मे...

अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांसाठी २० मेपासून प्रवेश

दहावीनंतरच्या प्रथम वर्ष अभियांत्रिकी व तंत्रज्ञान तसेच वास्तुकला पदविका (पॉलिटेक्निक) अभ्यासक्रमांच्या शैक्षणिक वर्ष २०२६-२७साठी येत्या २० मेपासून प्रवेशप्रक्रिया सुरू होत आहे. ही प्रवेशप्रक्रिया वेळेत राबविण्यासाठी कालबद्ध नियोजन करण्याचे निर्देश राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. विद्यार्थ्यांना...

आधार समुदाय पोहोच शिबिरांचे यशस्वी आयोजन

भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI)अंतर्गत आधार सेवा केंद्र (ASK), वाशी यांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोग (NHRC) आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS) यांच्या सहकार्याने १० आणि ११ मे २०२६ रोजी नवी मुंबईतल्या महापे आणि सीबीडी बेलापूर येथे विशेष आधार...
Skip to content