Homeपब्लिक फिगरहा पाहा महायुती...

हा पाहा महायुती सरकारचा दुटप्पीपणा!

देशातीलच नव्हे तर जगातील शास्त्रज्ञ व वैद्यकीय तज्ज्ञ यांनी केलेल्या संशोधनाच्या आधारे कबुतरापासून माणसाच्या फुफ्फुसाला धोका निर्माण होतो, हे सिद्ध झाले आहे. न्यायालयाने योग्य निर्णय देत यावर बंदीही आणली असतानाही, दादरला एक समुदाय कबुतरांना खायला दाणे टाकून न्यायालयाच्या निर्णयाला विरोध दर्शवतो, तरीही महायुती सरकार ठोस कारवाई करीत नाही. याउलट पुण्यामध्ये गणपती मंडळांवर त्वरित खटले दाखल होतात. यातून महायुती सरकारचा दुटप्पीपणा दिसून येतो. काँग्रेस अल्पसंख्यांकांच्या दबावासमोर झुकते असा कायम प्रचार करणाऱ्या भारतीय जनता पक्षाने अल्पसंख्यांकातील एका समुदायाच्या आर्थिक ताकदीपुढे जणू शरणागतीच पत्करली आहे. यातून भा. ज. प. चा दुतोंडी चेहेरा उघड झाला आहे, असा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ प्रवक्ते प्रा. अनंत गाडगीळ यांनी नुकताच केला आहे.

माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, कोल्हापूरच्या हत्तीणीच्या प्रश्नाने जनतेच्या दुखावलेल्या भावना, दादरच्या कबुतरांच्या प्रश्नाने प्रदूषित झालेले वातावरण, वांद्र्याच्या वाघाने शिवाजीपार्कवर सुरु केलेला फेरफटका, या साऱ्या घटना हाताळताना महायुती सरकारची ‘सर्कस’ झाली आहे. सर्कसमध्ये ‘तारेवरची कसरत’, हे एक मोठे आकर्षण असते. कोल्हापुरातील हत्तीण आणि
वनतारातील ‘अंबारी’, दोन्ही सांभाळताना महायुती सरकारचीच तारेवरची कसरत होत आहे.

याशिवाय, सर्कशीमध्ये विदूषकाने विचित्र वक्तव्य करताच रिंगमास्टर त्याला फटका देतो. तेच चित्र राज्यातील मंत्र्यांचे वर्तन व वक्तव्यांनंतर राज्यात दररोज दिसून येत आहे. आतातर बांद्र्याच्या वाघाच्या आसनव्यवस्थेवर ‘सिंहां’सनावर बसलेले प्रतिक्रिया देऊ लागल्यामुळे एकंदरीत महायुती सरकारने स्वतःला ‘लाफ्टर क्लब’च बनविले आहे, अशी टीकाही प्रा. गाडगीळ यांनी केली.

1 COMMENT

Comments are closed.

Continue reading

‘एआय’च्या नादात ‘कोअर’ विषयांकडे नका करू दुर्लक्ष!

सध्या सगळीकडे 'एआय'(आर्टिफिशियल इंटेलिजन्स) म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता आणि 'डेटा सायन्स'ची हवा आहे. पण, तुम्ही जर याच वर्षी इंजिनीअरिंगला ॲडमिशन घेण्याचा विचार करत असाल, तर हा रिपोर्ट तुमच्यासाठी 'गेम चेंजर' ठरू शकतो. प्रसिद्ध करिअर सल्लागार जयप्रकाश गांधी यांनी विद्यार्थ्यांना एक...

‘महिला आरक्षण’ हे जातीनिहाय जनगणनेला बगल देण्याचे षडयंत्र!

पंतप्रधान नरेंद्र मोदी महिला आरक्षणाचा वापर केवळ जातीनिहाय जनगणना लांबणीवर टाकण्यासाठी करत असल्याचा आरोप काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी केला आहे. आरक्षणाच्या नावाखाली सरकार मुख्य मुद्द्यांपासून जनतेचे लक्ष भरकटवत असल्याची टीका त्यांनी केली. सोनिया गांधी यांच्या मते, सरकारला देशातील...

जगातल्या १० सर्वात उष्ण शहरांत अकोला दुसऱ्या क्रमांकावर

महाराष्ट्र सध्या उन्हाच्या भीषण तडाख्याने होरपळून निघत असून, विदर्भातील तापमानाने जागतिक विक्रम मोडायला सुरुवात केली आहे. 'एल डोराडो वेदर' आणि हवामान विभागाच्या ताज्या आकडेवारीनुसार, जगातील १० सर्वात उष्ण शहरांच्या यादीत विदर्भातील तब्बल ४ शहरांचा समावेश झाला आहे. यात अकोला...
Skip to content