Homeन्यूज ॲट अ ग्लांसकेरळवासियांना काल नव्याने...

केरळवासियांना काल नव्याने मिळाली ‘मोदींची गॅरंटी’!

केरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल, २९ मार्च रोजी पलक्कड आणि त्रिशूरमध्ये धडाकेबाज प्रचारदौरा केला. पारंपारिक पांढरा ‘मुंडू’ (धोतर) आणि कुर्ता अशा मल्याळी पेहरावात आलेल्या पंतप्रधानांचे केरळमध्ये अभूतपूर्व स्वागत करण्यात आले. ९ एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानापूर्वी भाजप-एनडीएच्या प्रचारात चैतन्य फुंकण्यासाठी आयोजित या दौऱ्याने राज्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापले असून, याला जनतेचा मोठा प्रतिसाद लाभला.

पलक्कड येथील ‘फोर्ट मैदान’वर झालेल्या भव्य जनसभेत मोदींनी चक्क ‘चेंडा’ (केरळचे पारंपारिक वाद्य) वाजवून उपस्थितांची मने जिंकली. आपल्या भाषणात त्यांनी सत्ताधारी एलडीएफ आणि विरोधी यूडीएफ या दोन्ही आघाड्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करत कडाडून टीका केली. “केरळला ५ लाख कोटींच्या कर्जात बुडवून दोन्ही आघाड्यांनी राज्याचा विकास रोखला आहे,” असे सांगत त्यांनी सुशिक्षित तरुणांचे स्थलांतर रोखण्यासाठी आणि ‘विकसित केरळ’ घडवण्यासाठी ‘मोदी गॅरंटी’ चा नारा दिला.

दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात त्रिशूरमधील ऐतिहासिक ‘स्वराज राऊंड’ येथे सुमारे ९०० मीटर लांब भव्य रोडशो पार पडला. यावेळी ५० हजारांहून अधिक लोकांचा जनसागर उसळला होता. कुम्मत्ती कली, पुलिकली आणि कथकली यांसारख्या पारंपारिक कलाप्रकारांनी पंतप्रधानांचे स्वागत करण्यात आले. केंद्रीय मंत्री सुरेश गोपी यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या शक्तीप्रदर्शनाद्वारे मोदींनी केरळमध्ये परिवर्तनाचे आवाहन केले असून, ४ मे रोजी लागणाऱ्या निकालात भाजपला किती यश मिळते, याकडे आता देशाचे लक्ष लागले आहे.

Continue reading

‘वंदे मातरम’वर आधारित चित्रपट निर्मिती स्पर्धेचे आयोजन

वंदे मातरम, या राष्ट्रीय गीताला 150 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांचा एक भाग म्हणून, केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने "व्हीएम फ्रेम्स" या राष्ट्रीय चित्रपट निर्मिती स्पर्धेची घोषणा केली आहे. या स्पर्धेद्वारे नागरिकांना दृश्यात्मक कथाकथनाच्या माध्यमातून राष्ट्रगीताचा भाव सर्जनशीलतेने...

आता पंतप्रधान प्रशिक्षणार्थी योजनेसाठी अंतिम वर्षाचे विद्यार्थीही पात्र

युवकांची रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढवण्यासाठी केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने, पंतप्रधान प्रशिक्षणार्थी योजनेच्या प्रायोगिक टप्प्यावर, पात्रता निकषात बदल केले आहेत. त्यानुसार, आता पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाचे विद्यार्थीही याकरीता पात्र होतील. यामुळे, विद्यार्थ्यांना देशातल्या आघाडीच्या कंपन्यांमध्ये संरचनात्मक, प्रशिक्षणार्थी कार्यक्रमाच्या...

मुंबईच्या शहरी भागात आज पाणीपुरवठा विस्कळीत

मुंबई महापालिकेतर्फे शिवडी येथील टनल भंडारवाडा टेकडी जलाशय वाहिनीवर १५०० मिलीमीटर व्यासाचे दोन बटरफ्लाय व्हॉल्व बसविण्याचे काम हाती घेतले जात आहे. हे काम भंडारवाडा टेकडी जलाशय, फॉसबेरी टेकडी जलाशय आणि गोलंजी टेकडी जलाशय यांचा पाणीपुरवठा सुव्यवस्थित करण्यासाठी केले जाणार...
Skip to content