Homeन्यूज ॲट अ ग्लांसकेरळवासियांना काल नव्याने...

केरळवासियांना काल नव्याने मिळाली ‘मोदींची गॅरंटी’!

केरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल, २९ मार्च रोजी पलक्कड आणि त्रिशूरमध्ये धडाकेबाज प्रचारदौरा केला. पारंपारिक पांढरा ‘मुंडू’ (धोतर) आणि कुर्ता अशा मल्याळी पेहरावात आलेल्या पंतप्रधानांचे केरळमध्ये अभूतपूर्व स्वागत करण्यात आले. ९ एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानापूर्वी भाजप-एनडीएच्या प्रचारात चैतन्य फुंकण्यासाठी आयोजित या दौऱ्याने राज्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापले असून, याला जनतेचा मोठा प्रतिसाद लाभला.

पलक्कड येथील ‘फोर्ट मैदान’वर झालेल्या भव्य जनसभेत मोदींनी चक्क ‘चेंडा’ (केरळचे पारंपारिक वाद्य) वाजवून उपस्थितांची मने जिंकली. आपल्या भाषणात त्यांनी सत्ताधारी एलडीएफ आणि विरोधी यूडीएफ या दोन्ही आघाड्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करत कडाडून टीका केली. “केरळला ५ लाख कोटींच्या कर्जात बुडवून दोन्ही आघाड्यांनी राज्याचा विकास रोखला आहे,” असे सांगत त्यांनी सुशिक्षित तरुणांचे स्थलांतर रोखण्यासाठी आणि ‘विकसित केरळ’ घडवण्यासाठी ‘मोदी गॅरंटी’ चा नारा दिला.

दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात त्रिशूरमधील ऐतिहासिक ‘स्वराज राऊंड’ येथे सुमारे ९०० मीटर लांब भव्य रोडशो पार पडला. यावेळी ५० हजारांहून अधिक लोकांचा जनसागर उसळला होता. कुम्मत्ती कली, पुलिकली आणि कथकली यांसारख्या पारंपारिक कलाप्रकारांनी पंतप्रधानांचे स्वागत करण्यात आले. केंद्रीय मंत्री सुरेश गोपी यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या शक्तीप्रदर्शनाद्वारे मोदींनी केरळमध्ये परिवर्तनाचे आवाहन केले असून, ४ मे रोजी लागणाऱ्या निकालात भाजपला किती यश मिळते, याकडे आता देशाचे लक्ष लागले आहे.

Continue reading

अखिलेश यादवचे बंधू प्रतिक यांचा संशयास्पद मृत्यू!

समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंग यादव यांचे लहान पुत्र तसेच समाजवादी पार्टीचे सध्याचे प्रमुख अखिलेश यादव यांचे लहान सावत्र बंधू प्रतिक यादव यांचे आज पहाटे वयाच्या ३८व्या वर्षी आकस्मिक निधन झाले. भारतीय जनता पार्टीच्या नेत्या...

जान्हवी मोरे स्मृती कॅरम स्पर्धेत स्वरा कदम, ओमकार वडर विजेते

डोंबिवली (पूर्व) येथील दत्तनगर उत्कर्ष मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय कॅरमपटू जान्हवी मोरे स्मृतिप्रीत्यर्थ १६ वर्षांखालील मुलां-मुलींच्या राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत अनुक्रमे कोल्हापूरच्या ओमकार वडर आणि रत्नागिरीच्या स्वरा कदमने विजेतेपदाचा मान मिळवला. शास्त्री हॉलमध्ये झालेल्या या स्पर्धेत ठाणे, मुंबई, मुंबई...

तृणमूलच्या विळख्यातून प. बंगाल बाहेर! आता कसोटी सुवेंधूंची!!

ममता बॅनर्जींचा पाठोपाठ दोन्ही विधानसभा निवडणुकीत सलग दोन वेळा पराभव करून देशात जायंट किलर ठरलेले सुवेंधू अधिकारी यांनी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून रविवारी शपथ घेतली आणि राज्यात नव्या पर्वाला सुरूवात झाली. ममता बॅनर्जीच्या पंधरा वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत सतत हिंसाचार,...
Skip to content