Homeमाय व्हॉईसबरे झाले! उद्धव...

बरे झाले! उद्धव ठाकरे मातोश्रीच्या बाहेर पडले!!

एकनाथ शिंदे गटाने शिवसेनेत उठाव केल्यावर गेले सात-आठ महिने शिवसेनेच्या ठाकरे गटाचे पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर शक्तीप्रदर्शन केलेले नव्हते. शिवसेना भवनात ते येत होते. परंतु तेथे ते फक्त शिवसेना नेते आणि शिवसैनिकांना भेटत होते. बांद्रा येथील मातोश्रीच्या प्रांगणात त्यांनी शिवसैनिकांना संबोधितही केले होते. (तेव्हाची तेथील गर्दी काही शेकड्यांची होती. हीच माहिती काही मोजक्याच शिवसेना विरोधकांच्या दातात अडकून पडली होती.) मातोश्रीसमोर काय नेहमीच शिवसैनिक असतात. त्यात काय मोठे, असे कुजके बारही सोडले गेले होते. परंतु दोन दिवसांपूर्वी संध्याकाळी बिर्ला मातुश्री सभागृहात स्थानीय लोकाधिकार समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमातील शिवसैनिकांच्या गर्दीने विरोधकांची तोंडे गप्प केली आहेत, असेच म्हणावे लागेल.

शिवसैनिक आणि स्थानीय लोकाधिकार संघाच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी नेटाने प्रयत्न करून हा मराठी भाषा दिन मोठ्या प्रमाणावर यशस्वी केला असेच म्हणावे लागेल. शिवसेना फुटीनंतरचा हा उद्धव यांचा पहिलाच जाहीर कार्यक्रम होता. आज मराठी भाषा दिन आणि आजपासूनच सुरू झालेल्या राज्य विधिमंडळ अधिवेशनाची सुरुवात मात्र राज्यपालांनी हिंदीतून केली, असा सणसणीत बोचाकारा काढत उद्धवरावांनी चौफेर टोलेबाजीस सुरुवात केली. मराठी भाषा दिनाचा कार्यक्रम असल्याने राजकारणावर कमीच बोलेन, अशी सुरुवात करून मराठी मुलांच्या नोकऱ्यांसाठी स्थानीय लोकाधिकार महासंघाने केलेल्या कामाचा आवर्जून उल्लेख केल्यानंतर मात्र त्यांच्या भाषणाची गाडी राजकारणावर आली आणि ती तशी येणे आवश्यकच होते, कारण राजकारण आले नसते तर विरोधकांच्या हातात आयते कोलितच मिळाले असते…

उद्धव

अपेक्षेप्रमाणे निवडणूक आयोगावर बोलणे झालेच. हा चुनाव आयोग नाही तर हा चुना लगाव आयोग असल्याची कठोर टीका करून आयोगाने आमच्यावर घोर अन्याय केला असल्याचा त्यांनी पाढाच वाचला. आमच्या पक्षाप्रमाणेच रामविलास पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षात फूट पडली. त्यांचाही वाद निवडणूक आयोगाकडे गेला. परंतु या प्रकरणात मात्र आयोगाने निवडणूक चिन्ह वा पक्षाचे नाव कोणत्याही एका गटास दिले नाही. जे चालू आहे तेच चालू देण्यात आले, कारण त्या दोन्ही गटाचा भारतीय जनता पक्षास पाठिंबा आहे. हे एकच नाही तर असे अनेक पक्षपात आहेत आणि ते आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणणार आहोतच. विरोधी गटाने आपले नाव चोरले तसेच धनुष्यबाणही चोरले पण ठाकरे हे नाव कसे चोरणार? असा खोचक सवालही त्यांनी केला.

समृद्धीवर मराठीचा दुःस्वास

याआधी बोलताना माजी उद्योग मंत्री व ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांनी समृद्धी महामार्गावरील नामफलकात मराठीचा दुःस्वास केला जात असून बाळासाहेबांच्या प्रेमाचा दिखावा करणाऱ्यांच्या राज्यात बाळासाहेबांचे नावही या महामार्गावर धड लिहिलेले नाही. इतकेच नव्हे तर त्याचे नावही मिंधे गट घेत नसल्याची तक्रार देसाई यांनी केली. या छोटेखानी समारंभात एक गोष्ट मात्र प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे उद्धवजींचे आतापर्यंतचे मौन आणि जेव्हा त्यांनी मौन सोडले तेव्हा “it is better to keep your mouth closed and let people think you are a fool that’s to open it and removed all doubts” या विधानाची पुरेपूर प्रचिती आली. “politics is opium for the masses of today” हा टॅग बदलून लावण्याची शक्ती या गर्दीत दिसली असे म्हटले तर वावगे ठरू नये….

Continue reading

आग्रीपाड्यातली ‘यास्मिन’ आणि पोलिसांचे ‘डोला रे डोला…’!

बुधवारच्या जवळजवळ सर्वच वर्तमानपत्रात 'आग्रीपाडा येथील ड्रग फॅक्टरी उद्ध्वस्त', अशी बातमी वाचली व मन एकदम भूतकाळात गेले. लगेचच मनाशी ठरवले, आज आग्रीपाड्यात जायचेच आणि गेलोही! आग्रीपाडा पोलीसठाण्याच्या दारातच उतरलो. आजूबाजूला नजर टाकली. प्रशस्त रस्ता, गगनचुंबी इमारती.. काही इमारती तर...

ठाणे पालिकेच्या गावदेवी मार्केटला ना ओसी, ना योग्य अग्नीसुरक्षा!

ठाणे शहरातील महापालिकेच्या गावदेवी मार्केटला आग लागून सर्व मार्केट आगीत भस्मसात झाल्याला आज आठवडा झाला असूनही मार्केट सफाईचे काम अत्यंत हळू सुरु असल्याबाबत गाळेधारकांनी संताप व्यक्त केला आहे. यांत्रिक झाडू वा आधुनिक पद्धतीने सफाई न करता बाबा आदमच्या काळाप्रमाणे...

गावदेवी मार्केटची आग संशयाच्या भोवऱ्यात!

दोन दिवसांपूर्वीच आमचे वकीलमित्र गणेश सोवनी यांनी सव्वा सात वाजता पाठवलेला एक मेसेज पाहून मी हादरलोच! मेसेज छायाचित्रासह असल्याने त्याचे गांभीर्य लगेचच लक्षात आले व सकाळची सर्व कामे आटोपल्यावर ठाण्यातीलच गावदेवी मार्केट परिसरात जाण्याचे पक्के केले. वकीलसाहेबांनी पाठवलेल्या मेसेजमध्ये...
Skip to content