Homeपब्लिक फिगरभारतीयांना अमेरिकेत दुसऱ्या...

भारतीयांना अमेरिकेत दुसऱ्या कुणालातरी निवडून आणायचे होते!

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जो बायडेन कार्यकाळात भारतातील मतदान प्रक्रियेसाठी अमेरिकेने दिलेल्या 21 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सच्या निधीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. फ्लोरिडातील मियामी येथे झालेल्या एफआयआय प्रायोरिटी शिखर परिषदेला संबोधित करताना ट्रम्प यांनी अमेरिकन निवडणुकांमध्ये परकीय हस्तक्षेपाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. भारतीयांना अमेरिकेत दुसऱ्याला कुणाला तरी निवडून आणायचे होते, असा अप्रत्यक्ष आरोपही ट्रम्प यांनी केला.

ट्रम्प यांनी म्हटले आहे की, भारतातील मतदान प्रक्रियेसाठी आपल्याला 21 दशलक्ष खर्च करण्याची आवश्यकता का आहे? मला वाटते की, ते दुसऱ्याला निवडून आणण्याचा प्रयत्न करत होते. आपल्याला भारत सरकारला ठणकावून सांगावे लागेल. रशियाने अमेरिकेत सुमारे दोन हजार डॉलर्स खर्च केले. त्या तुलनेत भारतीय खर्च खूप मोठा होता. रशियाने दोन हजार डॉलर्स काही इंटरनेट जाहिरातींवर खर्च केला.

ट्रम्प यांनी भारताची मजबूत आर्थिक स्थिती आणि अमेरिकन वस्तूंवरील उच्च करांकडे लक्ष वेधले. त्यांनी म्हटले की, भारताला करांतून खूप पैसे मिळाले. भारत हा अमेरिकेच्या बाबतीत जगातील सर्वात जास्त कर आकारणाऱ्या देशांपैकी एक आहे. भारतातील शुल्क खूपच जास्त असल्याने अमेरिकी उद्योग तिथे आता क्वचितच प्रवेश करू शकतात. हाच मुद्दा धरून ट्रम्प यांनी परदेशातील मतदानावर लाखो डॉलर्स खर्च करण्याची गरज आहे का, असा प्रश्न उपस्थित केला. ट्रम्प पुढे म्हणाले की, मला भारताबद्दल खूप आदर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच अमेरिका दौऱ्यावर आले होते; पण आम्ही भारतातील मतदानासाठी 21 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स देत आहोत. अमेरिकेतील मतदानाचे काय? अरे, आम्ही इकडे 500 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स खर्च केले. त्याला लॉकबॉक्स म्हणतात.

Continue reading

‘वंदे मातरम’वर आधारित चित्रपट निर्मिती स्पर्धेचे आयोजन

वंदे मातरम, या राष्ट्रीय गीताला 150 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांचा एक भाग म्हणून, केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने "व्हीएम फ्रेम्स" या राष्ट्रीय चित्रपट निर्मिती स्पर्धेची घोषणा केली आहे. या स्पर्धेद्वारे नागरिकांना दृश्यात्मक कथाकथनाच्या माध्यमातून राष्ट्रगीताचा भाव सर्जनशीलतेने...

आता पंतप्रधान प्रशिक्षणार्थी योजनेसाठी अंतिम वर्षाचे विद्यार्थीही पात्र

युवकांची रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढवण्यासाठी केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने, पंतप्रधान प्रशिक्षणार्थी योजनेच्या प्रायोगिक टप्प्यावर, पात्रता निकषात बदल केले आहेत. त्यानुसार, आता पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाचे विद्यार्थीही याकरीता पात्र होतील. यामुळे, विद्यार्थ्यांना देशातल्या आघाडीच्या कंपन्यांमध्ये संरचनात्मक, प्रशिक्षणार्थी कार्यक्रमाच्या...

मुंबईच्या शहरी भागात आज पाणीपुरवठा विस्कळीत

मुंबई महापालिकेतर्फे शिवडी येथील टनल भंडारवाडा टेकडी जलाशय वाहिनीवर १५०० मिलीमीटर व्यासाचे दोन बटरफ्लाय व्हॉल्व बसविण्याचे काम हाती घेतले जात आहे. हे काम भंडारवाडा टेकडी जलाशय, फॉसबेरी टेकडी जलाशय आणि गोलंजी टेकडी जलाशय यांचा पाणीपुरवठा सुव्यवस्थित करण्यासाठी केले जाणार...
Skip to content