Homeन्यूज ॲट अ ग्लांसईएमआयवर स्मार्टफोन, लॅपटॉप...

ईएमआयवर स्मार्टफोन, लॅपटॉप घेताय? मग लक्षात ठेवा…

जर तुम्ही बँक किंवा नॉन-बँकिंग वित्तीय कंपनी (एनबीएफसी)कडून ईएमआयवर मोबाईल (स्मार्टफोन), लॅपटॉप किंवा इतर डिजिटल गॅझेट खरेदी केले असेल आणि त्याचे हप्ते भरण्यास विलंब केला, तर आता बँका ते दूरस्थपणे (रिमोटली) लॉक करू शकतील. भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय)ने बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित डिजिटल कर्ज आणि ग्राहकोपयोगी टिकाऊ वस्तूंच्या कर्जासंदर्भात ही महत्त्वपूर्ण नियामक मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, कर्जाची वसुली न झाल्यास कर्ज देणाऱ्या संस्था आता विशिष्ट सॉफ्टवेअर आणि सुरक्षा तंत्रज्ञानाच्या मदतीने ग्राहकाचे डिव्हाइस लॉक करू शकतील. जर ग्राहक विहित मुदतीत आपले मासिक हप्ते भरण्यात अयशस्वी ठरला, तर बँक किंवा फायनान्स कंपनी त्या डिव्हाइसचा वापर थांबवेल.

ग्राहकाच्या गोपनीयतेचे रक्षण करणे बंधनकारक

या सुविधेचा वापर करताना, बँका आणि डिजिटल कर्ज देणाऱ्या ॲप्सना ग्राहकाच्या गोपनीयतेचे रक्षण करणे बंधनकारक असेल. कर्ज घेताना डिव्हाइस लॉक करण्यासाठी बँक ग्राहकाची पूर्वसंमती घेतील. तथापि, या प्रक्रियेदरम्यान ग्राहकाचा वैयक्तिक डेटा, फोटो, संदेश किंवा बँकिंग तपशील ॲक्सेस करण्याची किंवा लीक करण्याची कोणतीही परवानगी दिली जाणार नाही.

हफ्ते भरल्यास डिव्हाइस आपोआप अनलॉक

नवीन नियमांनुसार, ग्राहकाने डिजिटल पद्धतीने किंवा ऑनलाइन पद्धतीने त्याच्या थकीत ईएमआयचे पेमेंट पूर्ण करताच, त्याचे डिव्हाइस सिस्टीमद्वारे आपोआप अनलॉक केले जाईल. या उपायामुळे डिजिटल कर्ज क्षेत्रातील फसवणूक आणि अनुत्पादक मालमत्ता (एनपीए) यांना आळा बसण्याची अपेक्षा आहे.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content