Homeन्यूज अँड व्ह्यूजयंदाच्या पावसातही ठाण्यातल्या...

यंदाच्या पावसातही ठाण्यातल्या आनंदाश्रम परिसराची रडगाथा सुरूच!

पावसाळा सुरु झाला की ठाणे शहर व आसपासच्या भागातील विविध रस्त्याच्या कहाण्यांनी वर्तमानपत्रे भरून जात असतात. (तसे पाहिले तर इतर शहरांमध्येही अशीच रडकथा असते.) ठाणे महापालिकेतील सत्ताकेंद्राचे महत्त्वाचा बिंदू असलेल्या ‘आनंदाश्रम’ परिसरातील रस्त्यांचीही अशीच रडकथा आहे. वरवर पाहता रस्ता ठीक वाटतो. परंतु पावसाळ्यात त्याचे खरे स्वरूप उघड झाले आहे. पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी जो पॅसेज निर्माण केलेला आहे तो एकदम बकवास आहे. हा पॅसेज गेल्या काही वर्षांत नव्याने केला गेलाच नसल्याची माहिती आली आहे.

आश्रमाशेजारी पारशी जनसमुदयाचा भूखंड आहे. त्याचे प्रवेशद्वारही रद्दड आहे. लोकनेते आनंद दिघे यांच्या पुतळ्याच्या उजव्या बाजूस एक नवी इमारत उभी राहिली आहे. या इमारतीसाठी काही सुविधा देणे क्रमप्राप्त होते. त्यानुसार रस्त्याच्या मधोमध खड्डे खणून या सुविधा देण्यात आल्या. याबाबत आक्षेप नाही. परंतु नंतर हा रस्ता संबंधितांनी जवळजवळ 15/20 दिवस ठीक

केलेला नव्हता. अखेर तो केला गेला. पण तो समतल नाही. त्यामुळे नको तेथे ‘जर्क’ बसत आहेत. आश्रमातून तालावपाळीच्या दिशेने जाणारा फुटपाथ आश्रमाच्या हद्दीपर्यंत उत्तम आहे. मात्र इतरत्र बकवास आहे. महापालिका चालवणाऱ्या पक्षनेत्याला हा सर्वच फूटपाथ चकाचक करायचा होता असे नागरिकांचे मत आहे.

मार्केट सुरु होतानाच्या रस्त्यावर थोडा पाऊस पडला तरी पाणी तुंबते! गेली अनेकवर्षे यावर उपायच शोधला गेलेला नाही. तीच गत वाहतूक चौकीच्या बाजूला असलेल्या मैदानाची झाली आहे. मैदानात तर चिखल आहेच. परंतु प्रवेशमार्गाचीही हालत झालेली आहे. तसेच ठाणे स्थानकाकडे जाणाऱ्या सॅटिस पुलाखालील रस्त्यावर पाणी तुम्बण्याची समस्या अजूनही सुरूच आहे. (तालावपळीच्या समोरील बाजूस) आता सत्ताकेंद्र असलेल्या आनंदाश्रम परिसरातील उण्यापुऱ्या 100-150 पावलांत महापालिकेच्या अशा कारभाराचा अनुभव येत असेल तर घोडबंदर रोड, कोपरी, माजिवाडा, आनंद नगर, लोकमान्य नगर, कोलशेत, ढोकाळी नाका आदी परिसरात काय अनुभव येत असतील याचा विचारच केलेला बरा!

छायाचित्र मांडणीः सोनाली वऱ्हाडे

Continue reading

वाड्यातला रस्ता २० वर्षे अर्धवट!

पालघर जिल्ह्याच्या वाडा तालुक्यातील रस्त्यांची ही स्थिती आहे. वाड्यातील एसटी थांब्याच्या आसपास सर्वत्र असेच रस्ते आहेत. मधला रस्ता सिमेंट काँक्रिटचा व बाजूच्या दोन्ही बाजूस कच्चा रस्ता. वास्तविक ज्या कंत्राटदाराने काँक्रिटचा रस्ता बांधला त्यानेच बाजूचा भागही व्यवस्थित डांबरी रस्ता करायचे...

आव्हान भाजप-शिवसेनेपुढचे!

राज्यातील महापालिका निवडणुका अटीतटीच्या झाल्या. त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा देवाभाऊ व उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी बाजी मारल्याबद्दल त्या दोघांचे मनापासून अभिनंदन! विशेषतः मुंबई महापालिकाही त्यांनी पहिल्याच फटक्यात ताब्यात घेतल्याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन. राज्यातील अन्य महापालिका जिंकणे आणि मुंबई...

कुठेकुठे मुंबई आहे हे मतदानानंतरतरी कळावे!

तब्बल सात वर्षानंतर उद्या मुंबई महापालिकेची निवडणूक होत आहे. आता मतदानाला सुरुवात झाली आहे. निवडणुकीत काय होईल, काय नाही यांचे काही अंदाज माध्यमे आणि वर्तमानपत्रांनी वर्तवलेले आहेत. हे अंदाज खरे की खोटे हेही अवघ्या काही तासांत स्पष्ट होणार आहे....
Skip to content