Homeमाय व्हॉईससायनला मुंबईच्या दोन्ही...

सायनला मुंबईच्या दोन्ही पालकमंत्र्यांनी चालून दाखवावेच!

“मुकी बिचारी कुणीही आणि ‘कशीही’ हाका…” मुंबईच्या शीव (सायन) येथील जुना पूल पाडून नवीन पुलाचे बांधकाम सुरु झाले आहे. हा पूल पाडण्याआधी जनतेला त्रास होईल, वाहतुकीचे काय होईल आदी अनेक प्रश्न घेऊन सर्वच राजकीय पक्षांनी एकच कल्ला केला होता, हे जनता अजून विसरलेली नाही. जनतेची काळजी आम्हालाच आहे, अशा आविर्भावात सर्व आंदोलने सुरु हॊती. अखेर सर्वसमंतीने पूल पाडून नवे बांधकाम सुरु करण्याबाबत एकमत झाले. मात्र, पूल पाडल्यानंतर शीव रेल्वेस्थानकात उतरणाऱ्या व येणाऱ्या प्रवाशांच्या हालाबाबत सर्वच राजकीय पक्षांनी ‘अर्थपूर्ण मौन’ स्वीकारल्याचे दिसत आहे.

काही कामानिमित्त दोन दिवस शीव येथे जावे लागले. पूर्वेकडे जाताना कसरत करावी लागत आहे. नवीन पूल होणार आहे म्हणून जनता हेही सहन करत आहे. परंतु या महानगरातील रेल्वेसकट सर्व यंत्रणा जनतेची जीवघेणी परीक्षाच घेत असल्याचा संतापजनक अनुभव यावेळेस आला! जेमतेम दोन फूट रुंद असलेल्या जागेतून प्रवाशांनी मार्ग कसा काढायचा याचे प्रात्यक्षिक मुंबईच्या दोन्ही पालकमंत्र्यांनी एकदोनदा करूनच दाखवावे असे माझे आव्हान आहे! एका पालकमत्र्यांना तर या दोन फुटाच्या रस्त्यावरून सरळ रेषेत चालताच येणार नाही, याबाबत मी बेट लावायला तयार आहे.

या अरुंद पायवाटेत खाचखळगे नसते तर आश्चर्य वाटले असते. तेही बरोबर घेऊन नोकरदार मंडळींना कामावर जावे लागत आहे. नवीन पुलाचे बांधकाम सुमारे तीन वर्षेतरी चालणारच. मग तीन वर्षे जनतेनेही हे हाल स्वीकारायचे का? शहर नियोजन करणाऱ्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांचे याबाबत काय मत आहे, हेही मुंबईकरांना कळायला हवे. नाही का? पूल पाडण्याआधी आम्हीच जनतेचे कैवारी असे दाखवणारे लोकप्रतिनिधी आता कुठे बरे ‘गायब’ झाले? पावसाळी पिकनिकला तर गेले नाहीत ना!

छायाचित्र मांडणीः प्रवीण वराडकर

1 COMMENT

  1. अगदी बरोबर! निगरगट्ट राजकारणी! आता निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर दाखवायला जागे होतील.

Comments are closed.

Continue reading

बेशिस्त ठाण्याला वेळीच आवरा!

गेले दोन-तीन दिवस जोरदार पाऊस पडत असताना काही कामानिमित्त ठाण्याच्या रेल्वेस्थानक परिसरात जायला लागले होते. वेळ अर्थात संध्याकाळची! टीएमटीने सॅटिसवर गेलो तोच जोरदार पाऊस सुरु झाला. सॅटिसवर संध्याकाळी तुफान गर्दी असतेच. त्यात पावसाने सॅटिस अगदी किचाट झाले होते. सॅटिसच्या...

.. म्हणून तर उत्तर प्रदेशातल्या झुंडी धावतात इतर राज्यांमध्ये!

"निचली जात है ससूरे.. तुम्हारी हिमंत कैसे हुई, बारात निकालनेकी.. ** मस्ती आवे क्या? चलो सथी, ये बारातीयोंकी जमके मारो.." हा डायलॉग काही कुठल्या वेबसिरीजमधला नाही. परंतु असं घडलंय मात्र नक्की!! तेही उत्तर प्रदेशमधील मथुरा (तेच ते अब मथुरा...

यंदाच्या पावसातही ठाण्यातल्या आनंदाश्रम परिसराची रडगाथा सुरूच!

पावसाळा सुरु झाला की ठाणे शहर व आसपासच्या भागातील विविध रस्त्याच्या कहाण्यांनी वर्तमानपत्रे भरून जात असतात. (तसे पाहिले तर इतर शहरांमध्येही अशीच रडकथा असते.) ठाणे महापालिकेतील सत्ताकेंद्राचे महत्त्वाचा बिंदू असलेल्या 'आनंदाश्रम' परिसरातील रस्त्यांचीही अशीच रडकथा आहे. वरवर पाहता रस्ता...
Skip to content