Homeमाय व्हॉईससायनला मुंबईच्या दोन्ही...

सायनला मुंबईच्या दोन्ही पालकमंत्र्यांनी चालून दाखवावेच!

“मुकी बिचारी कुणीही आणि ‘कशीही’ हाका…” मुंबईच्या शीव (सायन) येथील जुना पूल पाडून नवीन पुलाचे बांधकाम सुरु झाले आहे. हा पूल पाडण्याआधी जनतेला त्रास होईल, वाहतुकीचे काय होईल आदी अनेक प्रश्न घेऊन सर्वच राजकीय पक्षांनी एकच कल्ला केला होता, हे जनता अजून विसरलेली नाही. जनतेची काळजी आम्हालाच आहे, अशा आविर्भावात सर्व आंदोलने सुरु हॊती. अखेर सर्वसमंतीने पूल पाडून नवे बांधकाम सुरु करण्याबाबत एकमत झाले. मात्र, पूल पाडल्यानंतर शीव रेल्वेस्थानकात उतरणाऱ्या व येणाऱ्या प्रवाशांच्या हालाबाबत सर्वच राजकीय पक्षांनी ‘अर्थपूर्ण मौन’ स्वीकारल्याचे दिसत आहे.

काही कामानिमित्त दोन दिवस शीव येथे जावे लागले. पूर्वेकडे जाताना कसरत करावी लागत आहे. नवीन पूल होणार आहे म्हणून जनता हेही सहन करत आहे. परंतु या महानगरातील रेल्वेसकट सर्व यंत्रणा जनतेची जीवघेणी परीक्षाच घेत असल्याचा संतापजनक अनुभव यावेळेस आला! जेमतेम दोन फूट रुंद असलेल्या जागेतून प्रवाशांनी मार्ग कसा काढायचा याचे प्रात्यक्षिक मुंबईच्या दोन्ही पालकमंत्र्यांनी एकदोनदा करूनच दाखवावे असे माझे आव्हान आहे! एका पालकमत्र्यांना तर या दोन फुटाच्या रस्त्यावरून सरळ रेषेत चालताच येणार नाही, याबाबत मी बेट लावायला तयार आहे.

या अरुंद पायवाटेत खाचखळगे नसते तर आश्चर्य वाटले असते. तेही बरोबर घेऊन नोकरदार मंडळींना कामावर जावे लागत आहे. नवीन पुलाचे बांधकाम सुमारे तीन वर्षेतरी चालणारच. मग तीन वर्षे जनतेनेही हे हाल स्वीकारायचे का? शहर नियोजन करणाऱ्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांचे याबाबत काय मत आहे, हेही मुंबईकरांना कळायला हवे. नाही का? पूल पाडण्याआधी आम्हीच जनतेचे कैवारी असे दाखवणारे लोकप्रतिनिधी आता कुठे बरे ‘गायब’ झाले? पावसाळी पिकनिकला तर गेले नाहीत ना!

छायाचित्र मांडणीः प्रवीण वराडकर

1 COMMENT

  1. अगदी बरोबर! निगरगट्ट राजकारणी! आता निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर दाखवायला जागे होतील.

Comments are closed.

Continue reading

मालकांचा देव!

"मालकांचा देव। मालकांना पावे.. आम्ही फक्त व्हावे। अन्नभक्त.. पोटाच्या हातात। आत्म्याचा पतंग.. स्वप्नांचे हे रंग। शेपटाला.." या कविवर्य विंदा कारंदीकर यांच्या ५० वर्षापूर्वीच्या (कदाचित जास्तच) ओळी आठवायचं कारण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना केलेले काटकसरीचे आवाहन! काटकसर करा आणि महागड्या वस्तूंचा मोह टाळा, या पंतप्रधानांच्या आवाहनाला...

येथे प्रत्येक छायाचित्र बोलते…

"For me the subject of the picture is always important than the picture" हा सुविचार दिवंगत छायाचित्रकार रजनीश काकडे यांनी काढलेल्या छायाचित्र प्रदर्शनात प्रकर्षाने जाणवत होता. रजनीशला आदरांजली वाहण्यासाठी मुंबई प्रेस क्लबने त्याच्या छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित केले आहे. या...

‘एशियाटीक’ची निवडणूक जूनमध्ये तरी होणार? दोन्ही बाजूंच्या सदस्यांत घुसखोर!

मुंबईतल्या एशियाटीक लायब्ररी, या प्रतिष्ठित संस्थेची निवडणूक 'घुसखोर' सदस्यांशिवाय जून महिन्यात घेण्यात यावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला असला तरी ती जूनमध्येच होईल की नाही, याबाबत अनेकांच्या मनात शंका आहेत. कारण नव्याने निवडल्या जाणाऱ्या कार्यकारिणीची मुदत केवळ सप्टेंबर...
Skip to content