Homeपब्लिक फिगरछगन भुजबळ, वडेट्टीवारकडून...

छगन भुजबळ, वडेट्टीवारकडून ओबीसींचे वाटोळे?

लोणावळ्याच्या चिंतन बैठकीत सर्वपक्षीय नेत्यांनी ओबीसीसाठी आरक्षण पुनर्स्थापित करण्याचा ठराव घेण्यात आला. परंतु ओबीसी मंत्री छगन भुजबळ आणि विजय वडेट्टीवार यांचा निर्णय चुकीच्या दिशेने जात आहे. ओबीसी समाजाचे वाटोळे होईल असेच निर्णय या चिंतन शिबिरामध्ये घेण्यात आले, असा दावा ओबीसी नेते, माजी खासदार हरीभाऊ राठोड यांनी केला आहे.

या राजकीय चिंतन शिबिरामध्ये राज्य मागासवर्गीय आयोगाचे तीन सदस्य हजर होते, हे निंदनीय आहे. कारण या चिंतन बैठकीत मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नये, असा ठराव मंजूर करण्यात आला . आपल्या देशात एस. सी./एस. टी. आणि ओबीसी असे तीनच प्रवर्ग आहेत. असे असताना मराठा समाजाला कुठून आरक्षण देणार? असा प्रश्न उपस्थित होतो. एकीकडे छगन भुजबळ मराठा समाजाच्या आरक्षणास आमचा विरोध नाही, असे म्हणतात आणि दुसरीकडे अप्रत्यक्षरित्या विरोध करीत आहे हेच सिद्ध होते, असेही राठोड म्हणाले.

प्राध्यापक आणि सहप्राध्यापक यांच्याकरिता केंद्र सरकारने रोष्टरच्या बाबतीत कायदा केला असून तो एकल पदांना न लावता तो संवर्गनिहाय लावण्याचा कायदा राज्यात मंजूर करावा, अन्यथा १०० वर्षे ओबीसी आणि भटके-विमुक्त यांचे बिंदू नामावली येणार नाही. राज्यात ३०६४ प्राध्यापकांची भरती होणार असल्याचे असे राज्याचे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी जाहीर केले आहे, परंतु जोपर्यंत रोष्टर पुनर्स्थापित होत नाही, तोपर्यंत भरती करण्यात येऊ नये.

सोमवारी, २८ जूनला राज्य सरकारने सर्वोच्य न्यायालयात याचिका दाखल केली असून केंद्राकडून २०११च्या जनगणनेचा एम्पॅरिकल डाटा मागणे चुकीचे आहे. राज्य सरकारने आपल्याला मिळालेला अधिकार न वापरता केंद्राकडे हा विषय ढकलणे ही अक्षम्य चूक आहे, असे ते म्हणाले.

छगन भुजबळ

ओबीसींच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षणाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा ठराव लोणावळा येथील शिबिरात घेण्यात आला, याचा अर्थ असा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल ओबीसींच्या बाजूने असताना आणि एम्पिरिकल डाटा गोळा करण्याचा अधिकार राज्य सरकारला मिळाला असताना केंद्राकडे बोट दाखवणे चुकीचे असून ओबीसी आणि भटके विमुक्त समाजाचा बुद्धिभेद करण्याचा हा डाव आहे, असेही ते म्हणाले.

केंद्र सरकारकडे असा कुठलाही डाटा उपलब्ध नाही. असे असताना केंद्राकडे डाटा मागणे ही अक्षम्य चूक आहे. याचा अर्थ ओबीसीचेच नेते ओबीसी आणि भटक्या विमुक्तांची जनगणना करण्याचे टाळत आहेत. या चिंतन शिबिरामध्ये थोर विचारवंत हरी नरके यांनी समाजाचा बुद्धिभेद तर केलाच, परंतु सरकारलाही चुकीची माहिती ते देत आहेत. त्यांचा बोलावता धनी कोणीतरी दुसराच आहे, हे सिद्ध होत आहे, असेही हरीभाऊ राठोड यांनी सांगितले.

Continue reading

हा तर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाच्या विश्वासार्हतेवरच आघात!

शिवसेनेतल्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांचे आज उफाळून आलेले कथित बंड हे केवळ खासदारांचे बंड नाही, तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाच्या विश्वासार्हतेवर झालेला दुसरा मोठा आघात आहे. २०२२मध्ये आमदारांनी दिलेला धक्का आणि आता २०२६मध्ये पुन्हा एकदा खासदारांनी फिरवलेली पाठ, या...

८ जूनपासून पाऊस कोकणातच!

देशातील मान्सूनची सध्याची परिस्थिती अत्यंत चिंताजनक बनली असल्याचे, खासगी हवामान एजन्सी स्कायमेटचे संचालक जी. पी. शर्मा यांनी म्हटले आहे. मुळातच यंदा मान्सूनचे आगमन उशिराने झाले असून, सुरुवातीचे काही दिवस प्रगती केल्यानंतर गेल्या एका आठवड्यापासून तो पूर्णपणे थबकला आहे. ८...

आता फक्त २०० रुपयात करा कुटुंबातच होणाऱ्या वाटणीची मोजणी!

राज्यशासनाने सर्वसामान्यांना मोठा दिलासा देत जमीन मोजणीच्या शुल्क आणि प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केलेल्या नव्या निर्णयानुसार, आता कुटुंबातच होणाऱ्या संमतीच्या किंवा कोर्टाच्या वाटणीची मोजणी अवघ्या २०० रुपये प्रति पोटहिस्सा या नाममात्र शुल्कात केली...
Skip to content