Homeटॉप स्टोरीAIमुळे साखरेच्या उताऱ्यात...

AIमुळे साखरेच्या उताऱ्यात 20% तर ऊस उत्पादनात 30% वाढ!

AI तंत्रज्ञानामुळे ऊस उत्पादनात 30% वाढ आणि साखरेच्या उताऱ्यात 20% वाढ यशस्वीपणे साधता आली आहे. शिवाय, पीकवाढीचा कालावधी 6 महिने कमी झाला आहे. बारामती कृषी विज्ञान केंद्र आणि ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या प्रक्षेत्रावर हा AI आधारित ऊस शेतीचा प्रयोग करण्यात आला. बारामतीचा सोमेश्वर सहकारी साखर कारखाना, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI) आणि मायक्रोसॉफ्ट ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या सहकार्याने हा प्रकल्प राबवण्यात आला.

AI आणि सॅटेलाइट इमेजिंगच्या मदतीने पिकांची वाढ, पाण्याची गरज, रोग, हवामान याचा अचूक अंदाज घेतला जातो. त्यामुळे पाणी वापर 50%ने कमी होतो. प्रति एकर उत्पादन 73 टनांवरून 150 टनांपर्यंत वाढू शकते आणि साखरेचा उतारा 10%पेक्षा जास्त मिळतो. यामुळे शेतकऱ्यांचा नफा आणि साखर कारखान्यांचा कार्यकालही वाढतो.

AI परिणामकारकता कशी मोजली गेली?

तुलनात्मक प्रयोग: दोन वेगवेगळ्या प्लॉट्सवर – एकावर पारंपरिक पद्धतीने आणि दुसऱ्यावर AI तंत्रज्ञान वापरून ऊसाची लागवड केली गेली.

ऊस

मोजमापाचे निकष: प्रति एकर उत्पादन (टनमध्ये)

  – साखरेचा उतारा (सुक्रोज कंटेंट)

  – पाण्याचा वापर

  – खत आणि कीटकनाशकांचा वापर

  – खर्च आणि नफा

  – पीकवाढीचा कालावधी (महिन्यांत)

डेटा संकलन: IoT सेन्सर्स, सॅटेलाइट इमेजिंग, हवामान केंद्र, जमिनीचे परीक्षण, आणि मोबाइल ॲपद्वारे रिअल-टाइम डेटा गोळा केला गेला.

प्रमुख वाण: CO 86032, CO M 265, MS 10001, PDN 15012, CO VSI 8005, CO VSI 18121. यापैकी CO M 265 वाणाने 150.10 टन प्रति एकर, PDN 15012 ने 120.40 टन/एकर, CO VSI 8005 ने 104.78 टन/एकर उत्पादन दिले.

शेतकऱ्यांचा सहभाग: पहिल्या टप्प्यात 1,000 शेतकरी सहभागी; पुढील टप्प्यात 50,000 शेतकऱ्यांपर्यंत विस्तार.

सेंद्रिय कर्ब: AI तंत्रज्ञानामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब 1.0% राखला गेला, पारंपरिक शेतीत तो 0.68% होता.

या प्रयोगातील पूरक डेटा आणि तुलनात्मक निकाल हे महाराष्ट्रातील इतर साखर कारखान्यांसाठी मार्गदर्शक ठरत आहेत.

Continue reading

४ दिवसांत आज पुन्हा पेट्रोल व डिझेल महागले!

देशात गेल्या चार दिवसांत आज पुन्हा पेट्रोल आणि डिझेल महागले. पेट्रोलच्या किंमतीत ८७ पैसे प्रति लीटर तर डिझेसच्या किंमतीत ९१ पैसे प्रति लीटर वाढ करण्यात आली आहे. आज, मंगळवारी मध्यरात्रीपासून ही दरवाढ अंमलात आली आहे. तीन दिवसांपूर्वी १६ मे...

अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांसाठी २० मेपासून प्रवेश

दहावीनंतरच्या प्रथम वर्ष अभियांत्रिकी व तंत्रज्ञान तसेच वास्तुकला पदविका (पॉलिटेक्निक) अभ्यासक्रमांच्या शैक्षणिक वर्ष २०२६-२७साठी येत्या २० मेपासून प्रवेशप्रक्रिया सुरू होत आहे. ही प्रवेशप्रक्रिया वेळेत राबविण्यासाठी कालबद्ध नियोजन करण्याचे निर्देश राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. विद्यार्थ्यांना...

आधार समुदाय पोहोच शिबिरांचे यशस्वी आयोजन

भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI)अंतर्गत आधार सेवा केंद्र (ASK), वाशी यांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोग (NHRC) आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS) यांच्या सहकार्याने १० आणि ११ मे २०२६ रोजी नवी मुंबईतल्या महापे आणि सीबीडी बेलापूर येथे विशेष आधार...
Skip to content