HomeArchiveकॅटरिंग ब्रँड फीस्टलीचा...

कॅटरिंग ब्रँड फीस्टलीचा मुंबईत प्रवेश!

Details
  

 
केएचएल न्यूज ब्युरो
 
hegdekiran17@gmail.com
 
“भारतातील अग्रेसर फूड टेक कंपनी फीडिंगबिलियन्स बी२बी कॉन्ट्रॅक्ट कॅटरिंग ब्रँड फीस्टलीद्वारे देशातील कर्मचाऱ्यांना आरोग्यदायी जेवणाचा पर्याय प्रदान करीत आहे. फीस्टलीने आपली पोहोच आणखी विस्तारत आता मुंबई शहरात प्रवेश केला आहे. हा ब्रँड सध्या दिल्ली-एनसीआर आणि नव्याने समाविष्ट झालेल्या मुंबईसह उत्तर प्रदेश, हरियाणा, गुजरात आणि राजस्थानसह सहा मजबूत ठिकाणी सेवा देत आहे. फीस्टली मुंबईत नेल्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडसोबत काम करणार असून येत्या काही महिन्यात मुंबईतील मोठ्या औद्योगिक कँटीन किंवा मेस मॅनेजमेंट प्लॅटफॉर्ममध्ये स्मार्ट मिल सोल्युशन देण्याचे फीस्टलीचे उद्दिष्ट आहे.”
 
“२०१७मध्ये स्थापन झालेली फीस्टली फॉर्च्युन ५०० कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी आरोग्यदायी जेवणाचा पर्याय दररोज प्रदान करीत असून कंपनीने आतापर्यंत ३ दशलक्षहून अधिक कर्मचाऱ्यांना जेवण पुरवले आहे. २०२२पर्यंत मुंबईत दरवर्षी १ दशलक्षपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना जेवण पुरवण्याचे फीस्टलीचे लक्ष्य आहे. कंपनीने सेवा दिलेल्या काही ग्राहकांमध्ये सॅमसंग, पेटीएम, एचसीएल, युबीईआर, एअरटेल, नोकिया, आयडिया, हॅवेल्स आणि आयआरसीटीसीचा समावेश आहे.”
 
“फीस्टली बाय फीडिंगबिलियन्सचे संस्थापक आणि सीईओ सार्थक गहलोत म्हणाले की, कार्यस्थळी कर्मचाऱ्यांच्या जेवणाचा अनुभव नव्याने मांडण्यासाठी वचनबद्ध असल्याने फीडिंग बिलियन्सची वृद्धी होत आहे. आतापर्यंतचा प्रवास लाभकारक ठरला असून देशातील विविध ग्राहकांशी जोडले गेल्याने कंपनीला बाजारपेठेचाही मोठा आधार मिळाला, हे सांगताना आम्हाला आनंद होत आहे. मुंबईत आमच्या सर्व पाहुण्यांना उत्कृष्ट अनुभव प्रदान करण्यावर भर देऊन कॉन्ट्रॅक्ट केटरिंग कॅप्चर करणे तसेच आरोग्यदायी मेनू प्रदान करणे हे आमचे उद्दिष्ट आहे.”

Continue reading

नासाची ऐतिहासिक भरारी: चंद्राजवळून घेतले पृथ्वीचे विलोभनीय दर्शन!

नासाच्या 'आर्टेमिस २' मोहिमेने अंतराळ संशोधनाच्या इतिहासात एक नवा अध्याय लिहिला आहे. या मोहिमेतील अंतराळवीरांनी चंद्राच्या अतिशय जवळून पृथ्वीचे जे फोटो पाठवले आहेत, ते पाहून संपूर्ण जग थक्क झाले आहे. अथांग काळोखात तरंगणाऱ्या आपल्या निळ्याशार पृथ्वीचे हे फोटो इतके...

भारताचा राष्ट्रीय समुद्री दिवस! समुद्री स्वातंत्र्याची धाडसी कहाणी!!

आज ५ एप्रिल २०२६. ५ एप्रिल १९१९... मुंबई बंदरात रात्रीचा अंधार, वादळी वारे आणि उंच लाटांचा गर्जना! ब्रिटिश साम्राज्य समुद्रावर पूर्णपणे राज करत होतं. भारतीयांना जहाज चालवण्याचीसुद्धा परवानगी नव्हती. एक चूक आणि सगळं संपलं! पण, त्या रात्री एक छोटंसं...

तुमचा कॅमेरा बंद तर नाही ना?

एक एप्रिल २०२६पासून भारतात लागू झालेल्या नव्या सीसीटीव्ही नियमांमुळे नागरिकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला. “घरातील कॅमेरा बंद पडणार का?” असा प्रश्न अनेकांकडून विचारला. मात्र, केंद्र सरकारच्या नव्या धोरणानुसार, आधीपासून वापरात असलेल्या कॅमेर्‍यांवर कोणताही परिणाम होणार नसून, हा निर्णय मुख्यतः...
Skip to content