Homeमुंबई स्पेशलमंगळवार-बुधवारी अंधेरी ते...

मंगळवार-बुधवारी अंधेरी ते वांद्रे भागात विस्कळीत पाणीपुरवठा

मुंबई महापालिकेकडून जलवाहिनी अंशतः खंडित करण्याचे काम हाती घेण्यात येत असल्यामुळे मंगळवार, ११ ऑगस्‍टला सकाळी १० वाजल्यापासून बुधवार, १२ ऑगस्‍टला सकाळी १० वाजेपर्यंत के दक्षिण विभागात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असून एच पूर्व विभागाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

कमी दाबाने पाणी पुरवठा होणारा परिसर-

के दक्षिण विभाग:

मंगळवार, ११ ऑगस्ट- कबीर नगर, बामणवाडा, पारसीवाडा, विमानतळ क्षेत्र, तरुण भारत वसाहत, इस्लामपुरा, देऊळवाडी, मासळी बाजार (फिश मार्केट), घाटीवाडा, चकाला, पी ऍन्ड टी वसाहत (दुपारी २ ते सायंकाळी ५.३० या वेळेत कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.)

कोलडोंगरी, ओल्ड पोलीस लेन, विजय नगर (सहार रोड), मोगरापाडा (सायंकाळी ५ ते रात्री १० या वेळेत कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.)

बुधवार, १२ ऑगस्ट- सहार गाव, सुतार पाखडी, कार्गो संकुल (सकाळी ५ ते ८ या वेळेत कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.) 

पाणीपुरवठा बंद रहाणारा परिसर-

एच पूर्व विभाग: मंगळवार, ११ ऑगस्ट ते बुधवार १२ ऑगस्ट- देशांतर्गत विमानतळ, हँगर कर्मचारी वसाहत, एअर इंडिया वसाहत, सांताक्रूझ (पूर्व), वांद्रे रेल्वे टर्मिनस, वांद्रे – कुर्ला संकुल वांद्रे (पूर्व ) येथे पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील.

बुधवार, १२ ऑगस्ट रोजी संपूर्ण एच पूर्व विभाग, सांताक्रूझ (पूर्व), खार (पूर्व), वांद्रे (पूर्व) भागाचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील.

संबंधित परिसरातील नागरिकांनी पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा तसेच पाणी काटकसरीने वापरुन सहकार्य करावे. खबरदारीचा उपाय म्हणून पुढील काही दिवस पाणी गाळून व उकळून प्यावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

फेसबुक, इन्स्टाग्रामला ५,४०० कोटींचा दंड

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा लहान मुलांवर आणि त्यांच्या मानसिक आरोग्यावर होणारा गंभीर परिणाम लक्षात घेता, अमेरिकन न्यायालयाने 'मेटा' (फेसबुक आणि इन्स्टाग्रामची मूळ कंपनी) ला मोठा दणका दिला आहे. मुलांच्या सुरक्षेशी तडजोड केल्याप्रकरणी, त्यांच्या मानसिक आरोग्याला हानी पोहोचवल्याप्रकरणी आणि गोपनीयतेच्या उल्लंघनाबाबत...

सोशल मीडियावरचे १८ वर्षांखालील युझर्स ‘बालक’!

लहान मुले आणि तरुणांवर सोशल मीडिया तसेच ऑनलाइन गेमिंगच्या वाढत्या दुष्परिणामांना आळा घालण्यासाठी संसदेत एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. भाजपचे खासदार बैजयंत पांडा यांनी संसदेत ‘शिल्ड’ नावाचे एक खासगी विधेयक मांडण्याची नोटीस दिली आहे. या प्रस्तावित विधेयकानुसार, १३...

देशातल्या नागरी सहकारी बँकांचे मुख्यालय दिल्लीहून मुंबईत!

देशातील नागरी सहकारी बँकिंग क्षेत्राला अधिक बळकट करण्यासाठी स्थापन झालेल्या ‘नॅशनल अर्बन कोऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड’ (एनयूसीएफडीसी) या सर्वोच्च संस्थेचे मुख्यालय नवी दिल्लीहून मुंबईत हलवण्यात आले आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी शनिवारी या...
Skip to content