Homeपब्लिक फिगरनिसर्ग वाचवण्यासाठी अनेक...

निसर्ग वाचवण्यासाठी अनेक हातांची गरज!

देवराई म्हणजे देवाच्या नावाने राखून ठेवलेल्या जंगलाचाही विपर्यास होत आहे. झाडे, नद्या आणि निसर्ग वाचवण्यासाठी अनेक हातांची गरज आहे, असे मत प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी निसर्ग अभ्यासक श्रीरंग फडके लिखित ‘रानसावल्या’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात व्यक्त केले. निसर्ग आणि पर्यावरणाचा समतोल राखणं कसं आवश्यक आहे हे सांगताना त्यांनी सह्याद्री देवराई, या त्यांच्या संस्थेमार्फत होत असलेल्या वृक्षारोपणाच्या कार्याची माहिती दिली.

निसर्ग

श्रीरंग फडके लिखित ‘रानसावल्या’ या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ मुंबईतल्या गोरेगाव येथील नंदादीप शाळेच्या कलाघर येथे नुकताच संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानच्या सहाय्यक आयुक्त डॉ. विनया जंगले उपस्थित होत्या. प्रमुख वक्ते म्हणून पर्यावरणप्रेमी प्रा. राजेंद्र केरकरही यावेळी उपस्थित होते.

डॉ. विनया जंगले यांनी वन्यजीवांच्या विश्वातील अनुभव कथन करताना पुस्तकातील संवेदनशीलतेचे कौतुक केले. विशेष म्हणजे यात लेखकाने निसर्ग आणि व्यक्ती यांचा सुरेख संगम साधला आहे, असे त्यांनी नमूद केले. शब्दांच्या रानसावल्या, केवळ कागदावरील नोंदी नसून तो निसर्गाशी साधलेला एक जिवंत संवाद आहे, अशा शब्दांत प्रा. राजेंद्र केरकर यांनी लेखकाचा गौरव केला. मराठी भाषेतल्या निसर्ग साहित्यात आजवर अनेक मातब्बर लेखकांनी आपापले अनुभव मांडले आहेत. त्यांचा वारसा लिखित स्वरुपात पुढे चालू राहवा. यात आपलंही छोटे योगदान असावं म्हणून हे निसर्ग अनुभवांचे लिखाण वाचकांसमोर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे, असे मनोगत लेखकाने व्यक्त केले. हे पुस्तक ब्रॉडवे बुक पब्लिशिंग हाऊस, गोवा यांनी छापून प्रसिद्ध केले असून त्याची किंमत ४०० रूपये आहे.

Continue reading

फेसबुक, इन्स्टाग्रामला ५,४०० कोटींचा दंड

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा लहान मुलांवर आणि त्यांच्या मानसिक आरोग्यावर होणारा गंभीर परिणाम लक्षात घेता, अमेरिकन न्यायालयाने 'मेटा' (फेसबुक आणि इन्स्टाग्रामची मूळ कंपनी) ला मोठा दणका दिला आहे. मुलांच्या सुरक्षेशी तडजोड केल्याप्रकरणी, त्यांच्या मानसिक आरोग्याला हानी पोहोचवल्याप्रकरणी आणि गोपनीयतेच्या उल्लंघनाबाबत...

सोशल मीडियावरचे १८ वर्षांखालील युझर्स ‘बालक’!

लहान मुले आणि तरुणांवर सोशल मीडिया तसेच ऑनलाइन गेमिंगच्या वाढत्या दुष्परिणामांना आळा घालण्यासाठी संसदेत एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. भाजपचे खासदार बैजयंत पांडा यांनी संसदेत ‘शिल्ड’ नावाचे एक खासगी विधेयक मांडण्याची नोटीस दिली आहे. या प्रस्तावित विधेयकानुसार, १३...

देशातल्या नागरी सहकारी बँकांचे मुख्यालय दिल्लीहून मुंबईत!

देशातील नागरी सहकारी बँकिंग क्षेत्राला अधिक बळकट करण्यासाठी स्थापन झालेल्या ‘नॅशनल अर्बन कोऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड’ (एनयूसीएफडीसी) या सर्वोच्च संस्थेचे मुख्यालय नवी दिल्लीहून मुंबईत हलवण्यात आले आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी शनिवारी या...
Skip to content