Homeन्यूज अँड व्ह्यूजशिजवलेल्या अन्नाच्या दरात...

शिजवलेल्या अन्नाच्या दरात गेल्या 5 वर्षांत 71 टक्क्यांनी वाढ

राज्यातील प्रत्येक घरात शिजवण्यात येणाऱ्या अन्नाची दरवाढ गेल्या पाच वर्षांत सुमारे 71 टक्क्यांनी वाढ झालेली असून त्याच्या तुलनेत पगारात मात्र केवळ केवळ 37 टक्के इतकी कमी वाढ झाल्याने सर्वसामामान्य नागरिक हैराण झाले आहेत.

या शिजवलेल्या अन्नात केवळ दोन वेळचे जेवण धरलेले आहे. सकाळचा चहानाश्ता, दुपारचा चहाबिस्किटे व संध्याकाळचा चहापाणी यांचा अंतर्भाव नाही. त्याचा खर्च समाविष्ट केल्यास ही टक्केवारी

80 टक्क्यांच्या घरात नक्कीच जाईल. सध्याचे सरकार आणि लोकसभा निवडणूक लढवणाऱ्या सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी या मूळ मुद्द्याकडे लक्ष देऊन काही करण्याचे आश्वासन देण्याची खरेतर कधी नव्हे इतकी गरज आहे. राजकीय जुमलेबाजी काय केव्हाही केली जाऊ शकते.

यात बेरीजगारीचा उल्लेख नाही, नवीन घरे केवळ कागदावरच आहेत व त्यांनी कोटीच्या कोटी उड्डाणे केव्हाच पार केलेली आहेत. त्याहीपेक्षा चिंतेची बाब म्हणजे गेल्या 20/25 वर्षांत अनेक कारखाने, गिरण्या बंद पडलेल्या आहेत. तेथे नवीन उद्योग आलेले आहेत. मात्र तेथील हजारो जुन्या कामगारांना कोट्यवधी रुपयांची थकीत देणी अद्यापी मिळालेली नाहीत. काहींनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावलेले आहेत. परंतु तब्बल 20 वर्षांनीही न्यायाल्यालाही काही ‘पाझर’ फुटलेला नाही. तरीही सर्व न्यायाधीश व राजकीय नेते मात्र जोरशोरशे सांगत असतात “न्यायालयालाही मानवी चेहरा” असावा! हा चेहरा कुठे बरे मिळेल?

(आकडेवारी संदर्भ दि हिंदू यांच्या सौजन्याने)

Continue reading

ठाणे शहरातल्या वाहतूककोंडीचे बिल पोलिसांच्या वाहतूक शाखेवर!

ठाणे शहराच्या कोपरी उड्डाणपुलावर क्रेन कोसळणे, माजिवडा चौकात रस्ता खचणे, घोडबंदर रोडवरील खोळम्बलेली सेवारस्त्यांची कामे, तसेच शहरभर या ना त्या कारणाने खोदून ठेवलेल्या अनेक रस्त्यांमुळे प्रचंड वाहतूककोंडी होत असताना त्याचे बिल पोलिसांच्या वाहतूक शाखेवर फाडले जात असल्याने वाहतूक पोलिसात...

मदिरा व मदिराक्षी! पोलीस अधिकाऱ्यांचे डोंबिवलीच्या वेशीवर ‘मै टल्ली हो गयी..’

डोंबिवलीनजिकच्या शीळ फाट्यावरून डोंबिवलीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पडले नावाचे सुंदर गाव आहे. गावात अजून बऱ्यापैकी निसर्ग शाबूत आहे. उंच इमारती आहेत. पण उंची गगनाला वेसण घालण्याइतपत नाही, ही जमेची बाजू! हे पडले गाव सुरु होताच मुक्ता नामक विकासकाची ओळख व्हायला...

नव्या महापालिका आयुक्तांचे स्वागत करताना…

मुंबईच्या पहिल्या महिला महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांचे मुंबईकरांच्या वतीने स्वागत करताना त्यांना मुंबईतल्या गिरगावातल्या 'हौदा'कडे बोट दाखवण्याची इच्छा नव्हती. परंतु त्या मुंबईच्या मेट्रो प्रकल्पाच्या प्रमुख होत्या. आजही तो अतिरिक्त कार्यभार त्यांच्याकडेच आहे, त्यामुळे हीच संधी घेतली म्हणाना. मुंबई...
Skip to content