Homeमाय व्हॉईसअवर्सेकरांना 2 हजार...

अवर्सेकरांना 2 हजार कोटींची लॉटरी तर भुजबळ बंधूंना नाममात्र दक्षिणा!

तुम्हाला नक्कीच आठवत असेल की सुमारे पाच-दहा वर्षांपूर्वी प्रत्येक इंग्रजी वर्तमानपत्रामध्ये शनिवार, रविवारी गीतांजली जेम्सच्या भल्या मोठ्या जाहिराती गुळगुळीत पानांवर, सुंदर ललानांसह आपल्यावर भुरळ टाकण्यासाठी भेटीला येत असत. परंतु आता मिळालेल्या माहितीनुसार, ही भुरळ गीतांजलीला बँका आणि केंद्र सरकारवर टाकायची होती. ही भुरळ टाकण्यात ती कमालीची यशस्वी झाल्याचे दिसत आहे. लाखो रुपयांची रत्ने विकून ‘गीतांजली’ने बँकाना 8 हजार कोटींचा चुना लावला! भुरळ पाडल्याशिवाय का त्यांचे इतक्या हजार कोटींचे कर्ज माफ झाले? तुम्ही-आम्ही कर्ज परतफेडीचा एखादा हफ्ता इकडेतिकडे करून द्या अशी विनवणी केली की आपल्याला कसे हाडतूड करतात आणि या कर्जबुडव्यांना कसे लाल कार्पेट अंथरतात, हेच या कर्जबुडव्य्यांच्या यादीवरून एक नजर फिरवली तरी कळून चुकते. अवर्सेकरांच्या युनिटीच्या कर्जमाफीची रक्कम सुमारे दोन हजार कोटी रुपये इतकी आहे. भुजबळ बंधू यांना केवळ सुमारे 10 कोटींची दक्षिणा मिळालेली दिसते.

या कर्जमाफीच्या यादीत अनेक डायमंड कंपन्या आहेत. तसेच इस्पातच्या अनेक कंपन्या आहेत. त्यांची एकत्रित कर्जमाफीची रक्कम हजार कोटींच्या घरात सहज जाईल. अवर्सेकरांच्या युनिटीच्या कर्जमाफीची रक्कम सुमारे दोन हजार कोटी रुपये इतकी आहे. शिवसेना-भाजप युतीच्या पहिल्या राजवटीत युनिटी भलतीच फॉर्मात होती, हे तुम्ही सर्व जाणताच! मनसेप्रमुख राज ठाकरे यांनीही एकदा आपल्या भाषणात ‘युतीच्या राज्यात एकाच मराठी माणसाचे भले झाले आणि तो माणूस म्हणजे अवर्सेकर!’ असे खोचक विधान केले होते. पुण्याची वादग्रस्त शिक्षण संस्था ‘सिंहगड तंत्रशिक्षण संस्था’ यांनीही या कर्जबुडव्यांच्या यादीत स्थान मिळवलेले आहे (सुमारे 200 कोटी फक्त).

कोणी फडणवीस प्रॉपर्टीस लिमिटेड ही कंपनीही या यादीत दिसत आहे (सुमारे 100 कोटी). हे फडणवीस कोण याची चौकशी केली असता नागपूरकर मंडळींनी चक्क कानावर हात ठेवले. दीनदयाळ मेडिकल ट्रस्टचाही यात समावेश आहे (सुमारे 90 कोटी). फिटनेसचे धडे देणारे तळवलकरही यात अनफिट झाल्याने बसलेले दिसतात (सुमारे 70 कोटी). व्हिडीओकॉन कर्जप्रकरणी प्रसिद्धीस आलेली कोचर यांची कंपनीही या गर्दीत कोचर ओव्हरसीस, या नावाने अंग चोरून बसलेली दिसते (सुमारे 25 कोटी). भुजबळ बंधू यांना केवळ सुमारे 10 कोटींची दक्षिणा मिळालेली दिसते. भुजबळ बंधूंच्या बांधकाम कंपनीसही अवघे 5 कोटी माफ केलेले दिसत आहेत. माध्यम क्षेत्रातील नवभारत व डेक्कन क्रॉनिकल या कंपन्यानीही यादीत स्थान मिळवले आहे. निंबस आणि थर्ड आय, याही येथे आहेत.

राजकीय पक्षांच्या देणगीयाद्याही तपासा

या कर्जबुडव्यांच्या यादीत अनेक डायमंड कंपन्या आहेत. खनिज कंपन्या तर डझनावारी आहेत. बांधकाम व्यावसायिक कंपन्याही काही कमी नाहीत. या यादीबरोबरच कर्ज वसुलीसाठी बँकानी काय काय प्रयत्न केले आणि त्याला कसा प्रतिसाद मिळाला याचेही विवरण मिळाले पाहिजे. या घेतलेल्या कर्जामुळेच त्यांना उर्जीतावस्था मिळालेली असल्याने त्यांची वैयक्तिक संपत्तीही जप्त होणे गरजेचे आहे. कारण हेच कर्जबुडवे अजूनही पंचतारंकित लाईफस्टाईल जगणे जगत आहेत. आणखी एक महत्वाचा मुद्दा… या कर्जबुडव्या कंपन्याची नावे जशी जाहीर करण्यात आली आहेत तशीच त्यांच्या मालकांची, संचालकांची नावेही जनतेला कळायला हवीत. मग पेटारा बाहेर पडेल, कोणी किती कोटी रुपयांच्या देणग्या कोणत्या रजकीय पक्षांना दिल्या आहेत की कोणी आणखी निवडणूक रोखे खरेदी केलेले आहेत. हेही देशाला समजले पाहिजे…

“लाटा तहान भुकेच्या भळाभळा, सुकलेल्या ओठांवर

आणि थंडपणे कत्तल चालू आहे

माणसांची अक्कल हुशारीने

त्याचा दुर्गंध पसरला आहे असीम!!

असाच चालू राहिला अखंड अध:पात-अपघात-विश्वासघात

तर थांबावे कशाला समुद्राने वाळूच्या बांधावर?

रक्त इतके स्वस्त व्हावे का की इथून तिथून वाहावे” (शांताराम)

….

Continue reading

एक संध्याकाळ ‘बर्वे संचित’च्या सानिध्यात!

ही संध्याकाळ कधीच विसरता येणारी नाही. (संध्याकाळ हा शब्द वाचला की काही रोमँटिक असं वाटेल, पण असं अजिबात नाही. पण, एका वेगळ्या अर्थाचा 'रोमान्स' जरूर आहे.) गर्दीच्या ठिकाणचे आपले रवींद्र नाट्यमंदिर संध्याकाळी फक्त गर्दीच नव्हे तर वाहतुकीच्या प्रचंड कोंडीसाठीही...

ठाणे शहरातल्या वाहतूककोंडीचे बिल पोलिसांच्या वाहतूक शाखेवर!

ठाणे शहराच्या कोपरी उड्डाणपुलावर क्रेन कोसळणे, माजिवडा चौकात रस्ता खचणे, घोडबंदर रोडवरील खोळम्बलेली सेवारस्त्यांची कामे, तसेच शहरभर या ना त्या कारणाने खोदून ठेवलेल्या अनेक रस्त्यांमुळे प्रचंड वाहतूककोंडी होत असताना त्याचे बिल पोलिसांच्या वाहतूक शाखेवर फाडले जात असल्याने वाहतूक पोलिसात...

मदिरा व मदिराक्षी! पोलीस अधिकाऱ्यांचे डोंबिवलीच्या वेशीवर ‘मै टल्ली हो गयी..’

डोंबिवलीनजिकच्या शीळ फाट्यावरून डोंबिवलीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पडले नावाचे सुंदर गाव आहे. गावात अजून बऱ्यापैकी निसर्ग शाबूत आहे. उंच इमारती आहेत. पण उंची गगनाला वेसण घालण्याइतपत नाही, ही जमेची बाजू! हे पडले गाव सुरु होताच मुक्ता नामक विकासकाची ओळख व्हायला...
Skip to content