Homeटॉप स्टोरीअनिल परब यांच्या...

अनिल परब यांच्या म्हाडा प्रकरणात उपमुख्यमंत्र्यांचे लक्ष?

दापोलीच्या तथाकथित रिसॉर्ट प्रकरणातून शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते आमदार अनिल परब आता वांद्र्यातल्या अनधिकृत कार्यालयाच्या प्रकरणातूनही सहीसलामत बाहेर पडण्याच्या स्थितीत असल्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री स्वतः म्हाडाच्या प्रकरणात लक्ष घालणार असल्याचे कळते.

आधी दापोलीचे रिसॉर्ट आणि नंतर माजी मंत्री अनिल परब यांनी वांद्रे येथील राहत्या घराजवळ अनधिकृत बांधकाम केल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीचे नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. अनिल परब शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकवर्तीय असल्याने या दोन्ही आरोपांना काहीशी धार प्राप्त झाली होती. रिसॉर्टबाबत ते परब यांच्या मालकीचे नसल्याचे निष्पन्न झाल्याने तो आरोप फुस्स झाला तसेच नुकतेच म्हाडानेही वांद्रे येथील परब यांच्या घराजवळ असलेल्या कार्यालयाशी परब यांचा संबंध नसल्याचे स्पष्ट करून तसे लेखी पत्रही त्यांना दिले. त्या पत्राची प्रत सोबत जोडली आहे.

परब

असे असले तरी आज संध्याकाळी हाती आलेल्या माहितीनुसार या पत्रामुळे कोणी नाही परंतु उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संताप झाला असून त्यांनी एकदोन दिवसांत म्हाडाच्या संबंधित सर्व अधिकाऱ्यांना मंत्रालयात पाचारण केले असल्याचे समजते. म्हाडाने दिलेले हे पत्रच कशाच्या आधारे दिले गेले हे जाणून घेण्यासाठी आणि ते रद्दबादल करण्याकरीता काय करता येऊ शकते हे चाचपण्यासाठी म्हाडाच्या विधि सल्लागारांही मंत्रालयातील बैठकीला बोलावले जाईल. काल केंद्रीय अर्थसंकल्प मांडला जाणार असल्याने उपमुख्यमंत्री फडणवीस या प्रकरणात लक्ष घालू शकले नाहीत. मात्र आजपासून ते या प्रकरणाची खोलात जाऊन माहिती घेणार आहेत, असे कळते.

या सर्व प्रकरणाला आणखी एक कंगोरा आहे तो म्हणजे परब राहतात ती इमारत ठाकरे यांच्या मातोश्री, या निवासस्थानापासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर आहे. ठाकरे यांच्या बालेकिल्ल्यात त्यांच्या घराजवळील त्यांच्या कट्टर समर्थकाविरूद्ध आम्ही कशी कारवाई करतो ते पाहाच हे दाखवणेच यामागे असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. असे काही होत असल्याचा सुगावा लागेल तेव्हा मुलुंड येथील नीलम नगर परिसरातही हजारोंनी जमण्याचे निरोप शिवसैनिकांना गेल्याचे समजते.

Continue reading

गणरायही गुदमरले रेल्वेस्थानक परिसरातल्या या प्रचंड गर्दीने!

सरकारी व रेल्वे खात्याच्या आकडेवारीच्या आधारे विचार केला तर ठाणे रेल्वेस्थानकातून दररोज सुमारे पाच ते सहा लाख प्रवासी ये-जा करीत असतात. प्रवासी नागरिकांबरोबरच स्थानक परिसरात असलेल्या लाखो फेरीवाल्यांमुळे आधीच हैराण झालेल्या प्रवाशांच्या हालात परिसरातच मोठा मंडप घालून सार्वजनिक गणपती...

मुंढेंच्या कारवाईविरूद्ध न्यायालयाचे अर्थशून्य ताशेरे! बहोत नाइंसाफी है यह…

तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध विभागाचे आयुक्त म्हणून सूत्रे हाती घेतल्यापासून संपूर्ण राज्यभर एकच हलकल्लोळ माजला आहे. भेसळ करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. औषध नियंत्रण नियमावलीचे पालन न करणाऱ्यांचे तर आता पितळ उघडे पडत आहे. अधूनमधून कारवाईचा दणका बसलेली...

शिवसेनाप्रमुखांची अटक हे पोलीस कर्तव्याचे फलित! संबंध मधुरच!!

पोलीस आयुक्त नियम आणि कायद्याच्या चौकटीतच काम करत असतो, नव्हे त्याला तसे करावेच लागते. म्हणूनच सत्तारूढ राजकीय नेत्यांनी 'आवडता-नावडता' अधिकारी असे शिक्के कुणावरही मारू नयेत, अशी स्पष्टोक्ती मुंबईचे माजी पोलीस आयुक्त एम. एन. सिंग यांनी येथे केली. ज्येष्ठ पत्रकार...
Skip to content