Homeपब्लिक फिगरबारामतीतला अजितदादांचा उत्तराधिकारी...

बारामतीतला अजितदादांचा उत्तराधिकारी नसणार बिनविरोध?

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राहुरीचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागांवर आता राजकीय रणधुमाळी उडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपने विशेषतः बारामतीची निवडणूक ‘बिनविरोध’ करण्यासाठी आवाहन केले असतानाच, काँग्रेसने राहुरी आणि बारामती या दोन्ही जागा लढवण्याचा पवित्रा घेतला आहे. पक्षश्रेष्ठींकडून या दोन्ही मतदारसंघांसाठी हिरवा कंदील मिळाल्याने महाविकास आघाडीतील (एमव्हीए) अंतर्गत समीकरणे बदलण्याची शक्यता असून, यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. परिणामी बारामतीतून निवडला जाणारा अजितदादांचा उत्तराधिकारी बिनविरोध असण्याची शक्यता कमी आहे.

भाजपचे आवाहन आणि मविआतील मतभेद

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवारांच्या निधनानंतर बारामतीत ही निवडणूक ‘भावनिक’ आणि ‘बिनविरोध’ व्हावी, अशी भूमिका मांडली होती. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनीही सुनेत्रा पवार यांच्या विरोधात उमेदवार न देण्याचे सूतोवाच केले होते. मात्र, “जर मित्रपक्ष लढणार नसतील, तर आम्ही आमचा उमेदवार रिंगणात उतरवू,” असे म्हणत काँग्रेसने आपला दावा ठाम केला आहे. राहुरीमध्येही बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस विजयाचा विश्वास व्यक्त केल्याने महायुतीसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

२३ एप्रिलला मतदान; राज्याचे लक्ष निकालाकडे

निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानुसार, बारामती आणि राहुरी या दोन्ही मतदारसंघांत येत्या २३ एप्रिल २०२६ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून ४ मे रोजी मतमोजणी होणार आहे. बारामतीमध्ये लक्ष्मण हाके यांच्यासारख्या अपक्ष उमेदवारांनीही शड्डू ठोकल्याने ‘बिनविरोध’च्या आशा मावळल्या आहेत. काँग्रेसच्या या आक्रमक भूमिकेमुळे आता महाविकास आघाडीत जागावाटपावरून नव्याने पेच निर्माण झाला असून, ही पोटनिवडणूक आगामी विधानसभा निवडणुकांसाठी ‘लिटमस टेस्ट’ ठरणार असल्याची चर्चा राजकीय तज्ज्ञांमध्ये सुरू आहे.

Continue reading

मोजतबा खामेनी यांच्या पोस्टरमुळे इराणमध्ये खळबळ

इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी यांचे पुत्र मोजतबा खामेनी यांचे फोटो अचानक 'शहीद' पोस्टर्सवर झळकल्याने इराणच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. सहसा अशी पोस्टर्स युद्धात बलिदान देणाऱ्या सैनिकांसाठी किंवा अत्यंत महत्त्वाच्या दिवंगत नेत्यांसाठी वापरली जातात. मोजतबा जिवंत असतानाही त्यांचा...

टिटवीच्या अंड्यांमध्ये दडलेय पावसाचे रहस्य!

देशातील काही भागात शेतकऱ्यांचा असा विश्वास आहे की, टिटवीची अंडी मान्सूनच्या आगमनाचे आणि तीव्रतेचे अचूक संकेत देतात. टिटवीने दिलेल्या अंड्यांची संख्या, अंडी घालण्याची जागा यानुसार पारंपरिकरित्या, पिढ्या न् पिढ्या देशाच्या काही भागात मान्सूनच्या पावसाचे ठोकताळे आणि अंदाज बांधले जातात. अंड्यांची...

आता देशातच बनणार एमआरआय मशिन, चाचण्यांचे दर होणार ७०%पर्यंत कमी!

भारतीय आरोग्यसेवा क्षेत्रासाठी कालचा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाणारा ठरला. आतापर्यंत अत्यंत महागड्या आणि आयात कराव्या लागणाऱ्या एमआरआय मशिनच्या बाबतीत भारताने आत्मनिर्भरतेच्या दिशेने मोठे पाऊल टाकले आहे. बेंगळुरूस्थित 'व्होक्सेल ग्रिड्स' या कंपनीने टाटा ट्रस्टच्या सहकार्याने भारताचे पहिले स्वदेशी एमआरआय...
Skip to content