Homeबॅक पेजजेव्हा फोटो जिवंत...

जेव्हा फोटो जिवंत करणाराच ‘फोटो’त जातो…

गेल्या आठवड्यात एक दुःखद बातमी सकाळी, सकाळीच आली.. रजनीश गेला. वय अवघे ५५ वर्षे. हे वय होत का जाण्याचं? नाही. पण नियतीला काय माहित की त्याच्या हातून अजून कुणाकुणाचे फोटो कुठल्या परिस्थितीत काढायचे ते! फोटोलाच गुंगारा देऊन (तसा तो सर्वांनाच गुंगारा देत मस्त फोटो शोधत असायचा नेहमीच!) तो दिवस सुरु व्हायच्या आधीच अंतर्धान पावला होता. रजनीश यकृताच्या विकाराने बेजार होता. रुग्णालयात दाखल केले होते. घरीच औषधे व उपचार करा, असे सांगून डिस्चार्ज मिळाला होता. तब्येत सुधारत होती. स्थिर होती. अचानक हार्टअटॅक आला आणि होत्याचे नव्हते झाले. धडपडीचा तसेच चपळाईचा क्षण थप्प झाला. आपला रजनीश कायमचा निघून गेला..

काकडे कुटुंबाशी संबंध

काकडे कुटुंबाशी गेल्या ५० वर्षांपासून माझे संबंध आहेत. रजनीशचे वडील मंदार काकडे (ते डॅडी काकडे या नावाने ओळखले जात) गेल्या जमान्यातील ख्यातनाम वृत्तपत्र छायाचित्रकार! छाया: मंदार काकडे या नावाने प्रसिद्ध होते. ते नुसतेच छायाचित्रकार नव्हते तर ते छायाचित्राबरोबर बातम्याही पुरवायचे! त्याही प्रसिद्धीपत्रकासह!! आजकाल एजन्सीजचे पेव फुटले आहे. शिवाय दरही आस्मान छू रहे है.. असे असतानाही बातमी आली नाही की ग्राहक विचारू शकत नाही की बातमी का आली नाही? विचारलेच तरी आम्ही आमचे बातमी देण्याचे काम केले होते, का आली नाही हे आम्हाला माहित नाही अशी उडवाउवीची उत्तरं मिळतात, असा सर्वत्र अनुभव आहे. पण त्याकाळात तसे कुणीही करत नसे. फोटोसह तयार बातमी कुणाला नकोय? म्हणून बहुतांशी वर्तमानपत्रे काकडे यांच्याकडून आलेली बातमी व फोटो घ्यायचेच व ती छापूनही यायची.

याच फोटोची ‘जीन’ काकडेच्या राजू व रजनीशमध्ये अवतरली तर ते अजिबात नवल नव्हते. राजू काकडे यांनीही आपल्या परीने लोकसत्ता गाजवले होते. ९३च्या मुंबई दंगलीतील राजूचे फोटो गाजले होतेच. राजकीय फोटोही गाजले होते. माजी मुख्यमंत्री एकटेच खुर्चीत बसलेले व बाजूच्या सर्व खुर्च्या रिकाम्या.. असा एक फोटो गाजला होता. काकडे कुटुंबाविषयी विस्ताराने इतक्यासाठीच सांगितले की, रजनीशची बॅकग्राऊंड आजच्या पिढीला नीट कळावी! तर वर्तमानपत्र वा वृत्त विभागाला कोणत्या प्रकारचा फोटो लागतो याची जाण रजनीशला उपजतच होती. या जाणीवेपोटीच तो जिवन्त फोटोसाठी काही तास बैठक मारून बसत वा उभा राहत असे. उभा राहिला तर सतत जागा बदलत असे. मानजोगा ‘अँगल’ मिळत नसे तोवर तो सैरभैर होत असे. २६/११ मुंबई बॉम्बस्फोटाच्या वेळी त्याची नजर ताजमहाल हॉटेलवरून कित्येक तास खिळळी नव्हती हे त्याच्या यशस्वीतेचे गमक आहे. हे सर्व फोटो आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजले होते हे सांगायला नकोच.

आजचा हा विषय नाही. पण वृत्तपत्रसृष्टीत छायाचित्राचे महत्त्व रघु राय या ज्येष्ठ छायाचित्रकाराने अधोरेखित केले, हे मान्य करायला हरकत नाही. त्यांची संडे या साप्ताहिकात आलेली छायाचित्रे गजलेली होती. इंडियन एक्स्प्रेसमध्ये सॅबी फर्नांडिस, वसंत प्रभू, मुकेश पारपियानी, राजू काकडे, दिलीप कागडा आदींनी पत्रकारितेच्या प्रवासात चांगलीच साथ दिली हे मान्यच करावे लागेल. यापैकी काहीजण अजूनही मदत करतच असतात. रजनीशचा आणि माझा तसा जास्त संबंध आला नाही. पण ज्या-ज्या वेळी तो समोर यायचा तेव्हा बाजूला घेऊन अत्यन्त आदराने विचारपूस जरुर करायचा. आता अशी विचारपूस करणारी माणसे हळूहळू पडद्याआड होत आहेत. “A photograph is usually looked at – seldom looked in to it” असे म्हणतात. यातील दुसरा भाग रजनीशच्या छायाचित्राला लागू होतो. पण काय करणार? आणखी आनंद देण्याआधीच तो निघून गेला.

एका वेगळ्या अर्थाने…

“रोज तारों को नु्माईश में खलल पडता है..
चांद पागल है अंधेरे में निकल पडता है” (राहत)

छायाचित्रेः काकडे कुटुंबीय आणि वसंत प्रभू

छायाचित्र मांडणीः प्रवीण वराडकर

(लेखक विजयकुमार काळे ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

Continue reading

भाईंदरमध्ये पोलिसांच्या कार्यक्रमात ताकाचा ग्लास आणि …

वाचक हो, तुम्हाला आठवत असेलच की जुन्या हिंदी चित्रपटात अर्ध्या नोटेचं चिटोरं दाखवलं की खलनायकाच्या गुहेत विनासायास प्रवेश मिळत असे. (हल्ली काही वेबसिरीजमध्येही हा खेळ दाखवत असतात) तसेच लाचलूचपत प्रतिबंधक खात्यातर्फे धाड पडली की काहीजण नोटा खातात. काहीजण संडासाच्या...

न्यायालयात शब्दांना धार, बोरूही चालतो.. पण हातचं राखून!

ठाणे शहरात नुकतेच शहरातील 'वाहतूक लोककेंद्री कशी असावी' यावर एक चर्चासत्र होते. या सत्रात दिगज्ज वक्ते होते. सर्वोच्च न्यायालयातले निवृत्त न्या. अभय ओक, ज्येष्ठ शास्त्रज्ञ अनिल काकोडकर, अ. पा. देशपांडे व नगर रचनाकार सुलक्षणा महाजन आदी तगडे वक्ते होते....

न्यायमूर्तींचे निरीक्षण मोदी सरकारच्या अंगाशी!

अखेर अडीच-तीन महिन्यांच्या घोळानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलाच! त्यासाठी विद्यार्थ्यांना जंतरमंतरवर चार दिवस आंदोलन करावे लागले, लाठीमर खावा लागला. अनेक विद्यार्थ्यांना तर दिल्ली पोलिसांनी बदडून काढलेले जनतेने पाहिले. (विद्यार्थ्यांनीही पोलिसांना मारले...
Skip to content