Homeकल्चर +'संगीत शांतीब्रह्म’ने जिंकली रसिक प्रेक्षकांची...

‘संगीत शांतीब्रह्म’ने जिंकली रसिक प्रेक्षकांची मने!

संगीत रंगभूमीच्या वैभवशाली कालखंडाची आठवण करून देणारा संगीतनाट्य महोत्सव मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रात नुकताच साजरा झाला. रसिकांच्या गर्दीने हा संगीतनाट्य महोत्सव विशेष रंगत गेला. ही संस्था गेली अनेक वर्षे संगीतनाटकांना पुनश्च वैभव प्राप्त करून देण्यासाठी हा महोत्सव आयोजित करत असते. ‘संगीत शांतीब्रह्म’ हे नव्याने लिहिलेले संगीत नाटक. संपूर्ण संहिता नवी कोरी. त्यातली गाणीही अपरिचित. पण मनाचा वेध घेणाऱ्या या नाटकातल्या गाण्यांनीही रसिक प्रेक्षकांची मने जिंकली. साध्या, सोप्या चालीत बांधलेली नाट्यगीते कलाकारांनी उत्तमप्रकारे सादर केली. खल्वायन, या रत्नागिरी येथील संस्थेने त्याची निर्मिती केली आहे.

विद्याधर गोखले यांच्या लेखणीने शब्दबद्ध केलेले व्यावसायिक रंगभूमीवर गाजलेले नाटक `संगीत स्वरसम्राज्ञी’. संहिता, गीते प्रेक्षकांच्या परिचयाची. तरीही व्यावसायिक प्रयोगांशी तोडीस तोड असा हा नाट्यप्रयोग झाला. दर्जेदार अभिनय आणि स्वर-लयीचा तोल साधत सादर केलेली नाट्यगीते, त्यामुळे प्रयोग अधिकच खुलला. अर्थातच प्रेक्षकांच्या पसंतीची मोहोर यावर ठसली, यात शंकाच नाही. स्वरसम्राज्ञी, सादर करणाऱ्या संस्थेचे नाव परस्पर सहाय्यक मंडळ (वाघांबे). गुहागर तालुक्यातील ही संस्था असली तरी यातले कलाकार त्रिस्थळी विखुरले असून दूर अंतरावरून प्रवास करत त्यांनी तालमी केल्या आणि नजरकैद करणारा उत्तम प्रयोग सादर केला.

श्री विजयदुर्गा सांस्किक मंडळ, केरी, फोंडा या संस्थेने सादर केलेले नाटक `संगीत कट्यार काळजात घुसली’, हे रसिकांनी अनेकदा रंगभूमीवर पाहिलेले. तरीही पुन्हा त्याचा आनंद घेण्यासाठी ते उत्सुक दिसले. या नाटकात सर्व महिला कलाकार होत्या, हे त्याचे वेगळेपण. शास्त्रीय संगीताची भक्कम बैठक असलेल्या कलाकारांनी नाटकाचा हा प्रयोग सर्वोच्च पातळीवर नेला.

हे प्रयोग नेटाने पार पडावेत, यासाठी विलास कात्रे, दिलीप काटदरे, नीता आंबेकर, अंजली बक्षी, रविंद्र आवटी, सावंत यांनी निधी उपलब्ध केला तर विकाल कात्रे आणि राजीव श्रीखंडे यांनीही अखेरच्या दिवशी आर्थिक सहाय्य केल्याची घोषणा केली. शिबानी जोशी यांचे उत्तम निवेदन तिन्ही दिवस होते.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content