Homeएनसर्कलटिव्ही पत्रकारितेचा चेहरामोहरा...

टिव्ही पत्रकारितेचा चेहरामोहरा बदलणारे दिग्गज टेड टर्नर यांचे निधन

जगातील पहिली २४ तास बातम्या देणारी वृत्तवाहिनी ‘सीएनएन’ सुरू करून टेलिव्हिजन (टिव्ही) पत्रकारितेचा चेहरामोहरा बदलणारे दिग्गज माध्यम सम्राट टेड टर्नर यांचे वयाच्या ८७व्या वर्षी नुकतेच निधन झाले. १९८०मध्ये त्यांनी ‘केबल न्यूज नेटवर्क’ची स्थापना केली, ज्याने ठराविक वेळेत बातम्या देण्याच्या प्रस्थापित पद्धतीला छेद देत अहोरात्र ‘ब्रेकिंग न्यूज’ देण्याची नवी संस्कृती रूजवली. १९९०-९१मधील आखाती युद्धाच्या थेट आणि सविस्तर कव्हरेजमुळे सीएनएनला जागतिक स्तरावर एक वेगळी ओळख प्राप्त झाली आणि टर्नर यांचे नाव जगभर पोहोचले.

एक धाडसी व्यावसायिक आणि जोखीम घेणारे व्यक्तिमत्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टर्नर यांनी केवळ माध्यम क्षेत्रातच नव्हे, तर क्रीडा आणि नौकानयन क्षेत्रातही स्वतःचा ठसा उमटवला होता. व्यावसायिक स्पोर्ट्स क्लबची मालकी आणि स्पर्धात्मक नौकानयन संघाचे नेतृत्त्व यामुळे ते नेहमीच चर्चेत राहिले. हॉलिवूड अभिनेत्री जेन फोंडा यांच्याशी झालेला त्यांचा विवाह आणि त्यानंतर त्यांनी स्वतःला वाहून घेतलेले सामाजिक व पर्यावरणीय कार्य हे त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वाचे पैलू होते. त्यांच्या निधनामुळे जागतिक माध्यम विश्वातील एका धडाडीच्या पर्वाचा अस्त झाला आहे.

Continue reading

पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीच्या रासायनिक लेपनास स्थगिती!

कोट्यवधी हिंदूंचे आराध्यदैवत असलेल्या पंढरपूरच्या ‘स्वयंभू’ श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीवर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती आणि पुरातत्त्व विभागाकडून २३ आणि २४ जून रोजी प्रस्तावित असलेल्या रासायनिक वज्रलेपनास पंढरपूरच्या दिवाणी न्यायालयाने (कनिष्ठ स्तर) तत्काळ स्थगिती दिली आहे. वारकरी संप्रदाय आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाने...

हा तर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाच्या विश्वासार्हतेवरच आघात!

शिवसेनेतल्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांचे आज उफाळून आलेले कथित बंड हे केवळ खासदारांचे बंड नाही, तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाच्या विश्वासार्हतेवर झालेला दुसरा मोठा आघात आहे. २०२२मध्ये आमदारांनी दिलेला धक्का आणि आता २०२६मध्ये पुन्हा एकदा खासदारांनी फिरवलेली पाठ, या...

८ जूनपासून पाऊस कोकणातच!

देशातील मान्सूनची सध्याची परिस्थिती अत्यंत चिंताजनक बनली असल्याचे, खासगी हवामान एजन्सी स्कायमेटचे संचालक जी. पी. शर्मा यांनी म्हटले आहे. मुळातच यंदा मान्सूनचे आगमन उशिराने झाले असून, सुरुवातीचे काही दिवस प्रगती केल्यानंतर गेल्या एका आठवड्यापासून तो पूर्णपणे थबकला आहे. ८...
Skip to content