Homeचिट चॅटश्री मावळी राज्यस्तरीय...

श्री मावळी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा २५ एप्रिलपासून

ठाणे येथील श्री मावळी मंडळ संस्थेच्या शताब्दी वर्षानिमित्त तसेच शिवजयंती उत्सवानिमित्त राज्य पातळीवरील पुरुष व महिला गटाच्या कबड्डी स्पर्धा शुक्रवार, २५-०४-२०२५ ते मंगळवार, २९-०४-२०२५ या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आल्या आहेत.

या स्पर्धेत एकूण रू. ५,००,०००/- ची पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. पुरुष गटात विजेत्या संघाला ₹ १,००,०००/-, उपविजेत्या संघाला ₹ ७५,०००/- व उपांत्य फेरीतील पराभूत संघाला ₹ २५,०००/- रोख रक्कम व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. महिला गटात विजेत्या संघाला ₹ ५५,०००/-, उपविजेत्या संघाला ₹ ४४,०००/- व उपांत्य फेरीतील पराभूत संघाला ₹ २२,०००/- रोख रक्कम व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. पुरुष व महिला गटात उत्कृष्ट खेळाडूस ₹ १०,०००/-, उत्कृष्ट चढाईपट्टू खेळाडूस ₹ ५,०००/- व उत्कृष्ट पक्कड करणाऱ्या खेळाडूस ₹ ५,०००/- रोख रक्कम देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेतील प्रत्येक दिवसाच्या उत्कृष्ट खेळाडूस ₹ २,०००/- रोख रक्कम देऊन गौरविण्यात येणार आहे.

स्पर्धेचे प्रवेशअर्ज श्री मावळी मंडळ कार्यालय (ठाणे) व महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या maharashtrakabaddi.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. स्पर्धेचे अर्ज श्री मावळी मंडळ कार्यालय, ठाणे येथे शुक्रवार, १८/०४/२०२५पर्यंत स्वीकारले जातील.

Continue reading

अखिलेश यादवचे बंधू प्रतिक यांचा संशयास्पद मृत्यू!

समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंग यादव यांचे लहान पुत्र तसेच समाजवादी पार्टीचे सध्याचे प्रमुख अखिलेश यादव यांचे लहान सावत्र बंधू प्रतिक यादव यांचे आज पहाटे वयाच्या ३८व्या वर्षी आकस्मिक निधन झाले. भारतीय जनता पार्टीच्या नेत्या...

जान्हवी मोरे स्मृती कॅरम स्पर्धेत स्वरा कदम, ओमकार वडर विजेते

डोंबिवली (पूर्व) येथील दत्तनगर उत्कर्ष मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय कॅरमपटू जान्हवी मोरे स्मृतिप्रीत्यर्थ १६ वर्षांखालील मुलां-मुलींच्या राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत अनुक्रमे कोल्हापूरच्या ओमकार वडर आणि रत्नागिरीच्या स्वरा कदमने विजेतेपदाचा मान मिळवला. शास्त्री हॉलमध्ये झालेल्या या स्पर्धेत ठाणे, मुंबई, मुंबई...

तृणमूलच्या विळख्यातून प. बंगाल बाहेर! आता कसोटी सुवेंधूंची!!

ममता बॅनर्जींचा पाठोपाठ दोन्ही विधानसभा निवडणुकीत सलग दोन वेळा पराभव करून देशात जायंट किलर ठरलेले सुवेंधू अधिकारी यांनी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून रविवारी शपथ घेतली आणि राज्यात नव्या पर्वाला सुरूवात झाली. ममता बॅनर्जीच्या पंधरा वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत सतत हिंसाचार,...
Skip to content