Homeहेल्थ इज वेल्थतीक्ष्ण चाकू हल्ल्यातील...

तीक्ष्ण चाकू हल्ल्यातील जखमीला डॉक्टरांनी वाचवले!

अतिशय तीक्ष्ण चाकू हल्ल्याने अनेक वार होवून मृत्यूच्या दाढेत गेलेल्या व्यक्तिवर तातडीची, अतिशय अवघड आणि क्लिष्ट शस्त्रक्रिया करुन त्याचे प्राण वाचवण्यात मुंबई महानगरपालिकेच्या सांताक्रूझ येथील व्ही. एन. देसाई रुग्णालयाला यश आले आहे.

मुंबई महापालिकेच्या सांताक्रूझ (पूर्व) येथील विष्णूप्रसाद नारायण देसाई रुग्णालयामध्ये काही दिवसांपूर्वी अपघात विभागात एका ३६ वर्षीय रूग्णाला अत्यंत गंभीर जखमी अवस्थेत होळीच्या दिवशी म्हणजे ७ मार्च २०२३ रोजी दाखल करण्यात आले होते. तीक्ष्ण चाकू हल्ल्यामध्ये अनेक वार झाल्याने या व्यक्तिच्या अंगावर ठिकठिकाणी जखमा झाल्या होत्या, तसेच त्याच्या पोटाच्या उजव्या बाजूस बरगड्यांच्या खाली चाकूने वार करण्यात आले होते. यकृताला इजा पोहोचून पोटात मोठ्या प्रमाणावर रक्त साकळले होते. सगळ्यात गंभीर बाब म्हणजे चाकू पोटात खोलवर अडकला होता. या जीवघेण्या हल्ल्याने रुग्णाची स्थिती अतिशय चिंताजनक झाली होती. प्रचंड रक्तस्त्रावदेखील झाला होता.

व्ही. एन. देसाई रुग्णालयाच्या संपूर्ण वैद्यकीय चमुने अतिशय प्रसंगावधान राखून व कुशलतेने ही परिस्थिती हाताळली. सर्व वैद्यकीय पथकाला युद्धपातळीवर पाचारण केले. रूग्णाची गंभीर परिस्थिती पाहून वैद्यकीय मंडळींनी रूग्णावर तातडीने उपचार सुरू केले. तातडीची शस्त्रक्रिया करताना सर्वप्रथम रुग्णाचा रक्तस्त्राव रोखला.  यकृतामधून होणारा रक्तस्त्राव आटोक्यात आणल्यावर साकळलेले रक्त बाहेर काढले. पोटात रुतलेला चाकू बाहेर काढणे अतिशय आव्हानास्पद होते. कारण, त्यामुळे इजा वाढण्याची शक्यता होती. मात्र वैद्यकीय कौशल्याच्या जोरावर हे आव्हान पेलून या रुग्णाचा जीव वाचवण्यात वैद्यकीय पथकाला यश आले.

व्ही. एन. देसाई रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. हरबंस सिंग बावा यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय पथकातील डॉ. धर्मश्री कदम, डॉ. हिमानी सैनी, डॉ. सात्विक भालेराव, भूलतज्ञ डॉ. सलाउद्दिन के. पी., डॉ. अक्षता सूथकट्टी या चमूने ही आव्हानात्मक शस्त्रक्रिया पार पाडून रुग्णाचा जीव वाचवला, अशी माहिती प्रमुख वैद्यकीय अधीक्षक डॉ. विद्या ठाकूर यांनी दिली.

अथक वैद्यकीय प्रयत्नांती हा रुग्ण मृत्यूच्या दाढेतून बाहेर आला. अतिदक्षता विभागामध्ये प्रारंभी वैद्यकीय देखरेख करुन रूग्णाची परिस्थिती स्थिर होण्यासाठी मदत झाली. त्यानंतर सुमारे आठवडाभर उपचार झाल्यानंतर रूग्णाला घरी सोडण्यात आले. वैद्यकीय चमुने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे, वेळीच केलेली शस्त्रक्रिया तसेच वैद्यकीय कौशल्यामुळे या रूग्णाचा जीव वाचणे शक्य झाले.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content