Homeचिट चॅटराज्य कॅरम स्पर्धेत...

राज्य कॅरम स्पर्धेत संदीप दिवे, काजल कुमारी विजेते 

सोमेश्वर फाऊंडेशन आणि क्रीडा जागृती आयोजित सनी निम्हण यांच्या पुढाकाराने तसेच महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व कॅरम असोसिएशन ऑफ पुणेच्या मान्यतेने कै. विनायक निम्हण यांच्या स्मरणार्थ सनीज वर्ल्ड, पुणे येथे आयोजित केलेल्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेतील पुरुष एकेरी गटाच्या अंतिम सामन्यात मुंबई उपनगरच्या विश्वविजेत्या संदीप दिवेने पुण्याच्या अभिजित त्रिपनकरचा अटीतटीच्या लढतीत पराभव करून विजेतेपद मिळविले.

संदिपने रोख रुपये २५ हजारांचे ईनाम व चषक मिळवला.  महिला एकेरीचा सामना अगदीच एकतर्फी झाला. मुंबईच्या आंतरराष्ट्रीय खेळाडू काजल कुमारीने मुंबईच्या अंबिका हरिथवर सहज विजय मिळवून रोख रुपये ८ हजरांचे ईनाम व चषक पटकाविला. तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या पुरुषांच्या सामन्यात पुण्याच्या रहिम खानने ठाण्याच्या झैद अहमदला  हरविले. महिलांच्या तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीत मुंबईच्या उर्मिला शेंडगेने मुंबईच्या रिंकी कुमारीवर मात केली.

विजेत्या खेळाडूंना पुण्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. याप्रसंगी महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे कार्याध्यक्ष भारत देसडला, क्रीडा जागृतीचे मुख्य प्रताप जाधव, राज्य कॅरम संघटनेचे उपाध्यक्ष यतिन ठाकूर, सचिव अरुण केदार, खजिनदार अजित सावंत, सहसचिव अभिजित मोहिते, सदस्य संतोष चव्हाण आणि कॅरम असोसिएशनचे सचिव नंदू सोनावणे उपस्थित होते.

Continue reading

अखिलेश यादवचे बंधू प्रतिक यांचा संशयास्पद मृत्यू!

समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंग यादव यांचे लहान पुत्र तसेच समाजवादी पार्टीचे सध्याचे प्रमुख अखिलेश यादव यांचे लहान सावत्र बंधू प्रतिक यादव यांचे आज पहाटे वयाच्या ३८व्या वर्षी आकस्मिक निधन झाले. भारतीय जनता पार्टीच्या नेत्या...

जान्हवी मोरे स्मृती कॅरम स्पर्धेत स्वरा कदम, ओमकार वडर विजेते

डोंबिवली (पूर्व) येथील दत्तनगर उत्कर्ष मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय कॅरमपटू जान्हवी मोरे स्मृतिप्रीत्यर्थ १६ वर्षांखालील मुलां-मुलींच्या राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत अनुक्रमे कोल्हापूरच्या ओमकार वडर आणि रत्नागिरीच्या स्वरा कदमने विजेतेपदाचा मान मिळवला. शास्त्री हॉलमध्ये झालेल्या या स्पर्धेत ठाणे, मुंबई, मुंबई...

तृणमूलच्या विळख्यातून प. बंगाल बाहेर! आता कसोटी सुवेंधूंची!!

ममता बॅनर्जींचा पाठोपाठ दोन्ही विधानसभा निवडणुकीत सलग दोन वेळा पराभव करून देशात जायंट किलर ठरलेले सुवेंधू अधिकारी यांनी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून रविवारी शपथ घेतली आणि राज्यात नव्या पर्वाला सुरूवात झाली. ममता बॅनर्जीच्या पंधरा वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत सतत हिंसाचार,...
Skip to content